शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

आत्महत्या केलेल्या ७६ शेतकऱ्यांची प्रकरणे पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:15 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत आत्महत्या केलेल्या ९४ शेतकऱ्यांच्या प्रकरणांचे पुनर्विलोकन करून ...

उस्मानाबाद : जिल्ह्यात १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत आत्महत्या केलेल्या ९४ शेतकऱ्यांच्या प्रकरणांचे पुनर्विलोकन करून त्यापैकी ७६ प्रकरणे पात्र ठरवून त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचा निर्णय जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीने घेतला आहे. संबंधित कुटुंबांना एक लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचा आदेशही संबंधित तहसीलदारांना दिला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शनिवारी येथे दिली.

जिल्ह्यात यापूर्वी जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीकडून शासन निर्णयातील सुधारित निकषानुसार शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, मान्यताप्राप्त सावकार यांच्याकडून कर्ज घेतले असल्यास आणि या कर्जाची परतफेड न करता आल्यामुळे कर्जाचे हप्ते प्रलंबित असल्यास त्या व्यक्तीस मदतीसाठी पात्र ठरविण्यात यावे, या एकाच निकषानुसार शेतकरी आत्महत्या प्रकरणे ही पात्र किंवा अपात्र ठरविण्यात येत होती. त्या निकषानुसार १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीने एकूण ९४ शेतकरी आत्महत्या प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली होती. या ९४ अपात्र शेतकरी आत्महत्या प्रकरणांबाबत औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांकडे २४ डिसेंबर २०२० रोजी औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये विभागीय आयुक्तांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये अपात्र होणाऱ्या प्रकरणांची संख्या खूप असून, त्याचा फेरआढावा घेण्याबाबत सूचना केली होती.

त्यानुसार उस्मानाबाद जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक ४ जानेवारी रोजी पार पडली. यात १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत अपात्र झालेल्या ९४ शेतकरी आत्महत्या प्रकरणांचे पुनर्विलोकन करण्यात आले. या अपात्र ९४ शेतकरी आत्महत्या प्रकरणांबाबत शासन निर्णय २३ जानेवारी २००६ नुसार नापिकी, राष्ट्रीयीकृत बँक/ सहकारी बँक किंवा मान्यताप्राप्त सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे होणारे कर्ज आणि कर्जपरतफेडीचा तगादा या तीन कारणांमुळे आत्महत्या घडली असल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या वारसांना १ लाख रुपये मदत देय राहील, असे नमूद आहे. त्यानुसार या अपात्र ९४ शेतकरी आत्महत्या प्रकरणांपैकी ७६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या या नापिकीमुळे झाल्याचे दिसून आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.