शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू उपसा प्रकरणी २६ शेतकऱ्यांना ५३ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:29 IST

(सिंगल फोटो : समीर सुतके १३) उमरगा : बेनितुरा नदीवर अवैध वाळू उपसा करुन स्वत:च्या शेतात व घराशेजारी साठवणूक ...

(सिंगल फोटो : समीर सुतके १३)

उमरगा : बेनितुरा नदीवर अवैध वाळू उपसा करुन स्वत:च्या शेतात व घराशेजारी साठवणूक करणाऱ्या तालुक्यातील २६ शेतकऱ्यांना ५३ लाख २ हजार २९० रुपये दंडाचे आदेश दिले आहेत. दंड न भरल्यास सातबारावर बोजा चढवण्यात येणार आहे.

उमरगा येथील मंडल अधिकारी व तलाठ्यांनी २७ जानेवारी रोजी तालुक्यातील भिकार सांगवी, पारसखेडा, माने गोपाळ, चंडकाळ, बेडगा या बेन्नीतुरा नदीकाठच्या गावात जाऊन शेतात व घराशेजारी साठविलेल्या वाळू साठ्याचा पंचनामा केला होता व याचे फोटोही काढले होते. याच फोटोसह सदरच्या कारवाईचे वृत्त १ फेब्रुवारी रोजी ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर सहा दिवसांनी पंचनामा अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर अवैध वाळू साठवलेल्या १० लोकांना २५ लाख ५१ हजार ५०० रुपये दंड आकारणीच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

संबंधितांनी दिलेल्या खुलाशानंतर फेर चौकशीसाठी नायब तहसीलदार रोहन काळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. या समितीने सादर केलेला फेर चौकशी पंचनामाच्या अनुषंगाने चिंचोली ज. येथील २ लोकांना २३ लाख ५२ हजार, बेडगा येथील ७ लोकांना ६९ हजार ९०, पारसखेडा येथील दोघांना १ लाख ६१ हजार ७००, भिकार सांगवी येथील ८ लोकांना ९ लाख ७० हजार २०० व चंडकाळ येथील ७ लोकांना १७ लाख ४९ हजार ३०० असे एकूण ५३ लाख २ हजार २९० दंडाचे आदेश देण्यात आलेले आहेत. दरम्यान, या सहा दिवसात पंचनामा केलेल्या ठिकाणचा वाळू साठा उचलण्यासाठी हा अहवाल उशिरा सादर करण्यात आल्याची चर्चा आहे.

अधिकाऱ्यांना अभय?

दरम्यान, याबाबतचा पंचनामा करूनही तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी सहा दिवस पंचनामा अहवाल सादर केला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना नोटिसा बजावणारे प्रशासन दोषी अधिकाऱ्यांना मात्र पाठीशी घालत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून केला जात आहे.

शासनाची दिशाभूल

महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील भिकार सांगवी, चेंडकाळ, बेडगा, चिंचोली (ज), मानेगोपाळ, दगडधानोरा आदी गावच्या शिवारातून ही नदी जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळू आहे. सदर वाळूचा दरवर्षी लिलाव होणे गरजेचे आहे. परंतु, दरवर्षी नदीत वाळू नसल्याचा अहवाल तलाठ्यांमार्फत देऊन शासनाची दिशाभूल केली जात आहे.