शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

पाणी योजना बळकटीकरणासाठी ५६ कोटींच्या निधीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:21 IST

कळंब : शहराचा वाढता विस्तार व लोकसंख्या पाहता कळंब पाणीपुरवठा योजनेसाठी जवळपास ५६ कोटी रुपये खर्च असलेली पाणीपुरवठा योजना ...

कळंब : शहराचा वाढता विस्तार व लोकसंख्या पाहता कळंब पाणीपुरवठा योजनेसाठी जवळपास ५६ कोटी रुपये खर्च असलेली पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याचा प्रस्ताव कळंब न. प. ने राज्य शासनाकडे सादर केला आहे. ही योजना कार्यान्वित झाली तर पुढील जवळपास ३५ वर्षे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

कळंब शहर व डिकसळ गावासाठी सध्या मांजरा धरणातून असणारी पाणीपुरवठा योजना २००५ साली कार्यान्वित झाली आहे. त्या परिस्थितीच्या तुलनेत सध्या शहराचा विस्तार व लोकसंख्या वाढली आहे. सध्या व पुढील काळातही आता पाणीपुरवठा योजना तोकडी पडणार आहे. याचा विचार करून या योजनेचे बळकटीकरण करण्याचा प्रस्ताव कळंब न. प. नेे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे तसेच संबंधित विभागाला सादर केला आहे. पाणीपुरवठा मंत्री बनसोडे यांनी हा प्रस्ताव तातडीने संबंधितांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला आहे.

कळंब शहराची सध्याची लोकसंख्या ४० हजारांच्या घरात आहे. वाढता विस्तार पाहता प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी आगामी काळात न. प. ला मोठी कसरत करावी लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर न. प. तील सत्ताधारी मंडळींनी घेतलेली ही भूमिका स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया शहरवासियांतून व्यक्त होत आहे.

चौकट -

काय आहे योजना?-

या योजनेमध्ये अशुद्ध पाणी पंपिंग मशिनरी बसविणे, अशुद्ध पाण्याची पंप हाऊस मुख्य उद्भव विहीर ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ५०० मिमी व्यासाची पाईपलाईन टाकणे, जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवून नवीन १० हजार दशलक्ष लीटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्राचे बांधकाम करणे, जलशुद्धीकरण केंद्रातील पंपिंग मशिनरी बदलणे, नवीन १८ लक्ष लीटर क्षमतेचा एक जलकुंभ व ७ लक्ष लीटर क्षमतेचा १ असे दोन जलकुंभ बांधणे, शुद्ध पाण्याची जलशुद्धीकरण केंद्र ते जलकुंभ पाईपलाईन टाकणे, शहरातील विस्तारित भागात नवीन पाईपलाईन टाकणे, जलशुद्धीकरण केंद्राजवळ सोलर यंत्रणा बसविणे यांचा समावेश आहे. यासाठी ५५ कोटी ६० लाख ८४ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

कोट.........

कळंब शहर व शेजारील डिकसळ गावासाठी आगामी जवळपास ३५ ते ४० वर्षांची वाढ लक्षात घेता ही योजना आम्ही तयार करून शासनाकडे प्रस्तावित केली आहे. पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी तत्काळ संबंधित विभागाला या योजनेच्या मंजुरीबाबत निर्देश दिले. या योजनेमुळे दरडोई १३५ लीटर पाणी उपलब्ध करून देता येणार आहे. लवकरच तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होऊन या योजनेस मंजुरी मिळेल व पाण्यासाठी होणारी कळंबकरांची अडचण दूर होईल.

- संजय मुंदडा, प्रभारी नगराध्यक्ष