शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

त्रैमासिक सांख्यिकी माहितीबाबत आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:31 IST

पिकात बैल घातल्याच्या कारणावरून मारहाण उस्मानाबाद : कांद्याच्या पिकात बैल घातल्याच्या कारणावरून भांडण काढून एकास मारहाण झाल्याची घटना वाशी ...

पिकात बैल घातल्याच्या कारणावरून मारहाण

उस्मानाबाद : कांद्याच्या पिकात बैल घातल्याच्या कारणावरून भांडण काढून एकास मारहाण झाल्याची घटना वाशी तालुक्यातील कवडेवाडी येथे १० एप्रिल रोजी घडली. कवडेवाडी येथील साहेबराव कवडे हे १० एप्रिलरोजी त्यांच्या शेतात होते. यावेळी पिकात बैल सोडल्याचे कारण काढून बालाज ीकवडे यांनी साहेबराव यांना दगड व काठीने मारहाण केली. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्या वादातून एकास मारहाण

उस्मानाबाद : जुन्या वादातून एकास शिवीगाळ व मारहाण झाल्याची घटना तालुक्यातील खेड येथे ९ एप्रिल रोजी घडली. खेड येथील आयुब सय्यद हे त्यांच्या घरासमोर होते. यावेळी गावकरी मुस्तफा शेख, जावेद शेख यांनी मागील भांडणाचा वाद काढून आयुब यांना शिवीगाळ केली. तसेच लाथा-बुक्क्याने व दगडाने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी आयुब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १० एप्रिल रोजी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रक-कारची धडक; एकजण ठार

उस्मानाबाद : लातूर येथील अफरोज बागवान (हल्ली मुक्काम पुणे) हे ९ एप्रिल रोजी आई - वडिलांसह कारमधून (क्र.एमएच ०९/ एक्यू ४१११) जात होते. यावेळी एरंडवाडी पाटीजवळ ते आले असता, त्यांच्या कारला एमएच ४८/ टी ५१८० या क्रमांकाच्या ट्रकचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून बागवान यांच्या कारला धडक दिली. या अपघातात गफर बागवान यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अफरोज बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवकाळीचा फटका

(फाईल फोटो घ्यावा)

लोहारा : तालुक्याच्या काही भागात रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे केळी, द्राक्षे, चिंच, पपई, कलिंगड, खरबूज बागेसह रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले. अगोदरच कोरोनाचे संकट असताना, त्यातच पुन्हा अवकाळीच्या फटक्याने शेतकरी हतबल झाला आहे.

साईची निवड

उमरगा : तालुक्यातील तुरोरी येथील शिवराम प्राथमिक आश्रम शाळेतील पाचवी वर्गात शिकणाऱ्या साई श्रीपाद बरमदे याची सैनिक स्कूल प्रवेशासाठी निवड झाली आहे.साई याने या परीक्षेत गुणवत्ता यादीत राज्यात ३७ वा क्रमांक पटकाविला आहे. याबद्दल त्याचे कौतुक होत आहे.

योजनेस मंजुरी

उस्मानाबाद : जिल्ह्यात आगामी आर्थिक वर्षात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. यात शेतकरी कुटुंबातील दोघांना लाभ दिला जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

नागरिक बेफिकीर

उस्मानाबाद : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण पॉझिटिव्ह येत असतानाही नागरिकांकडून मात्र मास्क, सॅनिटायझर वापरासह इतर नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

जलवाहिनीला गळती

(फोटो : ००१ नावाने आहे)

उमरगा : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला सातत्याने कुठे ना कुठे गळती लागत आहे. यामुळे शहरवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यासाठी प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.