शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

लोहारा तहसीलवर ‘प्रहार’चा बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 18:42 IST

उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून आज लोहारा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

लोहारा (उस्मानाबाद )  : उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून आज लोहारा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पावसाअभावी खरीप हंगाम हातचा गेला आहे. असे असतानाही खरीप पिकाची आणेवारी ६० पैसे पेक्षा अधिक असल्याचा अहवाल प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. हा अहवाल शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे प्रशासनाने नव्याने वस्तुनिष्ठ पैसेवारी जाहीर करावी, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी, चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे आदी मागण्यांसाठी मंगळवारी प्रहार जनशक्ती पक्षाकडून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

शहरातील मुख्य मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. परंतु, मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीही अधिकारी कार्यालयाच्या बाहेर येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर घोषणाबाजी करीत कार्यकर्ते तहसीलमध्ये घुसले. मरत्र, कार्यालयातही तहसीलदार अथवा नायब तहसीलदार कोणीच हजर नव्हते. त्यामुळे ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांच्या रिकाम्या खुर्चिला हार घालून निवेदन देण्याचा निर्णय घेतला असता, काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर अव्वल कारकुन बालाजी चामे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी आण्णासाहेब दराडे, अ‍ॅड. जयपाल पाटील, मनोज जाधव, महमंद आत्तार, दत्ता झिंगाडे, वामन मुळे, बालाजी बनसोडे, जिंदावली मोमिन, किसन कुलकर्णी, उमरआली शेख, जुबेद शेख, शमशोद्दीन शेख, हैदर शेख, रमेश नागरगोजे, कालीदास घुगे, जयपाल पाटील, उमेश गवळी, महादेव जाधवर, फारुक शेख आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादdroughtदुष्काळMorchaमोर्चा