शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

बालेकिल्ल्यात काँग्रेसला पडतेय खिंडार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST

लोहारा : शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागण्णा वकील यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष जयंत ...

लोहारा : शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागण्णा वकील यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यातच काँग्रेसचा अजून एक गट शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला आता उधाण आले आहे. यामुळे एकेकाळी काँग्रेसचा बाल्लेकिल्ला असलेल्या शहरात काँग्रेसला खिंडार पडत असल्याचे चित्र आहे.

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी उमरगा-लोहारा विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. त्यावेळी ते राज्यमंत्री होते. परंतु, हा मतदारसंघ आरक्षित झाला आणि त्यांनी औसा विधानसभा निवडणूक लढविली. दोन टर्म ते औशाचे आमदार राहिले. त्यानंतर त्यांचे लोहारा शहरासह तालुक्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले असल्याचे काँग्रेसचेच कार्यकर्ते सांगत असले तरी, ते प्रत्येक निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही तालुक्यात चांगले यश मिळत होते. परंतु, उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघ हा आरक्षित झाल्यापासून काँग्रेसला गड राखण्यात यश आले नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमानिमित्त गुरुवारी तुळजापूर येथे आले असताना लोहारा शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तालुका समन्वय समितीचे माजी अध्यक्ष नागण्णा वकील व त्यांचे नातू विश्वजित वकील-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वकील यांनी आपल्या राजकारणाची सुरुवातच काँग्रेसपासून केली होती. त्यांनी उमरगा पंचायत समितीचे सदस्य, मुरुम बाजार समितीचे संचालक, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष, लोहारा शहराचे सरपंच, काँग्रेस पक्षाच्या अनेक पदांवर काम केले आहेत. तसेच काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचे विश्वासू म्हणून परिचित आहेत. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर काँग्रेसचा आणखी एक गट शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आता शहरात चांगलीच रंगू लागली आहे. त्यामुळे काँग्रेसला शहरासह तालुक्यात फटका बसणार असला तरी लोहारा नगरपंचायत निवडणूक व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत यांचा किती प्रभाव पडणार, हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.