शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

महावितरणविरोधात ग्राहक मंचात दावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : शेतकऱ्यांना वेठीस धरुन महावितरणच्या माध्यमातून शासन सक्तीने वीजबील वसूल करीत आहे. त्यासाठी नियमबाह्यपणे वीज पुरवठा खंडित करण्यात ...

उस्मानाबाद : शेतकऱ्यांना वेठीस धरुन महावितरणच्या माध्यमातून शासन सक्तीने वीजबील वसूल करीत आहे. त्यासाठी नियमबाह्यपणे वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने आता महावितरणच्या विरोधात ग्राहक मंचात दावे दाखल करण्यासाठी भाजप पुढाकार घेत असल्याची माहिती बुधवारी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

महावितरणकडून कधीही शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा केला जात नाही. रात्री - बेरात्री केवळ ८ तास तोही पुरेशा दाबाने विजेचा पुरवठा होत नाही. रोहित्रे जळाल्यास शेतकरीच स्वखर्चाने ने-आण करतात. दुरुस्तीही महिना-महिना होत नाही. अशी सुमार सेवा देणाऱ्या महावितरणने शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम चालविले आहे. दरम्यान, एकाही शेतकऱ्याने देयक भरल्यास त्यास वीज पुरवठा करणे क्रमप्राप्त आहे. असे असतानाही संपूर्ण रोहित्रेच बंद करुन शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. वीज जोडणी न दिल्याने झालेल्या पीक नुकसानीची भरपाई मिळविण्यासाठी आता ग्राहक मंचात शेतकऱ्यांच्या माध्यमातून दावे दाखल करण्यात येणार आहेत. यासाठी रोहित्र, फिडर, सब स्टेशन बंद केल्याने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांनी आपापल्या तालुक्यातील भाजपच्या तालुकाध्यक्षांशी किंवा ८८८८६२७७७७ या क्रमांकावर व्हाॅटस्ॲपवरुन संपर्क साधण्याचे आवाहनही आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. दरम्यान, सक्तीच्या वीजबिल वसुलीच्या विरोधात महावितरणच्या कार्यालयांसमोर आंदोलने करण्यात आली आहेत. आता प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर वीजबिल जाळून आंदोलन तीव्र करण्याचे आवाहनही पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे.