शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

केंद्र सरकारने आता तातडीने मदत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:27 IST

उस्मानाबाद - केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील काही गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसाणीची पाहणी केली आहे. आता केंद्र सरकारने तात्काळ ...

उस्मानाबाद - केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील काही गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसाणीची पाहणी केली आहे. आता केंद्र सरकारने तात्काळ भरीव मदत करावी, अशी अपेक्षा आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली आहे. भेटीदरम्यान त्यानी आलेल्या अधिकाऱ्यांसमाेर वस्तुस्थिती मांडून नुकसानीची माहिती दिली.

अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. मुळातच पथक उशिरा आल्याने ही परिस्थिती दाखविता येणार नसल्याचे मतही आमदार कैलास पाटील यानी व्यक्त केले. ‘बैल गेला अन् झोपा केला’ या म्हणीप्रमाणे केंद्राची कार्यपध्दती असल्याने किमान आता आल्यानंतर तरी वस्तुनिष्ट अहवाल द्यावा, मागणी आमदार पाटील यानी यावेळी केली. बहुभुधारक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या ओहत. परंतु, केंद्राच्या जाचक अटीमुळे अशा शेतकर्यांना मदत मिळालेली नाही. हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. याबाबतीत केंद्र सरकारने काहीतरी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. या मदतीला दिरंगाई झाल्यास त्यांना पुढील हंगामात पिके घेता येणार नाहीत. त्यामुळे या प्रश्नाकडे अधिक सहानुभुतीने पाहण्याची गरज असल्याचेही आमदार पाटील यांनी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांना सांगितले.

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले असून केंद्राकडून अधिक अपेक्षा असतात. मात्र तिथेच दिरंगाई झाल्याने शेतकऱ्यांतून तीव्र भावना व्यक्त होत आहेत.

चाैकट...

विमा कंपन्यानी व्ययक्तीक पंचनामा ग्राह्य धरुन त्यानुसार त्यांना नुकसान भरपाई द्यावी. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पंचनामा करणे शक्य झालेले नाही, त्यांच्यासाठी महसूल विभागाकडून करण्यात आलेले पंचनामेही ग्राह्य धरल्यास शेतकऱ्यांना मदत मिळणे अधिक सोयीचे होईल. विमा कंपन्याना त्या प्रकारचे आदेश दिले तर शेतकऱ्यांना त्याचाही फायदा होईल असेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.