शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बँका सुरू ठेवण्यास मिळाली मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:31 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने २४ मे पर्यंत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आदेश काढले आहेत. ...

उस्मानाबाद : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने २४ मे पर्यंत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आदेश काढले आहेत. या कालावधीत वैद्यकीय व इतर काही अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण आस्थापना बंद ठेवण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. मात्र, आदेशात बँकांचा उल्लेख नसल्याने संभ्रम निर्माण झाला होता. यानंतर शनिवारी बँका सुरू ठेवण्यास निर्बंधातून सूट देण्यात आल्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी काढले आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी ब्रेक दि चेन अभियानांतर्गत लागू असलेले निर्बंधांची अंमलबजावणी सुरू होती. दरम्यान, यात काही अत्यावश्यक सेवांना सवलत देण्यात आलेली आहे. मात्र, त्यामुळे गर्दी होत असल्याचा दावा करीत जिल्हा प्रशासनाने काही संघटना, नागरिकांची मागणी लक्षात घेता जिल्ह्यात जनता कर्फ्यू पाळण्याचे आदेश शुक्रवारी रात्री काढले आहेत. १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपासून ते २४ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. दरम्यान, या आदेशात बँकांचा कसलाही उल्लेख नसल्याने व्यापारी, नागरिक व बँकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. काही व्यापाऱ्यांनी आमदार कैलास पाटील यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडे ही कैफियत मांडली. आ. पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा करून संभ्रम दूर करण्याबाबत सांगितले. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी शनिवारी एक आदेश काढत जनता कर्फ्यूच्या आदेशात बँका बंद ठेवण्याबाबत कोणतीही सूचना दिलेल्या नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी, खासगी बँका या सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत नागरिकांसाठी चालू राहतील. त्यानंतर प्रवेशद्वार बंद करून केवळ कार्यालयीन कामकाज करता येईल, असे या आदेशाद्वारे कळविले आहे.

दुधाबाबतीतही निर्णय आवश्यक

बेकरी बंद राहिल्याने कोणी उपाशी राहत नाही. मात्र, हॉटेल्स बंद ठेवल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी कसरत होत आहे. दरम्यान, शहरातील काही संस्था, पदाधिकाऱ्यां सामाजिक भान जपत रुग्णांच्या नातेवाईकांसाठी अन्नदानाचे कार्य सुरू केल्याने बऱ्यापैकी गैरसोय कमी झाली. परंतु, दूध विक्री करणारे केंद्र बंद ठेवण्याबाबतही असाच संभ्रम कायम आहे. जनता कर्फ्यूच्या आदेशात दुधाबाबतीत कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे विक्री केंद्र बंद राहिले. परिणामी, लहान बालकांसाठी अत्यावश्यक असलेले दूध शनिवारी मिळू शकले नाही. सकाळी किमान दोन तासांसाठी का होईना, दूध विक्री सुरू ठेवण्यास मुभा देणे गरजेचे आहे.

रस्त्यावरील वर्दळ कमी होईना...

जनता कर्फ्यू लागू असला, तरी शनिवारी मुख्य रस्त्यांवर वर्दळ कायम असल्याचे दिसून आले. पोलीस छत्रपती शिवाजी महाराज चौक व अन्य भागातही काही ठिकाणी तपासणी, कारवाई करताना दिसले. मात्र, समोर पोलीस दिसताच चकवा देऊन दुसऱ्या मार्गाने पळ काढणारे वाहनधारकही याठिकाणी दिसून येत होते. रस्त्यावरील वाहनांची वर्दळ पाहता, हे सर्वजण खरेच वैद्यकीय कारणास्तव फिरत असतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.