शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

पुन्हा तांत्रिक घोळ, विमा कंपनीस सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:40 IST

उस्मानाबाद : पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीस ७२ तासांत देणे अनिवार्य आहे. मात्र, गतवर्षीप्रमाणेच यंदाही वीज, इंटरनेट तसेच ...

उस्मानाबाद : पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती विमा कंपनीस ७२ तासांत देणे अनिवार्य आहे. मात्र, गतवर्षीप्रमाणेच यंदाही वीज, इंटरनेट तसेच सर्व्हर डाऊन अशा अडचणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कंपनीस पत्र देऊन याबाबत सूचित केले आहे.

गतवर्षी अतिवृष्टीनंतर अनेक गावांत वीज नव्हती. इंटरनेटची समस्या निर्माण झाली. तसेच तांत्रिक अडचणीमुळे अनेक शेतकरी कंपनीस ७२ तासात नुकसानीची माहिती देऊ शकले नाहीत. परिणामी ३ लाखांवर शेतकऱ्यांना पात्र असतानाही अद्याप विमा मिळू शकला नाही. दरम्यान, यावर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील १५ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे, अन्य ठिकाणीही सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, कंपनीच्या ॲपवर नुकसानीची माहिती देण्याचा काही शेतकऱ्यांनी प्रयत्न केला असता, तांत्रिक समस्येला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांना माहिती देता आली नाही. तसेच यावेळीही इंटरनेट, विजेची समस्या आहेच. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कंपनीस पत्र देऊन ही बाब अवगत केली आहे. हे पत्र पुढे नुकसान भरपाईच्या मागणीवेळी मोलाची भूमिका बजावू शकते. शिवाय, त्यांनी शेतकऱ्यांनाही नुकसानीची माहिती ७२ तासात विमा कंपनी, कृषी विभागास देण्याचा प्रयत्न सुरूच ठेवावा, असे आवाहनही केले आहे.