शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकनंतर पालेभाज्या ३० टक्क्यांनी महागल्या, शेवगा, वांगी, कारले शंभरीपार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : मागील दोन महिने लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद होती. तसेच भाजीपाल्याची विक्रीही सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू होती. आता अनलॉकनंतर ...

उस्मानाबाद : मागील दोन महिने लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद होती. तसेच भाजीपाल्याची विक्रीही सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू होती. आता अनलॉकनंतर बाजारपेठ पूर्वपदावर येत असून, भाजी मंडईतही व्यापारी व शेतकरी भाज्या विक्रीस घेऊन येत आहेत. सध्या खरीप हंगामाच्या पेरणीमुळे शेतकरी खरिपातील पिके घेण्यावर भर देत आहेत. त्यामुळे पालेभाज्यांचा तुडवडा निर्माण झाला आहे. परिणामी, भाजीपाला २५ टक्क्यांनी महागला आहे. तर पालेभाज्यांच्या किमती दुपटीने वाढल्याचे चित्र बाजारात पाहावयास मिळत आहे.

मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे आठवडी बाजार अद्यापही बंदच आहेत. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी फळ मार्केट व भाजी मंडई दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. बाजारात मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक मंदावली आहे. त्यामुळे मेथी, शेपू, चुका, पालक या भाज्यांच्या जुड्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. शिवाय, शेवग्याचाही तुटवडा निर्माण झाल्याने शेवगा १२० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. वांगी, कारले प्रत्येकी १०० रुपये किलोने विक्री होत आहेत. तर टोमॅटो, लसूण, कांद्याचे दर स्थिर आहेत.

भाजीपाल्याचे दर

भाजीपाला १ जून २१ जून

दोडका ८० ७०

कारले १०० ८०

टोमॅटो २५ २५

वांगी १०० १००

भेंडी ८० ७०

गवार ८० ६०

भेंडी ६० ६०

हिरवी मिरची ६० ६०

शिमला मिरची ८० ६०

फ्लॉवर ८० ६०

मेथी २५ १५

पालक २० १०

शेपू २० १०

चुका २० १०

पुन्हा वरणावर जोर

लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या अनलाॅकनंतर बाजारपेठ सुरळीत सुरू झाल्या आहेत. मात्र, पालेभाज्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे पुन्हा वरणावर भर दिला आहे.

- प्रतिभा हावळे, गृहिणी

लॉकडाऊन काळात फळभाज्या व पालेभाज्या हातगाड्यांवर सहज मिळत होत्या. त्यावेळी भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात होते. अनलॉकनंतर मेथी, शेपू, चुका, पालक पालेभाज्या महागल्या आहेत. त्यामुळे फळभाज्यांची खरेदी करावी लागत आहे.

- महानंदा भोसले, गृहिणी

शेतकऱ्याच्या पदरी निराशाच

शेतात अर्धा एकर कारल्याची लागवड केली होती. त्यासाठी ४० हजार रुपये खर्च झाला. लॉकडाऊनमुळे बाजार बंद होते. तसेच पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहनांचा खर्च वाढला आहे. अर्धा एकरात ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सुरळीत बाजार असता तर एक ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळाले असते.

- दत्ता माळी, शेतकरी, काजळा

अर्धा एकर क्षेत्रावर हिरवी मिरचीची लागवड केली होती. लागवडीसाठी २० हजार रुपये खर्च झाला. मात्र लाॅकडाऊनमुळे बाजार बंद असल्यामुळे मिरची मोडून सोयाबीन लावले आहे. मिरची लागवडीत २० हजार रुपयांचे नुकसान झाले.

- नामदेव घोडके, शेतकरी, बरमगाव बु.