शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

उमरग्यात ७० टक्के विद्यार्थ्यांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:28 IST

उमरगा : डिसेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या नववी ते बारावीच्या वर्गासाठी विविध शाळांनी केलेल्या उपाययोजना, विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या जात असलेले ...

उमरगा : डिसेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या नववी ते बारावीच्या वर्गासाठी विविध शाळांनी केलेल्या उपाययोजना, विद्यार्थ्यांकडून करून घेतल्या जात असलेले नियमांचे पालन यामुळे या वर्गांची पटसंख्या वाढली आहे. शालेय विभागाच्या सूचनेनुसार २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले असून, सुमारे ७० टक्के विद्यार्थी हजर राहत असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

कोरोना महामारीमुळे मागील शैक्षणिक वर्षाच्या अखेरीपासून शाळा बंद करण्यात आल्या. शिवाय परीक्षाही रद्द करण्यात आल्या. यामुळे शासनाच्या आदेशानुसार सर्व शाळांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले. शाळा बंद काळात शिक्षकांनी विविध विषयांचे अभ्यासाचे ऑनलाइन व्हिडिओ टाकले. परंतु, विद्यार्थीदेखील ऑनलाइन अभ्यासक्रमास कंटाळले होते. त्यातच बऱ्याच पालकांकडे अन्ड्रॉइड मोबाइल नसल्याने ऑनलाइन अभ्यासक्रमास अडचणी येत होत्या. परंतु, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, दुसरीकडे ऑनलाइन शिक्षणातदेखील अनेक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासनाच्या शालेय विभागाने पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू केले आहेत. यासाठी पालकांकडून संमतीपत्रही भरून घेण्यात आले आहेत. शाळा खोल्या निर्जंतुक करण्यात आल्या असून, सर्व शाळांमध्ये तापमान व ऑक्सिजन तपासणी करण्यात येत आहे.

दरम्यान, शाळा सुरू होण्यापूर्वी उमरगा तालुक्यातील नववी ते बारावी तसेच पाचवी ते आठवी वर्गाला शिकविणाऱ्या ६२३ शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात चार शिक्षक वगळता कोणलाही कोरोनाची बाधा झालेली दिसून आली नाही.

तालुक्यात पाचवी ते बारावी वर्गाच्या ६७ शाळात १६ हजार ३८० विद्यार्थी असून, या विद्यार्थ्याचे दररोज थर्मल गनने तापमान व रक्तातील ऑक्सिजनची तपासणी केली जात आहे. शिवाय, विद्यार्थी व शिक्षकांना मास्क बंधनकारक करण्यात आले असून, दररोज सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. शाळा प्रशासनासोबतच विद्यार्थी देखील आवश्यक काळजी घेत असून, गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार हे देखील प्रत्येक शाळेच्या संपर्कात राहून आढावा घेत आहेत. यामुळे विद्यार्थी संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.

कोट...........

उमरगा तालुक्यातील व शहरातील सर्व शाळा प्रथम निर्जंतुक करण्यात आल्या असून, कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी शाळांत विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. शिक्षक व विद्यार्थी यांना मास्क बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांचे शारीरिक तापमान व ऑक्सिजनचे प्रमाण मोजले जात आहे. ६२३ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. समाधानाची बाब म्हणजे शाळा सुरू होऊन १०० दिवस लोटले असून आता शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ७० टक्क्यांपर्यंत गेली आहे.

- शिवकुमार बिराजदार, गटशिक्षण अधिकारी, उमरगा