शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

बायपास बनतोय ‘अपघाती मार्ग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST

(फोटो : १४ अजित) तुळजापूर : शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी व वाहन चालकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरानजीक उस्मानाबाद-लातूर - सोलापूर ...

(फोटो : १४ अजित)

तुळजापूर : शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी व वाहन चालकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरानजीक उस्मानाबाद-लातूर - सोलापूर या बायपास मार्गाचे काम हाती घेण्यात आले. परंतु, मागील वर्षभरापासून हे काम अर्धवट अवस्थेत रखडल्यामुळे अपघात वाढले असून, या मार्गाची ओळखच आता ‘अपघाती मार्ग’ अशी होऊ लागली आहे.

तुळजापूरनजीकच्या उस्मानाबाद - लातूर - सोलापूर या बायपास महामार्गावर तडवळा गावानजीक व सोलापूरकडे जाणाऱ्या मार्गावर वर्षभरापासून हे काम अर्धवट अवस्थेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तडवळानजीक देशमाने यांच्या शेतीजवळ रखडलेल्या रस्त्यामुळे वर्षभरात तब्बल १० ते १५ अपघात घडले असून, यामध्ये काहींना कायम अपंगत्व आले आहे. अन्य किरकोळ जखमी झाले असून, या अपघातात चारचाकी गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच या बायपास मार्गावर लातूर रस्त्यावर चौक तयार झाला आहे. हा चौक लहान असल्याने वाहने वळवताना, समोरा-समोर वाहनांचा अपघात घडत आहेत. चार पदरी रस्ता असल्याने वाहने सुसाट असतात. मात्र, रस्त्यावर पुढे चौक असल्याबाबतचा सूचना फलक लावण्याची तसदीही घेण्यात आलेली नाही. शिवाय, चार बाजूने येणाऱ्या रस्त्यावर गतिरोधकाचाही पत्ता नाही. त्यामुळे भरधाव वेगात आलेल्या वाहनांचे अपघात घडून वर्षभरात जवळपास ५ जणांना प्राण गमवावे लागले. बायपास मार्गावर माळी यांच्या शेताजवळील काम अर्धवट असून, नळदुर्गकडे जाण्यासाठी सोडण्यात आलेल्या सर्व्हीस रस्त्याचे कामही करण्यात आलेले नाही. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन हे काम तत्काळ मार्गी लावावे, अशी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.

सिमेंट रस्त्याला गेले तडे !

बायपास रस्त्याची कामे करत असताना संबंधित ठेकेदाराकडून शासनाचे नियम व अटी चक्क धाब्यावर बसवत हे काम निकृष्ट दर्जाचे केले. यामुळे सद्यस्थितीत सिमेंट रस्त्यावर ठिकठिकाणी तडे जाऊन रस्ता उखडत असल्याचे दिसत आहे. शिवाय, अर्धवट कामे पूर्ण करण्याऐवजी टोलची वसुली सुरू करण्यात आल्याने वाहनधारकांत संताप व्यक्त होत आहे.

गतिरोधकाची गरज

बायपास चौकात आल्यानंतर चारही बाजूच्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण राखण्यासाठी गतिरोधक टाकणे आवश्यक आहे. मात्र, येथे संबंधित ठेकेदाराने गतिरोधक टाकले नसल्यामुळे येथे अपघात घडून जवळपास पाच ते सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. तसेच अनेक वाहनांच्या चुराडा झाला आहे. सध्या किरकोळ अपघात वारंवार घडत आहेत. या चौकात विजेची सोय नाही. काम अर्धवट असल्यामुळे ठेकेदाराने सूचना फलक लावून वाहनधारकांना याची कल्पना देणे गरजेचे आहे. परंतु, या मार्गावर कुठेही असे फलक दिसून येत नाहीत. त्यामुळे वाहने सुसाट धावतात. तसेच उड्डाण पुलावरील विद्युत दिवेही बंद राहात असल्यामुळे उभारलेले खांब केवळ शोभेच्या वस्तू ठरत आहेत.