शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

महावितरणविरोधात ग्राहक मंचात दावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : शेतकऱ्यांना वेठीस धरुन महावितरणच्या माध्यमातून शासन सक्तीने वीजबील वसूल करीत आहे. त्यासाठी नियमबाह्यपणे वीज पुरवठा खंडित करण्यात ...

उस्मानाबाद : शेतकऱ्यांना वेठीस धरुन महावितरणच्या माध्यमातून शासन सक्तीने वीजबील वसूल करीत आहे. त्यासाठी नियमबाह्यपणे वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने आता महावितरणच्या विरोधात ग्राहक मंचात दावे दाखल करण्यासाठी भाजप पुढाकार घेत असल्याची माहिती बुधवारी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

महावितरणकडून कधीही शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा केला जात नाही. रात्री - बेरात्री केवळ ८ तास तोही पुरेशा दाबाने विजेचा पुरवठा होत नाही. रोहित्रे जळाल्यास शेतकरीच स्वखर्चाने ने-आण करतात. दुरुस्तीही महिना-महिना होत नाही. अशी सुमार सेवा देणाऱ्या महावितरणने शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम चालविले आहे. दरम्यान, एकाही शेतकऱ्याने देयक भरल्यास त्यास वीज पुरवठा करणे क्रमप्राप्त आहे. असे असतानाही संपूर्ण रोहित्रेच बंद करुन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. वीज जोडणी न दिल्याने झालेल्या पीक नुकसानीची भरपाई मिळविण्यासाठी आता ग्राहक मंचात शेतकऱ्यांच्या माध्यमातून दावे दाखल करण्यात येणार आहेत. यासाठी रोहित्र, फिडर, सब स्टेशन बंद केल्याने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांनी आपापल्या तालुक्यातील भाजपच्या तालुकाध्यक्षांशी किंवा ८८८८६२७७७७ या क्रमांकावर व्हाॅटस्ॲपवरुन संपर्क साधण्याचे आवाहनही आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. दरम्यान, सक्तीच्या वीजबिल वसुलीच्या विरोधात महावितरणच्या कार्यालयांसमोर आंदोलने करण्यात आली आहेत. आता प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर वीजबिल जाळून आंदोलन तीव्र करण्याचे आवाहनही पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे.