शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

ब्रेक के बाद... तुफान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:37 IST

उस्मानाबाद : भुरभूर हजेरीनंतर दोन दिवस ब्रेक घेऊन तो आला... ध्यानीमनी नसताना रात्रीतून धो-धो बरसला... इतका उतरला की सगळीकडे ...

उस्मानाबाद : भुरभूर हजेरीनंतर दोन दिवस ब्रेक घेऊन तो आला... ध्यानीमनी नसताना रात्रीतून धो-धो बरसला... इतका उतरला की सगळीकडे पाणीच पाणी करून टाकले. विशेषत: भूम व परंडा तालुक्यात कहरच. माणकेश्वर मंडळामध्ये तर मुसळधार पावसाची नोंद झाली अन् इतर ११ मंडळांमध्ये अतिवृष्टीची. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने जिल्ह्यात कोठेही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आवारपिंपरीत तीन पशुधन वाहून गेले.

अल्पकाळ विश्रांती घेतल्यानंतर वरुणराजाने जिल्ह्यात दमदार एन्ट्री केली आहे. शनिवारी दिवसभर उन होते. मात्र, सायंकाळी ढग एकत्र आले आणि रात्री बरसण्यास सुरुवात केली. मध्यरात्रीच्या वेळी पावसाचा जोर वाढला. संपूर्ण जिल्ह्यात पावसाने पाय पसरले. कुठे मध्यम तर कुठे जोरदार पाऊस झाला. रविवारी सकाळपर्यंत या पावसाची नोंद ५० मिमी इतकी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद ही परंडा तालुक्यात ९२.६० तर भूम तालुक्यात ९१.५० मिलिमीटर इतकी झाली आहे. त्यापाठोपाठ वाशी तालुक्यात ५७, तुळजापूर ४८, उमरगा ४२, लोहारा ३७, कळंब २७ तर उस्मानाबाद तालुक्यात २५ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे. हा पाऊस पुढील हंगामासाठी उपयुक्त ठरला असला तरी चालू खरीप हंगामातील काढणीला आलेल्या व अनेक ठिकाणी काढणी झालेल्या उडीद, मुगासाठी नुकसानकारक ठरला आहे. ही पिके आता पूर्णत: पाण्याखाली आहेत. तसेच भूम-परंडा भागात पावसासोबतच वाऱ्यानेही एन्ट्री केल्याने अनेक ठिकाणी ऊस आडवा झाला आहे. कांद्याचे कोठार समजले जाणाऱ्या तुळजापूर तालुक्यात लावण झालेल्या कांदा रोपांचे नुकसान झाले आहे.

तलाव फुटला, पशुधन वाहिले...

रात्रीच्या जोरदार पावसामुळे तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ मंडळात अतिवृष्टी नोंदली गेली. शिवाय, सलगरा मंडळात ५० मिमी पाऊस झाला. यामुळे देवसिंगा तुळ येथील पाझर तलाव फुटून त्याखालील १० हेक्टर्स शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, परंडा तालुक्यातील आवार पिंपरी येथील श्रीराम नरुटे यांच्या दोन म्हशी व एक रेडकू पाण्यात वाहून गेले आहे.

इथे बरसला धो-धो...

भूमच्या माणकेश्वर मंडळात ११६.३ मिमीसह मुसळधार पाऊस झाला. तर परंडा मंडळात १०७.३ मिलिमीटर, आसू ८४.५, जवळा ९४.३, अनाळा ८५.५, साेनारी ९१.३ मिमी पाऊस झाला. भूम तालुक्यातील अंबी १०२.८, माणकेश्वर ११६.३, भूम ९४.३, ईट ८१.५, तर वालवडमध्ये ६२.८ मिमीसह अतिवृष्टी झाली. वाशी तालुक्यातील पारगाव ७८.५, तर तेरखेडा ६५.३ व तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ सर्कलमध्येही ७७.३ मिमीसह अतिवृष्टी नोंदली.

सरासरीच्या ८ टक्के रात्रीतून...

जिल्ह्यात रात्रीतून ५०.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाळ्यात उस्मानाबाद जिल्ह्यात ६०३ मिमी सरासरी पाऊस पडतो. या सरासरीच्या तुलनेत रात्री झालेल्या पावसाची नोंद पाहिली तर एका रात्रीतून ८ टक्के पाऊस झाल्याचे लक्षात येते.