शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

उमरग्यात ७० टक्के विद्यार्थ्यांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:28 IST

उमरगा : डिसेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या नववी ते बारावीच्या वर्गासाठी विविध शाळांनी केलेल्या उपाययोजना, विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या जात असलेले ...

उमरगा : डिसेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या नववी ते बारावीच्या वर्गासाठी विविध शाळांनी केलेल्या उपाययोजना, विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या जात असलेले नियमांचे पालन यामुळे या वर्गांची पटसंख्या वाढली आहे. शालेय विभागाच्या सूचनेनुसार २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले असून, सुमारे ७० टक्के विद्यार्थी हजर राहत असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

कोरोना महामारीमुळे मागील शैक्षणिक वर्षाच्या अखेरीपासून शाळा बंद करण्यात आल्या. शिवाय परीक्षाही रद्द करण्यात आल्या. यामुळे शासनाच्या आदेशानुसार सर्व शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले. शाळा बंद काळात शिक्षकांनी विविध विषयांचे अभ्यासाचे ऑनलाइन व्हिडिओ टाकले. परंतु, विद्यार्थीदेखील ऑनलाइन अभ्यासक्रमास कंटाळले होते. त्यातच बऱ्याच पालकांकडे अन्ड्रॉइड मोबाइल नसल्याने ऑनलाइन अभ्यासक्रमास अडचणी येत होत्या. परंतु, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, दुसरीकडे ऑनलाइन शिक्षणातदेखील अनेक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाच्या शालेय विभागाने पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. यासाठी पालकांकडून संमतीपत्रही भरून घेण्यात आले आहेत. शाळा खोल्या निर्जंतुक करण्यात आल्या असून, सर्व शाळांमध्ये तापमान व ऑक्सिजन तपासणी करण्यात येत आहे.

दरम्यान, शाळा सुरू होण्यापूर्वी उमरगा तालुक्यातील नववी ते बारावी तसेच पाचवी ते आठवी वर्गाला शिकविणाऱ्या ६२३ शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात चार शिक्षक वगळता कोणलाही कोरोनाची बाधा झालेली दिसून आली नाही.

तालुक्यात पाचवी ते बारावी वर्गाच्या ६७ शाळात १६ हजार ३८० विद्यार्थी असून, या विद्यार्थ्याचे दररोज थर्मल गनने तापमान व रक्तातील ऑक्सिजनची तपासणी केली जात आहे. शिवाय, विद्यार्थी व शिक्षकांना मास्क बंधनकारक करण्यात आले असून, दररोज सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. शाळा प्रशासनासोबतच विद्यार्थी देखील आवश्यक काळजी घेत असून, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार हे देखील प्रत्येक शाळेच्या संपर्कात राहून आढावा घेत आहेत. यामुळे विद्यार्थी संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.

कोट...........

उमरगा तालुक्यातील व शहरातील सर्व शाळा प्रथम निर्जंतुक करण्यात आल्या असून, कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी शाळांत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. शिक्षक व विद्यार्थी यांना मास्क बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांचे शारीरिक तापमान व ऑक्सिजनचे प्रमाण मोजले जात आहे. ६२३ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. समाधानाची बाब म्हणजे शाळा सुरू होऊन १०० दिवस लोटले असून आता शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ७० टक्क्यांपर्यंत गेली आहे.

- शिवकुमार बिराजदार, गटशिक्षण अधिकारी, उमरगा