शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
4
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
5
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
6
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
7
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
8
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
9
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
10
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
11
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
12
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
13
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
14
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
15
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
16
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
17
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
18
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
19
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
20
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता

लोहारा तहसीलवर ‘प्रहार’चा बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 18:42 IST

उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून आज लोहारा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

लोहारा (उस्मानाबाद )  : उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून आज लोहारा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पावसाअभावी खरीप हंगाम हातचा गेला आहे. असे असतानाही खरीप पिकाची आणेवारी ६० पैसे पेक्षा अधिक असल्याचा अहवाल प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. हा अहवाल शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे प्रशासनाने नव्याने वस्तुनिष्ठ पैसेवारी जाहीर करावी, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी, चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे आदी मागण्यांसाठी मंगळवारी प्रहार जनशक्ती पक्षाकडून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

शहरातील मुख्य मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. परंतु, मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीही अधिकारी कार्यालयाच्या बाहेर येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर घोषणाबाजी करीत कार्यकर्ते तहसीलमध्ये घुसले. मरत्र, कार्यालयातही तहसीलदार अथवा नायब तहसीलदार कोणीच हजर नव्हते. त्यामुळे ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांच्या रिकाम्या खुर्चिला हार घालून निवेदन देण्याचा निर्णय घेतला असता, काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर अव्वल कारकुन बालाजी चामे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी आण्णासाहेब दराडे, अ‍ॅड. जयपाल पाटील, मनोज जाधव, महमंद आत्तार, दत्ता झिंगाडे, वामन मुळे, बालाजी बनसोडे, जिंदावली मोमिन, किसन कुलकर्णी, उमरआली शेख, जुबेद शेख, शमशोद्दीन शेख, हैदर शेख, रमेश नागरगोजे, कालीदास घुगे, जयपाल पाटील, उमेश गवळी, महादेव जाधवर, फारुक शेख आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादdroughtदुष्काळMorchaमोर्चा