शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

बँका सुरू ठेवण्यास मिळाली मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:31 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने २४ मे पर्यंत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आदेश काढले आहेत. ...

उस्मानाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने २४ मे पर्यंत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आदेश काढले आहेत. या कालावधीत वैद्यकीय व इतर काही अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण आस्थापना बंद ठेवण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. मात्र, आदेशात बँकांचा उल्लेख नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता. यानंतर शनिवारी बँका सुरू ठेवण्यास निर्बंधातून सूट देण्यात आल्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी काढले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी ब्रेक दि चेन अभियानांतर्गत लागू असलेले निर्बंधांची अंमलबजावणी सुरू होती. दरम्यान, यात काही अत्यावश्यक सेवांना सवलत देण्यात आलेली आहे. मात्र, त्यामुळे गर्दी होत असल्याचा दावा करीत जिल्हा प्रशासनाने काही संघटना, नागरिकांची मागणी लक्षात घेता जिल्ह्यात जनता कर्फ्यू पाळण्याचे आदेश शुक्रवारी रात्री काढले आहेत. १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपासून ते २४ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. दरम्यान, या आदेशात बँकांचा कसलाही उल्लेख नसल्याने व्यापारी, नागरिक व बँकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. काही व्यापाऱ्यांनी आमदार कैलास पाटील यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडे ही कैफियत मांडली. आ. पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा करून संभ्रम दूर करण्याबाबत सांगितले. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी शनिवारी एक आदेश काढत जनता कर्फ्यूच्या आदेशात बँका बंद ठेवण्याबाबत कोणतीही सूचना दिलेल्या नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी, खासगी बँका या सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत नागरिकांसाठी चालू राहतील. त्यानंतर प्रवेशद्वार बंद करून केवळ कार्यालयीन कामकाज करता येईल, असे या आदेशाद्वारे कळविले आहे.

दुधाबाबतीतही निर्णय आवश्यक

बेकरी बंद राहिल्याने कोणी उपाशी राहत नाही. मात्र, हॉटेल्स बंद ठेवल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी कसरत होत आहे. दरम्यान, शहरातील काही संस्था, पदाधिकाऱ्यां सामाजिक भान जपत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अन्नदानाचे कार्य सुरू केल्याने बऱ्यापैकी गैरसोय कमी झाली. परंतु, दूध विक्री करणारे केंद्र बंद ठेवण्याबाबतही असाच संभ्रम कायम आहे. जनता कर्फ्यूच्या आदेशात दुधाबाबतीत कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे विक्री केंद्र बंद राहिले. परिणामी, लहान बालकांसाठी अत्यावश्यक असलेले दूध शनिवारी मिळू शकले नाही. सकाळी किमान दोन तासांसाठी का होईना, दूध विक्री सुरू ठेवण्यास मुभा देणे गरजेचे आहे.

रस्त्यावरील वर्दळ कमी होईना...

जनता कर्फ्यू लागू असला, तरी शनिवारी मुख्य रस्त्यांवर वर्दळ कायम असल्याचे दिसून आले. पोलीस छत्रपती शिवाजी महाराज चौक व अन्य भागातही काही ठिकाणी तपासणी, कारवाई करताना दिसले. मात्र, समोर पोलीस दिसताच चकवा देऊन दुसऱ्या मार्गाने पळ काढणारे वाहनधारकही याठिकाणी दिसून येत होते. रस्त्यावरील वाहनांची वर्दळ पाहता, हे सर्वजण खरेच वैद्यकीय कारणास्तव फिरत असतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.