शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीय व्यक्तींना जमीन देण्याच्या मुद्द्यावर समितीत ‘एकमत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना जगण्याचे कायमस्वरूपी साधन उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांना कसण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याचा मुद्दा जिल्हास्तरीय समितीच्या ...

उस्मानाबाद : जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना जगण्याचे कायमस्वरूपी साधन उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांना कसण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याचा मुद्दा जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत आला हाेता. या अनुषंगाने ‘एकमत’ झाल्यानंतर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी काैस्तुभ दिवेगाकवर यांनी समाज कल्याण आयुक्तांचे मार्गदर्शन मागविण्याचे निर्देश समिती सचिव तथा सहाय्यक अयुक्त बी. जी. अरवत यांना दिले. आयुक्तांचा हिरवा कंदील मिळाल्यास तृतीयपंथीय व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी हक्काचे साधन उपलब्ध हाेणार आहे.

तृतीयपंथीय यांच्या समस्या तसेच तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांचा समावेश असणारी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत तृतीयपंथीय यांच्या नाेंदणीसंदर्भात सुरुवातीला चर्चा झाली. याबाबत समिती अध्यक्ष दिवेगावकर यांनी तसे निर्देश सहाय्यक आयुक्त तथा समिती सचिव अरवत यांना देण्यात आले. यानंतर समिती सदस्य कलीम आयुब कागदी यांनी तृतीयपंथीय यांना जगण्याचे कायमस्वरूपी साधन उपलब्ध व्हावे, यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान याेजनेच्या माध्यमातून कसण्यासाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. ज्याप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना याेजनेचा लाभ देताना जातीचा विचार केला जात नाही, त्याप्रमाणेच तृतीयपंथीय यांच्याबाबतही विचार व्हावा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. समितीतही त्यांच्या या मागणीवर एकमत झाले. यानंतर समिती अध्यक्ष दिवेगावकर यांनी या अनुषंगाने समाज कल्याण आयुक्तांकडून मार्गदर्शन मागवावे, असे निर्देश समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अरवत यांना दिले.

दरम्यान, उपराेक्त विषयास आयुक्तांचा हिरवा कंदील मिळाल्यास अशा प्रकारची याेजना हाती घेणारा उस्मानाबाद हा राज्यातील पहिला जिल्हा ठरू शकताे.

चाैकट...

नाेंदणी झाल्यानंतर तृतीयपंथीय यांना विविध प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे, राष्ट्रीयीकृत बॅंकेत खाते काढणे, काेविड लसीकरण उपलब्ध करून देणे, बचतगट तयार करणे, घरकुल याेजनेचा लाभ देणे, महामंडळ तसेच बॅंकांकडून कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. या माध्यमातून तृतीयपंथीय यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बी. जी. आरवत यांनी सांगितले.