शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

कोरोना इफेक्ट, बाजार समितीतील आवक प्रचंड मंदावली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:54 IST

कळंब : जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती अशी ओळख असलेल्या कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धान्य ...

कळंब : जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती अशी ओळख असलेल्या कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धान्य खरेदी-विक्रीला ब्रेक लागला आहे. बाजार समितीमध्ये दिवसाकाठी फक्त ५० ते १०० क्विंटल धान्य खरेदी होते आहे.

खरीप हंगाम जसा जवळ येत आहे तशी बाजार समितीमध्ये आवक वाढेल अशी व्यापाऱ्यांची अपेक्षा होती. जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाला तर पेरणीला सुरुवात होते. त्याच्या बी बियाणे तसेच खतांच्या तजवीजीसाठी शेतकरी वर्ग धान्य विक्रीसाठी आणतात. तसेच ज्वारी, हरभरा, गहू काढणीही झाली असल्याने तो शेतमाल विक्रीसाठी येईल असा बाजाराचा अंदाज होता.

शासनाने शेतीमालाच्या खरेदी-विक्रीला निर्बंधातून सूट दिली आहे. बाजार समितीचे कामकाजही चालू आहे. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता कळंब बाजार समितीमधील धान्याची आवक प्रचंड घटली आहे. जेथे दिवसाकाठी धान्याची आवक हजार क्विंटलच्या घरात जायची तेथे आता ५० ते १०० क्विंटलपर्यंत आवक घसरली आहे.

सध्या प्रामुख्याने ज्वारी, हरभरा व गव्हाची आवक आहे. ज्वारीला २००० ते २२००, हरभरा ४९०० ते ५०५० प्रती क्विंटल भाव आहे. शनिवारी बाजार समितीमध्ये हरभरा व ज्वारीची फक्त ७६ क्विंटल आवक नोंदविली गेली आहे. यावरूनच बाजारात कोरोना संसर्गाच्या तसेच प्रशासनाच्या कार्यवाहीच्या धास्तीने शेतकरीवर्ग धान्य विक्री करण्यासाठी बाजार समिती परिसरात येत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

चौकट -

व्यापारी प्रतिक्रिया

सध्या कोरोना संसर्गामुळे शेतकरी वर्ग धान्य विक्रीसाठी आणत नसल्याचे चित्र आहे. यामुळे बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या वाहनांना अडवाअडवीला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. व्यापारी वर्गाला तुम्ही शेतकरी कशाला जमविले म्हणून दंड लावला जात आहे. एकूणच सर्व परिस्थिती विपरीत असल्याने बाजार समितीमधील धान्याची आवक घटली आहे. परिस्थिती सामान्य झाली की आवक वाढेल.

- लक्ष्मण कोल्हे, आडत व्यापारी.

बाजार समिती परिसरात अभूतपूर्व शांतता आहे. ही वेळ दरवर्षी मोठ्या उलाढालीची असते; पण यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे धान्याची आवक थंडावली आहे परिणामी सौदेही होत नाहीत. त्यामुळे धान्याला उठाव नाही तसेच भावही मिळत नसल्याचे चित्र आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा आवक वाढेल

आनंद बलाई, भुसार व्यापारी.

शेतकरी प्रतिक्रिया

मागील खरीप हंगामात अतिवृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्याचा विमा अद्याप मिळाला नाही. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने धान्य खरेदीही बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात बी-बियाणे, खते खरेदीसाठी हातात पैसा कसा येईल, याची काळजी आहे.

- प्रवीण जाधव, शेतकरी, उमरा.

बाजार समिती परिसरातील व्यवहार थंडावल्याने ज्वारी, हरभरा अजून घरातच आहेत. व्यवहार कधी सुरू होणार, धान्याचे भाव वाढणार की कमी होणार, याबद्दल काहीच सांगता येत नसल्याने पुढील काळात शेतकऱ्यांसमोर नेमकं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. जूनमध्ये पाऊस समाधाकारक झाला तर पेरणी करावीच लागेल. त्याच्या खर्चाची तरतूद कशी करायची, असा सवालही घोगरे यांनी उपस्थित केला.

- अमोल घोगरे, शेतकरी, एकुरका.

आठ दिवस व्यवहार बंद

बाजार समिती परिसरातील काही व्यापारी कोविड पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे समिती परिसरातील व्यवहार आठ दिवस बंद राहणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग बाजार समिती परिसरात धान्य विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.