शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
4
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
5
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
6
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
7
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
8
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
9
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
10
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
11
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
12
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
13
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
14
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
15
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
16
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
17
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
18
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
19
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
20
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

अनलॉकनंतर पालेभाज्या ३० टक्क्यांनी महागल्या, शेवगा, वांगी, कारले शंभरीपार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:22 IST

उस्मानाबाद : मागील दोन महिने लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद होती. तसेच भाजीपाल्याची विक्रीही सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू होती. आता अनलॉकनंतर ...

उस्मानाबाद : मागील दोन महिने लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद होती. तसेच भाजीपाल्याची विक्रीही सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू होती. आता अनलॉकनंतर बाजारपेठ पूर्वपदावर येत असून, भाजी मंडईतही व्यापारी व शेतकरी भाज्या विक्रीस घेऊन येत आहेत. सध्या खरीप हंगामाच्या पेरणीमुळे शेतकरी खरिपातील पिके घेण्यावर भर देत आहेत. त्यामुळे पालेभाज्यांचा तुडवडा निर्माण झाला आहे. परिणामी, भाजीपाला २५ टक्क्यांनी महागला आहे. तर पालेभाज्यांच्या किमती दुपटीने वाढल्याचे चित्र बाजारात पाहावयास मिळत आहे.

मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे आठवडी बाजार अद्यापही बंदच आहेत. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी फळ मार्केट व भाजी मंडई दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. बाजारात मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक मंदावली आहे. त्यामुळे मेथी, शेपू, चुका, पालक या भाज्यांच्या जुड्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. शिवाय, शेवग्याचाही तुटवडा निर्माण झाल्याने शेवगा १२० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. वांगी, कारले प्रत्येकी १०० रुपये किलोने विक्री होत आहेत. तर टोमॅटो, लसूण, कांद्याचे दर स्थिर आहेत.

भाजीपाल्याचे दर

भाजीपाला १ जून २१ जून

दोडका ८० ७०

कारले १०० ८०

टोमॅटो २५ २५

वांगी १०० १००

भेंडी ८० ७०

गवार ८० ६०

भेंडी ६० ६०

हिरवी मिरची ६० ६०

शिमला मिरची ८० ६०

फ्लॉवर ८० ६०

मेथी २५ १५

पालक २० १०

शेपू २० १०

चुका २० १०

पुन्हा वरणावर जोर

लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या अनलाॅकनंतर बाजारपेठ सुरळीत सुरू झाल्या आहेत. मात्र, पालेभाज्यांचे दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे पुन्हा वरणावर भर दिला आहे.

- प्रतिभा हावळे, गृहिणी

लॉकडाऊन काळात फळभाज्या व पालेभाज्या हातगाड्यांवर सहज मिळत होत्या. त्यावेळी भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात होते. अनलॉकनंतर मेथी, शेपू, चुका, पालक पालेभाज्या महागल्या आहेत. त्यामुळे फळभाज्यांची खरेदी करावी लागत आहे.

- महानंदा भोसले, गृहिणी

शेतकऱ्याच्या पदरी निराशाच

शेतात अर्धा एकर कारल्याची लागवड केली होती. त्यासाठी ४० हजार रुपये खर्च झाला. लॉकडाऊनमुळे बाजार बंद होते. तसेच पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहनांचा खर्च वाढला आहे. अर्धा एकरात ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सुरळीत बाजार असता तर एक ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळाले असते.

- दत्ता माळी, शेतकरी, काजळा

अर्धा एकर क्षेत्रावर हिरवी मिरचीची लागवड केली होती. लागवडीसाठी २० हजार रुपये खर्च झाला. मात्र लाॅकडाऊनमुळे बाजार बंद असल्यामुळे मिरची मोडून सोयाबीन लावले आहे. मिरची लागवडीत २० हजार रुपयांचे नुकसान झाले.

- नामदेव घोडके, शेतकरी, बरमगाव बु.