शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाचा खड्डा खोदताना दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST

माणकेश्वर (जि.उस्मानाबाद) : शौचालयाची पहिली टाकी भरल्याने दुसरा खड्डा तयार करताना लगतची टाकी फुटून त्यातील पाणी नव्या खड्ड्यात शिरल्याने ...

माणकेश्वर (जि.उस्मानाबाद) : शौचालयाची पहिली टाकी भरल्याने दुसरा खड्डा तयार करताना लगतची टाकी फुटून त्यातील पाणी नव्या खड्ड्यात शिरल्याने त्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना माणकेश्वर (जि.उस्मानाबाद) येथे गुरुवारी दुपारी घडली आहे.

भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे ८ जुलै रोजी दुपारी संदीप भाऊ माळी यांच्या घरी शौचालयाचा शोषखड्डा खोदण्याचे काम सुरू होते. पूर्वीच्या शौचालयाचा शोषखड्डा पूर्णपणे भरून तो जाम झाल्याने लगतच नवीन खड्डा घेण्यात येत होता. हा नवीन खड्डा साधारणत: सात ते आठ फुटापर्यंत खोल गेलेला होता. उर्वरित काम करीत असतानाच शेजारील शौचालयाचा जुना खड्डा कोठे आहे, याचा अंदाज न आल्याने त्यास धक्का लागून तो फुटला. त्यामुळे जुन्या खड्ड्यातील घाण पाणी, माती हे नवीन खड्ड्यात वेगाने उतरले. यावेळी नवीन खड्ड्यात काम करीत असलेले मजूर रघुनाथ रनदिल हे पाण्यात पूर्णत: बुडाले. त्यांना कामात मदत करणारे संदीप बाळू माळी हे रघुनाथ रनदिल यांना वाचविण्यासाठी खड्ड्यात उतरले. मात्र, ते खड्ड्यात फसले. हे पाहून त्यांचे लहान भाऊ अमोल बाळू माळी हे मदतीसाठी खड्ड्यात उतरले. परंतु, खोलीचा अंदाज न आल्याने तेही पाण्यात बुडाले. या घटनेत रघुनाथ रनदिल व अमोल माळी यांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच काही नागरिकांनी जेसीबीच्या मदतीने दोघांनाही बाहेर काढून रुग्णालयात नेले असता तेथे मृत घोषित करण्यात आले. मयत मजूर रघुनाथ रनदिल (५७) यांना तीन मुले व दोन मुली असा परिवार आहे. तर दुसरे मयत अमोल माळी (३१) यांना ३ वर्षांची मुलगी आहे. या घटनेने माणकेश्वर गावात हळहळ व्यक्त झाली.

वाचविण्यासाठी गेलेला एक जण वाचला...

मजूरकाम करीत असलेले रघुनाथ रनदिल हे पाण्याखाली गेल्याचे पाहून संदीप माळी हे खड्ड्यातील पाण्यात उतरले. मात्र, ते अर्ध्यातच फसल्याने डोके वर राहिले. मात्र, दुर्गंधीने ते बेशुद्ध पडले. हा प्रकार लक्षात येताच संदीप यांचे भाऊ अमोल माळी यांनी दोघांनाही वाचविण्यासाठी खड्ड्यात उडी घेतली. मात्र, लागलीच तेही या पाण्यात बुडून खाली गेले. ही घटना कळताच नागरिकांनी जेसीबी आणून सर्वांना बाहेर काढले. तेव्हा रघुनाथ व अमोल हे मृत झाले होते. तर संदीप हे काळी वेळाने शुद्धीवर आले.