शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

खोलीकरण कामात तांत्रिक मापदंडाला बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:31 IST

(फोटो : बालाजी आडसूळ १८) कळंब : तालुक्यातील बहुला येथील मांजरा नदीच्या खोलीकरण कामास मुहूर्त लागला असला तरी हे ...

(फोटो : बालाजी आडसूळ १८)

कळंब : तालुक्यातील बहुला येथील मांजरा नदीच्या खोलीकरण कामास मुहूर्त लागला असला तरी हे काम तांत्रिक मापदंडानुसार होत नसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. याबाबत स्थानिकांनी थेट जलसंधारण खात्याकडे तक्रार केली आहे. सदर काम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असल्याने ते योग्य पद्धतीने करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

गोदावरी खोऱ्यातील प्रमुख नदी असोलली मांजरा नदी ही तालुक्याची तसेच बीड व उस्मानाबाद जिल्ह्याची सीमारेषा बनून प्रवाही होते. कळंब तालुक्यातील बहुला शिवारात ती तालुक्यात प्रवेशित होते. पुढे नदीकाठावर आढळा, खोंदला, आथर्डी, सात्रा, कळंब, भाटसांगवी आदी गावांचा शेत शिवार येतो.

शेती क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली नदी मात्र झाडाझुडपात लुप्त झाल्यासारखी दिसत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी प्रवाहमार्गात अनावश्यक भराव निर्माण झाले आहेत. यामुळे पावसाळ्याच्या उत्तरार्धात अपेक्षित असा पाणीसाठा राहात नाही. याचा शेतीस फटका बसतो.

हाच धागा पकडत सदर नदीचे बहुला हद्दीत सध्या जिल्हा जलसंधारण कार्यालायाच्यावतीने खोलीकरण करण्यात येत आहे. सदर काम करताना तांत्रिक मापदंडानुसार काम होत नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.

रूंदी, खोली, भराव यासंदर्भात अनेक अनियमितता आहेत, असे शेतकऱ्यांनी पाहिल्यानंतर समोर आले आहे. याची ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे कैफियत मांडल्यानंतर ग्रामपंचायतीने विशेष सभेत या कामाची चौकशी करून काम योग्य पद्धतीने करून द्यावे, असा ठराव घेतला आहे. शिवाय याची जिल्हा जलसंधारण अधिकारी ते मंत्री यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे.

खोलीकरणात खोलीचा अभाव

यासंदर्भात गावातील आश्रुबा बिक्कड यांच्यासह काही शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कामावर जात कोट्यवधी रुपयांच्या तीन कामांची पाहणी केली. यावेळी खोलीची मोजणी केली असता ती फूट ते दीड फूट दिसून आली. याविषयी संबंधितांना बोलूनही काही उपयोग झाला नाही. यामुळे शेवटी याविषयी वरिष्ठांना निवेदन दिले आहे. यावर सरपंच आशा बिक्कड, उपसरपंच सुरेश शेळके, सदस्य कमल बिक्कड, स्वाती शेळके, पल्लवी पवार, सुमन यादव, पोपट कोठावळे यांच्यासह अश्रुबा कोठावळे, अनिल कोठावळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

अद्याप काम पूर्ण नाही

याविषयी जलसंधारण विभागाचे अभियंता काकडे यांच्याशी संपर्क साधला असता सदर गाव शिवारात तीन कामे आहेत. एजन्सीने अद्याप काम पूर्ण केलेले नाही. सध्या यंत्रणा नसल्याने तूर्त काम बंद आहे. पुढच्या काही दिवसांत आणखी आवश्यक तेथे काम करुन घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.