शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बायपास बनतोय ‘अपघाती मार्ग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST

(फोटो : १४ अजित) तुळजापूर : शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी व वाहन चालकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरानजीक उस्मानाबाद-लातूर - सोलापूर ...

(फोटो : १४ अजित)

तुळजापूर : शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी व वाहन चालकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरानजीक उस्मानाबाद-लातूर - सोलापूर या बायपास मार्गाचे काम हाती घेण्यात आले. परंतु, मागील वर्षभरापासून हे काम अर्धवट अवस्थेत रखडल्यामुळे अपघात वाढले असून, या मार्गाची ओळखच आता ‘अपघाती मार्ग’ अशी होऊ लागली आहे.

तुळजापूरनजीकच्या उस्मानाबाद - लातूर - सोलापूर या बायपास महामार्गावर तडवळा गावानजीक व सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गावर वर्षभरापासून हे काम अर्धवट अवस्थेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तडवळानजीक देशमाने यांच्या शेतीजवळ रखडलेल्या रस्त्यामुळे वर्षभरात तब्बल १० ते १५ अपघात घडले असून, यामध्ये काहींना कायम अपंगत्व आले आहे. अन्य किरकोळ जखमी झाले असून, या अपघातात चारचाकी गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच या बायपास मार्गावर लातूर रस्त्यावर चौक तयार झाला आहे. हा चौक लहान असल्याने वाहने वळवताना, समोरा-समोर वाहनांचा अपघात घडत आहेत. चार पदरी रस्ता असल्याने वाहने सुसाट असतात. मात्र, रस्त्यावर पुढे चौक असल्याबाबतचा सूचना फलक लावण्याची तसदीही घेण्यात आलेली नाही. शिवाय, चार बाजूने येणाऱ्या रस्त्यावर गतिरोधकाचाही पत्ता नाही. त्यामुळे भरधाव वेगात आलेल्या वाहनांचे अपघात घडून वर्षभरात जवळपास ५ जणांना प्राण गमवावे लागले. बायपास मार्गावर माळी यांच्या शेताजवळील काम अर्धवट असून, नळदुर्गकडे जाण्यासाठी सोडण्यात आलेल्या सर्व्हीस रस्त्याचे कामही करण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन हे काम तत्काळ मार्गी लावावे, अशी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.

सिमेंट रस्त्याला गेले तडे !

बायपास रस्त्याची कामे करत असताना संबंधित ठेकेदाराकडून शासनाचे नियम व अटी चक्क धाब्यावर बसवत हे काम निकृष्ट दर्जाचे केले. यामुळे सद्यस्थितीत सिमेंट रस्त्यावर ठिकठिकाणी तडे जाऊन रस्ता उखडत असल्याचे दिसत आहे. शिवाय, अर्धवट कामे पूर्ण करण्याऐवजी टोलची वसुली सुरू करण्यात आल्याने वाहनधारकांत संताप व्यक्त होत आहे.

गतिरोधकाची गरज

बायपास चौकात आल्यानंतर चारही बाजूच्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण राखण्यासाठी गतिरोधक टाकणे आवश्यक आहे. मात्र, येथे संबंधित ठेकेदाराने गतिरोधक टाकले नसल्यामुळे येथे अपघात घडून जवळपास पाच ते सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. तसेच अनेक वाहनांच्या चुराडा झाला आहे. सध्या किरकोळ अपघात वारंवार घडत आहेत. या चौकात विजेची सोय नाही. काम अर्धवट असल्यामुळे ठेकेदाराने सूचना फलक लावून वाहनधारकांना याची कल्पना देणे गरजेचे आहे. परंतु, या मार्गावर कुठेही असे फलक दिसून येत नाहीत. त्यामुळे वाहने सुसाट धावतात. तसेच उड्डाण पुलावरील विद्युत दिवेही बंद राहात असल्यामुळे उभारलेले खांब केवळ शोभेच्या वस्तू ठरत आहेत.