शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या केलेल्या ७६ शेतकऱ्यांची प्रकरणे पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:15 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत आत्महत्या केलेल्या ९४ शेतकऱ्यांच्या प्रकरणांचे पुनर्विलोकन करून ...

उस्मानाबाद : जिल्ह्यात १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत आत्महत्या केलेल्या ९४ शेतकऱ्यांच्या प्रकरणांचे पुनर्विलोकन करून त्यापैकी ७६ प्रकरणे पात्र ठरवून त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचा निर्णय जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीने घेतला आहे. संबंधित कुटुंबांना एक लाख रुपयांचा निधी वितरित करण्याचा आदेशही संबंधित तहसीलदारांना दिला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शनिवारी येथे दिली.

जिल्ह्यात यापूर्वी जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीकडून शासन निर्णयातील सुधारित निकषानुसार शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, मान्यताप्राप्त सावकार यांच्याकडून कर्ज घेतले असल्यास आणि या कर्जाची परतफेड न करता आल्यामुळे कर्जाचे हप्ते प्रलंबित असल्यास त्या व्यक्तीस मदतीसाठी पात्र ठरविण्यात यावे, या एकाच निकषानुसार शेतकरी आत्महत्या प्रकरणे ही पात्र किंवा अपात्र ठरविण्यात येत होती. त्या निकषानुसार १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीमध्ये जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीने एकूण ९४ शेतकरी आत्महत्या प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली होती. या ९४ अपात्र शेतकरी आत्महत्या प्रकरणांबाबत औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांकडे २४ डिसेंबर २०२० रोजी औरंगाबाद विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये विभागीय आयुक्तांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये अपात्र होणाऱ्या प्रकरणांची संख्या खूप असून, त्याचा फेरआढावा घेण्याबाबत सूचना केली होती.

त्यानुसार उस्मानाबाद जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीची बैठक ४ जानेवारी रोजी पार पडली. यात १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत अपात्र झालेल्या ९४ शेतकरी आत्महत्या प्रकरणांचे पुनर्विलोकन करण्यात आले. या अपात्र ९४ शेतकरी आत्महत्या प्रकरणांबाबत शासन निर्णय २३ जानेवारी २००६ नुसार नापिकी, राष्ट्रीयीकृत बँक/ सहकारी बँक किंवा मान्यताप्राप्त सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे होणारे कर्ज आणि कर्जपरतफेडीचा तगादा या तीन कारणांमुळे आत्महत्या घडली असल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या वारसांना १ लाख रुपये मदत देय राहील, असे नमूद आहे. त्यानुसार या अपात्र ९४ शेतकरी आत्महत्या प्रकरणांपैकी ७६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या या नापिकीमुळे झाल्याचे दिसून आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.