शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी, शाळांच्या पाणी याेजनांना आता ‘साेलार’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:37 IST

उस्मानाबाद : पावसाळा असाे की उन्हाळा. विजेचा लपंडाव ग्राहकांच्या नशिबी असताेच. विशेषत: पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर बारा-बारा तास पूर्ववत ...

उस्मानाबाद : पावसाळा असाे की उन्हाळा. विजेचा लपंडाव ग्राहकांच्या नशिबी असताेच. विशेषत: पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर बारा-बारा तास पूर्ववत हाेत नाही. अशावेळी शेतकऱ्यांना शाळा, अंगणवाडीतील विद्यार्थी, वाडी-वस्त्यांवरील रहिवाशांना स्रोतांना पाणी असूनही विजेअभावी टंचाईचा सामना करावा लागताे. ही बाब लक्षात घेऊन आता पाणीपुरवठा विभागाकडून १८८ याेजनांसाठी साेलार पंप बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. आजवर ४९ याेजनांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित शाळा, अंगणवाड्या तसेच वस्त्यांना वीजपुरवठा खंडित असतानाही पाणीटंचाईला ताेंड द्यावे लागणार नाही.

अंगणवाडी तसेच शाळांतील विद्यार्थ्यांना शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी विविध याेजना तसेच ग्रामस्थांनी लाेकसहभागातून कूपनलिका घेतल्या आहेत. बहुतांश कूपनलिकांना पाणीही मुबलक आहे. त्या ठिकाणी विद्युत पंपही बसविले आहेत; परंतु उन्हाळाच नव्हे, तर पावसाळा तसेच हिवाळ्यातही ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असताे. पावसाळ्यात व हिवाळ्यात ही समस्या अधिक गंभीर स्वरूप धारण करते. कारण वादळी वाऱ्यासह पाऊस झाला की, तारा तुटून वा अन्य तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित हाेताे. एकदा का वीज खंडित झाली की, बारा-बारा तास पूर्ववत हाेत नाही. हिवाळ्यात पिकांना पाणी देण्यासाठी विजेचा वापर वाढताे. परिणामी, वीज पंधरा मिनिटेही सुरळीत राहत नाही. महावितरणच्या या कारभाराचा फटका केवळ शेतकऱ्यांना बसताे असे नाही तर अंगणवाडी तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना या समस्येला सामाेरे जावे लागते. कूपनलिकेसारख्या स्रोतांना मुबलक पाणी असूनही केवळ वीज खंडित राहिल्याने चिमुकल्यांना पाणी मिळत नाही. वाडी-वस्त्यांवर वास्तव्य करणाऱ्या लाेकांनाही या समस्येला ताेंड द्यावे लागते. हीच बाब लक्षात घेऊन पाणीपुरवठा विभागाने शाळा तसेच अंगणवाड्या व वस्त्यांवरील कूपनिलकांवर साेलार पंप बसविण्याचा निर्णय घेतला हाेता. यासाठी तरतूद उपलब्ध हाेताच १८८ याेजनांना मंजुरी देण्यात आली. थाेडाही विलंब न लावता पाणीपुरवठा विभागाकडून ४९ याेजनांचे अंदाजपत्रक तयार करून ते विरिष्ठ कार्यालयाच्या मंजुरीसाठी औरंगाबाद येथे पाठविले आहे. संबंधित कार्यालयाकडून ग्रीन सिग्नल मिळताच, कामे हाती घेण्यात येतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

चाैकट

काेणत्या तालुक्यातीत किती याेजना?

तालुका याेजनांची संख्या

उस्मानाबाद ०३

भूम ३१

कळंब ०५

लाेहारा ०५

परंडा ८२

तुळजापूर २८

उमरगा १५

वाशी १९

एकूण १८८

काेट...

पाणीपुरवठा विभागास निधी मंजूर झाल्यानंतर सुमारे साेलार पंपासाठी १८८ पाणीपुरवठा याेजनांची निवड करण्यात आली आहे. यापैकी आजवर ४९ याेजनांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम संपून ते वरिष्ठ कार्यालयास सादर केले आहे. उर्वरित अंदाजपत्रके तयार करण्याचे कामही सुरू आहे. सदरील कामे पूर्ण झाल्यानंतर संबंधित शाळा, अंगणवाड्या तसेच वस्त्यांना भारनियमनाच्या काळातही पाणी उपलब्ध हाेईल.

-हिराकांत सर्जे, अभियंता, जिल्हा परिषद.