लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : काेराेनामुळे अडचणीत आलेल्या उस्मानाबाद पालिकेने यंदा थकीत कर वसुलीवर माेठ्या प्रमाणात भर दिला. टाॅप - ५० थकबाकीदारांचे फलक तयार करून शहरातील वर्दळीच्या चाैकात लावले. या माध्यमातून थकबाकीदारांची अब्रू वेशीवर टांगणारे पालिका प्रशासन पाेलीस अधीक्षक कार्यालयावर मात्र भलतेच मेहरबान झाले आहे. मालमत्ता तसेच पाणीपट्टीपाेटी असलेल्या तब्बल सव्वाकाेटी रूपये थकबाकीपैकी छदामही भरलेली नसताना या कार्यालयाचा पाणीपुरवठा पूर्ववत केला आहे. त्यामुळे पाेटाला चिमटा घेऊन कर भरलेल्या करदात्यांमधून पालिकेच्या या दुटप्पी कार्यपद्धतीबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
काेराेनामुळे पालिकेच्या उत्पन्नात माेठी घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मुलभूत साेयी-सुविधा तसेच काेविडच्या अनुषंगाने करावयाच्या उपायाेजनांवर परिणाम हाेत असल्याचे सांगत पालिकेने कर वसुलीवर माेठा भर दिला. गल्लाेगल्ली भाेंगा फिरवून ‘कर भरा, अन्यथा कारवाईला सामाेरे जा’ अशा स्वरूपाची तंबीच नागरिकांना दिली. आपण कर न भरल्यास पालिकेच्या कारवाईला सामाेरे जावे लागेल, या भीतीपाेटी अनेक नागरिकांनी पाेटाला चिमटा घेऊन कराची रक्कम पालिकेच्या तिजाेरीत जमा केली. काहींनी तर उसनवारी, कर्जाऊ रक्कम काढून पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. दरम्यान, यानंतरही न जुमानलेल्या टाॅप - ५० थकबाकीदारांच्या नावाचे भलेमाेठे फ्लेक्स तयार करून पालिकेने ते शहरातील वर्दळीच्या ठिकाणी झळकवले. त्यावरील काही नावे पाहून अनेक लाेक ‘पालिकेने यांच्याकडून कर वसूल करून दाखवावाच’ असे आव्हान देत चालते हाेत हाेते. अब्रू वेशीवर टांगल्याचे पाहून यातील काहींनी लाजेखातर का हाेईना पालिकेच्या तिजाेरीत थकबाकीचे पैसे भरले. दरम्यान, थकबाकीदारांची अब्रू वेशीवर टांगणारे पालिका प्रशासन पाेलीस अधीक्षक कार्यालयावर मात्र भलतेच मेहरबान झाल्याचे समाेर आले आहे. या कार्यालयाचे मालमत्ता करापाेटी सुमारे ८० लाख तर पाणीपट्टीचे ४७ लाख रूपये थकीत आहेत. त्यामुळे पालिकेने कार्यालयाचा पाणीपुरवठा खंडित केला. मात्र, थकीत एक ते सव्वा काेटीपैकी पालिकेच्या तिजाेरीत छदामही जमा केलेली नसताना पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे, हे विशेष. दरम्यान, कर वसुलीच्या अनुषंगाने समाेर आलेल्या पालिकेच्या या दुटप्पी भूमिकेबाबत वेशीवर अब्रू टांगले थकबाकीदार व पाेटाला चिमटा घेऊन कर भरलेल्या नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
चाैकट...
गाेरगरिबांनी पाेटाला चिमटा घेऊन कर का भरायचा? - राजेनिंबाळकर
काेराेनामुळे पालिका आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे चालू व थकीत कर वसुलीवर भर देण्यात आला. कठाेर पाऊल उचलल्याशिवाय कर वसूल हाेणार नाही, हे लक्षात आल्यानंतर तशी पावले उचलली. त्यानुसार गाेरगरिबांनी माेलमजुरी करून पैसे पालिकेला भरले. हाच न्याय पाेलीस अधीक्षक कार्यालयालाही लावला हाेता. आठ वर्षांपासून त्यांच्याकडे काेट्यवधींचा कर थकीत आहे. यातील छदामही पालिकेच्या तिजाेरीत जमा झालेली नाही. तरीही मुख्याधिकारी यांनी काेराेना व ‘वरिष्ठां’च्या आदेशाचे कारण देत कारवाई मागे घेतली. हा अधिकार प्रशासनाला काेणी दिला? पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करणारे वरिष्ठ काेण? याची उत्तरे प्रशासनाने जनतेला द्यावीत, असे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.
पाेलीस अधीक्षक कार्यालयाकडे २ एप्रिल २०२१ अखेर थकीत मालमत्ता कर ८० लाख रूपये व थकीत पाणीपट्टी ४७ लाख रूपये आहे. वारंवार पत्रव्यवहार केला, मात्र कर भरला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा ताेडला. मात्र, याबाबत आलेला वरिष्ठांचा आदेश आणि पाेलीस फ्रंटलाईन कर्मचारी असल्याने थकबाकी भरलेली नसतानाही पाणीपुरवठा पूर्ववत केला आहे.
- हरिकल्याण येलगट्टे, मुख्याधिकारी, नगर परिषद, उस्मानाबाद.