शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

भातंब्रा ग्रामपंचायत तरुणांच्या हातात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:29 IST

तुळजापूर : तालुक्यातील भातंब्री येथील २७ वर्षीय तरुणाने ग्रामपंचायतीच्या परिवर्तनासाठी पुढाकार घेत ग्राम विकास युवा पॅनेलच्या माध्यमातून पाच जागा ...

तुळजापूर : तालुक्यातील भातंब्री येथील २७ वर्षीय तरुणाने ग्रामपंचायतीच्या परिवर्तनासाठी पुढाकार घेत ग्राम विकास युवा पॅनेलच्या माध्यमातून पाच जागा बिनविरोध मिळविल्या. तसेच निवडणूक झालेल्या दोन्ही जागा ताब्यात घेण्यातही त्यांना यश आले. यामुळे या ग्रामपंचायतीचा कारभार आता तरुणांच्या हातात आला आहे.

तुळजापूर-अक्कलकोट या राज्यमहामार्गावर जवळपास ६७५ लोकसंख्येचे भातंब्री गाव आहे. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या सात आहे. ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हाल सहन करावे लागत आहेत. गावांतर्गत रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या सिंचन विहीर योजनेपासून शेतकरी वंचित आहेत. अशा अनेक समस्या गावात निर्माण झाल्याने गावातीलच एम.कॉम. शिक्षण घेतलेल्या रवी बंडगर (पाटील) या तरुणाने मागील पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी बाकावर बसून गावातील अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्यावर विश्वास ठेवत ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी राहिले. या निवडणुकीत बंडगर यांच्या पॅनेलमधून सुनंदा बंडगर, सीताबाई सलगर, सुरेखा लोंढे, रवी बंडगर, गुणवंत बंडगर हे पाचजण बिनविरोध, तर कृष्णा लोंढे, निलावती कांबळे हे दोघे निवडणूक लढवून निवडून आले.

कोट.....

गावात बदल होणे गरजेचे होते. या माध्यमातून तरुणांना नवीन संधी मिळाली आहे. ग्रामपंचयातीचा कारभार सुरळीत सुरू झाल्यानंतर गावचा प्रमुख असलेला पाणीप्रश्न मार्गी लावला जाईल. यासोबतच अंतर्गत रस्ते, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिका, महिलांना उद्योग, व्यवसायात वाव मिळण्यासाठी बँकांच्या माध्यमातून अर्थसाहाय्य, प्रत्येक शेतकऱ्याला सिंचन वाढीसाठी मनरेगा योजनेच्या माध्यमातून सिंचन विहीर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.

- रवी बंडगर