शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

भ्रष्टाचाराच्या आरोपाने सभागृह दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : विद्युत पंप खरेदीच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत विरोधी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सत्ताधारी बाकावरील पदाधिकाऱ्यांची ...

उस्मानाबाद : विद्युत पंप खरेदीच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत विरोधी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने सत्ताधारी बाकावरील पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली. बराच काळ चर्चा झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी सुनावणी घेऊन कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली.

सर्वसाधारण सभेला सुरुवात होताच विरोधी बाकावरील राष्ट्रवादीचे सदस्य ज्ञानेश्वर गीते यांनी ५० लाखांच्या विद्युत पंप खरेदीच्या चौकशी अहवालाचा मुद्दा उपस्थित करीत सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. विद्युत पंप खरेदीत गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. हा अहवाल मार्च महिन्यात आला आहे. अशावेळी सत्ताधाऱ्यांनी दोषींवर कारवाई करणे गरजेचे होते. परंतु, त्यांनी दोषींना वाचविण्यासाठी खटाटोप लावला आहे. अशावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करायला हवी होती. परंतु, त्यांनीही आजवर काहीच भूमिका घेतली नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. मात्र, आम्ही कदापि गप्प राहणार नाही. जिल्हास्तरावर कारवाई होणार नसेल तर वेळप्रसंगी कोर्टात जाऊ, असा इशाराही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. बराचकाळ चर्चा झाल्यानंतर अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या परवानगीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी सुनावणी घेऊन कारवाई करू, अशी ग्वाही दिली. यानंतर गीते यांनी सीईओ फड यांच्या वृक्ष लागवड मोहिमेचे कौतुक करून अभिनंदनाचा ठराव मांडला. वृक्षलागवडीसोबत संगोपनावरही भर देण्याची गरज व्यक्त केली.

यानंतर काँग्रेसचे सदस्य बाबूराव चव्हाण यांनी अणदूर उपकेंद्राचा मुद्दा मांडला. सर्व आरोग्य उपकेंद्रांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, अणदूरचे केंद्र वगळल्याचा आरोप करीत सत्ताधारी राजकीय हेतूने प्रेरित होऊन काम करीत असल्याचा आरोप केला. लघु पाटबंधारे विभागाच्या कारभारावरही शाब्दिक बाण सोडले. ७२ तलावांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे पैसे मागणी करण्यात आली. हीच यादी राज्य सरकारलाही दिली. मात्र, यादी ७२ तालावांचीच होती. त्यामुळे जिल्हा परिषदेचे नुकसान झाले आहे. या प्रकारास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यानंतर राष्ट्रवादीचे महेंद्र धुरगुडे यांनी ''हायमास्ट''चा मुद्दा मांडला. जो-तो विभाग आपला निधी हायमास्टवरच खर्च करू लागला आहे. यामागचे इंगित काय, गावोगावी दुसरी कामे नाहीत का? ही कामे दर्जेदार होत आहेत का? आदी प्रश्न उपस्थित केले. मी अनेक कामे पाहिली आहेत. कामे फारशी दर्जेदार होताना दिसत नाहीत. आता तर कंपन्यांचे प्रतिनिधी गावोगावी फिरत आहेत. ''तुमचे काय असेल ते करू; पण हायमास्टचे काम घ्या'' असे संगत आहेत. कंपन्या ३० ते ४० टक्के देत असल्याची चर्चा असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या कामाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर ''एखादे उदाहरण सांगा'' असे सत्ताधारी बाकावरून सांगताच राष्ट्रवादीच्या सदस्या सक्षणा सलगर यांनी पाडोळी आरोग्य केंद्रातील हायमास्टचे उदाहरण दिले. यामुळे सत्ताधाऱ्यांची कोंडी झाल्याचे पाहावयास मिळाले. सभेस अध्यक्षा अस्मिता कांबळे, उपाध्यक्ष धनंजय सावंत, सभापती दत्ता साळुंके, दत्ता देवळकर, दिग्विजय शिंदे, आदी उपस्थित होते.