शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

५५ टक्के शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:36 IST

उस्मानाबाद : खरीप हंगाम संपत आला असतानाही कर्ज वाटपात बॅंकांची उदासीनता कायम आहे. अद्यापपर्यंत केवळ ९४ हजार ९६४ शेतकऱ्यांना ...

उस्मानाबाद : खरीप हंगाम संपत आला असतानाही कर्ज वाटपात बॅंकांची उदासीनता कायम आहे. अद्यापपर्यंत केवळ ९४ हजार ९६४ शेतकऱ्यांना ६९१ कोटी ७९ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप झाले आहे. कर्ज वाटपाची टक्केवारी ४५ टक्के इतकी आहे, तर ५५ टक्के शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.

वर्षा-दोन वर्षाआड पडणारा दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी अशा संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असतो. यंदा पिकांचे नुकसान झाले, तर पुढील वर्षी चांगले उत्पादन मिळेल, या आशेवर शेतकरी पिके घेत असतात. शेती कामांसाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता भासत असते. शेतकऱ्यांना शेतीकामासाठी रक्कम मिळावी, यासाठी शासनाकडून पीककर्ज उपलब्ध करून दिले जाते. उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी १,५३९ कोटी ८० लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष कर्ज वितरणास प्रारंभ झाला. कोरोनामुळे एप्रिल व मे महिन्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या काळात एसटी बस बंद असल्याने ग्रामीण भागातून शेतकऱ्यांना शहरातील बँकामध्ये येता येत नव्हते. त्यामुळे कर्ज वितरणाची गती मंदावलेली होती. जून महिन्यापासून निर्बंध शिथिल झाले, तसेच जून महिन्यात पाऊसही झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी उरकून घेतली. जून-जुलै, ऑगस्ट महिन्यातही कर्ज वाटपास म्हणावी तशी गती आलेली दिसत नाही. १५ ऑगस्ट अखेरपर्यंत ४ हजार ९६४ शेतकऱ्यांना ६९१ कोटी ७९ लाख रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले आहे. कर्ज वाटपाची टक्केवारी ४५ टक्के इतकी असून, अद्याप ६५ टक्के शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.

महाराष्ट्र ग्रामीण बँक कर्ज वाटपात आघाडीवर

जिल्ह्यास खरीप हंगामासाठी १,५३९ कोटी ८० लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेस २६९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. या बँकेने १९ हजार ३९२ शेतकऱ्यांना १६७ कोटी ७ लाख रुपये कर्ज वितरित केले आहे. त्याची टक्केवारी ६२ इतकी आहे. त्या खालोखाल जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेने ४६ हजार २३३ शेतकऱ्यांना १८४ कोटी ७६ लाख रुपयांचे कर्ज वाटत केले. त्याची टक्केवारी ५६ इतकी आहे.

खरीप हंगाम संपत आला असून, मूग, उडीद पीक काढणीस आले आहेत. सोयाबीन पीक हे शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. मूग, उडीद पीक काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. या शेतकऱ्यांना मळणी, मजुरासाठी पैशाची आवश्यकता भासत आहे. मात्र, अशा स्थितीत पीककर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना बँकेत हेलपाटे मारावे लागत आहेत.