शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने आता तातडीने मदत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:27 IST

उस्मानाबाद - केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील काही गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसाणीची पाहणी केली आहे. आता केंद्र सरकारने तात्काळ ...

उस्मानाबाद - केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील काही गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसाणीची पाहणी केली आहे. आता केंद्र सरकारने तात्काळ भरीव मदत करावी, अशी अपेक्षा आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली आहे. भेटीदरम्यान त्यानी आलेल्या अधिकाऱ्यांसमाेर वस्तुस्थिती मांडून नुकसानीची माहिती दिली.

अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. मुळातच पथक उशिरा आल्याने ही परिस्थिती दाखविता येणार नसल्याचे मतही आमदार कैलास पाटील यानी व्यक्त केले. ‘बैल गेला अन् झोपा केला’ या म्हणीप्रमाणे केंद्राची कार्यपध्दती असल्याने किमान आता आल्यानंतर तरी वस्तुनिष्ट अहवाल द्यावा, मागणी आमदार पाटील यानी यावेळी केली. बहुभुधारक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या ओहत. परंतु, केंद्राच्या जाचक अटीमुळे अशा शेतकर्यांना मदत मिळालेली नाही. हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. याबाबतीत केंद्र सरकारने काहीतरी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. या मदतीला दिरंगाई झाल्यास त्यांना पुढील हंगामात पिके घेता येणार नाहीत. त्यामुळे या प्रश्नाकडे अधिक सहानुभुतीने पाहण्याची गरज असल्याचेही आमदार पाटील यांनी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांना सांगितले.

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले असून केंद्राकडून अधिक अपेक्षा असतात. मात्र तिथेच दिरंगाई झाल्याने शेतकऱ्यांतून तीव्र भावना व्यक्त होत आहेत.

चाैकट...

विमा कंपन्यानी व्ययक्तीक पंचनामा ग्राह्य धरुन त्यानुसार त्यांना नुकसान भरपाई द्यावी. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पंचनामा करणे शक्य झालेले नाही, त्यांच्यासाठी महसूल विभागाकडून करण्यात आलेले पंचनामेही ग्राह्य धरल्यास शेतकऱ्यांना मदत मिळणे अधिक सोयीचे होईल. विमा कंपन्याना त्या प्रकारचे आदेश दिले तर शेतकऱ्यांना त्याचाही फायदा होईल असेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.