शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

कलेक्टर ऑफिसलाही कोरोनाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:34 IST

उस्मानाबाद : कोरोना संसर्गाची गती वेगाने पुढे सरकत आहे. सर्वसामान्यांसोबतच आता कार्यालयात थांबून काम करणाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. ...

उस्मानाबाद : कोरोना संसर्गाची गती वेगाने पुढे सरकत आहे. सर्वसामान्यांसोबतच आता कार्यालयात थांबून काम करणाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. गेल्या दोन दिवसांत एकट्या जिल्हाधिकारी कार्यालयातील १० जण बाधित आले आहेत. त्यामुळे अंतर्गत उपाययोजना सुरू केल्याने नागरिकांनाही सध्या प्रवेश बंद करण्यात आला आहे.

जिल्ह्यात दररोज अडीचशेच्या सरासरीने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. बुधवारपर्यंत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही १ हजार ८६० इतकी झाली होती. त्यामुळे काही दिवसांनंतर रुग्णालयांतही ऑक्सिजन बेड उपलब्ध राहतील की नाही, याबाबत साशंकता आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनत चाललेली असतानाही नागरिकांचा बाहेरील वावर कमी झालेला दिसत नाही. सुरक्षित अंतराचा नियम तर सर्रास पायदळी तुडविला जात आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला आहे. कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या नागरिकांकडून येथेही संसर्गाचा प्रसार झाला आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल १० अधिकारी-कर्मचारी बाधित आले आहेत. पुन्हा त्यांच्या संपर्कातील अन्य कर्मचाऱ्यांची तसेच कुटुंबीयांचीही तपासणी केली जात आहे. यातून आणखी कितीजण पॉझिटिव्ह येतील, हे लवकरच कळेल. कामे महत्ते्वाची आहेतच. मात्र, ती करताना कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घालून दिलेले साधे नियम पाळले तरी हा संसर्ग टाळता येणे शक्य आहे. सॅनिटायझर, मास्कचा वापर, सुरक्षित अंतर इतके जरी पाळले तरी कोरोनाला दूर ठेवता येऊ शकते. तसेच आपल्यासह आपल्या कुटुंबीयांचाही जीव धोक्यात घालण्यापासून वाचविता येणे शक्य आहे.

-तर उपाययोजनांसाठीही कोणी नसेल...

कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी महसूल विभागाकडे मोठे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. बेड, ऑक्सिजन, आरोग्य यंत्रणा, कोविड सेंटर, तेथील सुविधा व अन्य उपाययोजना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून व इतर विभागांना सोबत घेऊन केल्या जात आहेत. आता जिल्हाधिकारी कार्यालयातच असा प्रसार झाल्यास व भविष्यात तो वाढीस लागल्यास सर्वसामान्य रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांमध्ये अडचणी येण्याची शक्यता नाकारता नाही. त्यामुळे सर्वांनीच खबरदारी घेण्याची गरज आहे.

उपाययोजना सुरू, येवा थांबविला...

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या संसर्गाने शिरकाव केल्यामुळे प्रशासनाने सॅनिटायझेशन सुरू केले आहे. कार्यालयांमध्ये होणारी नागरिकांची अनावश्यक गर्दी कमी करण्यात येत आहे. कामकाज सुरू असले तरी उपाययोजना राबविण्यात येत असल्याने तूर्त नागरिकांना कार्यालयात येण्यापासून थांबविण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनीही येथील कामकाजासाठी येण्याचे टाळावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.