उस्मानाबाद - ‘आझादी का अमृतमहाेत्सव या देशपातळीवरील कार्यक्रमाचा भाग म्हणून येथील कार्यालयात प्रधानमंत्री ग्रामसडक याेजनेबाबत जनजागृती कार्यक्रम १८ ऑगस्ट राेजी कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. जनजागृतीपर कार्यक्रमात विविध विषयांवर चर्चासत्रेही ठेवण्यात आली हाेती. यावेळी कार्यकारी अभियंता पाटील यांनी वृक्षलागवड व त्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. निसर्गाचा समताेल राखण्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावणे गरजेचे आहे. केवळ झाडे लावून चालणार नाही, तर त्यांचे संगाेपन करण्याची जबाबदारीही स्वीकारावी लागणार आहे. यानंतर उपअभियंता अनिल जाधव यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक याेजनेमुळे झालेले सामाजिक व आर्थिक फायदे उपस्थितांसमाेर मांडले. साेबतच उपअभियंता अझराेद्दीन सय्यद यांनीही याेजनेच्या अनुषंगाने माहिती दिली. शाखा अभियंता भगत यांनी पूल बांधणे, क्रांती लाेकरे यांनी रस्त्याच्या गुणवत्तेच्या अनुषंगाने केलेल्या चाचण्या तसेच प्रक्रियेची माहिती दिली. कार्यक्रमास विविध तालुक्यांतील सरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ उपस्थित हाेते. कार्यक्रमाचा विशेष भाग म्हणून सय्यद यांनी रस्ते सुरक्षा या विषयावर चलचित्राद्वारे सादरीकरण केले. सूत्रसंचालन गडकर यांनी तर आभार उपअभियंता लाेकरे यांनी मानले.
प्रधानमंत्री ग्रामसडक याेजनेबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:36 IST