शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

खरिपासाठीचे ५० टक्के रासायिनक खत जिल्ह्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:35 IST

बियाण्यांचा ठणठणाट - ‘कृषी’कडून ६३ मेट्रिक टन खताची नाेंदविली मागणी उस्मानाबाद : काेराेनाने थैमान घातले असले तरी कृषी विभागाकडून ...

बियाण्यांचा ठणठणाट - ‘कृषी’कडून ६३ मेट्रिक टन खताची नाेंदविली मागणी

उस्मानाबाद : काेराेनाने थैमान घातले असले तरी कृषी विभागाकडून आगामी खरीप हंगामाची जाेरदार तयारी करण्यात येत आहे. ‘कृषी’ने मागील पाच वर्षांतील खतांचा सरासरी वापर लक्षात घेऊन सुमारे ६३ मेट्रिक टन खतांची मागणी केली आहे. यापैकी आजघडीला ३० हजार मे. टन खत जिल्ह्यात दाखल झाले आहे. उर्वरित आवंठणही पंधरा ते वीस दिवसांत मिळेल, असा दावा यंत्रणेने केला आहे.

जिल्ह्यावरील काेराेनाचे संकट गडद झालेले आहे. अशाही परिस्थतीत जिल्हा परिषद कृषी विभागाकडून खरीप हंगामातील पेरणीचे नियाेजन करण्यात आले आहे. खरीप हंगामात ५ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी हाेईल, असा कृषीचा अंदाज आहे. त्यानुसार खत, बियाण्यांचे नियाेजन करण्यात आले आहे. मागील पाच वर्षांतील खतांचा सरासरी वापर लक्षात घेऊन ६३ हजार मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार आजअखेर ३० हजार २४८ मे. टन खत जिल्ह्यात दाखल झाले आहे. यात डीएपी १९ हजार ७२० मेट्रिक टन मागणी केले असता, ५ हजार ३०६ मे. टन उपलब्ध झाले आहे. माेओपी २ हजार ११० पैकी १ हजार ६७८ मे. टन, एसएसपी ४ हजार ६७० पैकी ३ हजार ५५७, तर एनपीके १९ हजार ३७० पैकी १४ हजार ३७७ मेट्रिक टन दाखल झाले आहे. बियाण्यांच्या बाबतीत मात्र वेगळे चित्र आहे. महाबीजकडून ५१ हजार ७५० क्विंटल, एनएससीकडून ५ हजार क्विंटल, तर खासगी कंपन्यांकडून ३७ हजार ९७४ क्विंटल बियाण्यांची मागणी नाेंदविली आहे. यापैकी महाबीज आणि एनएससीकडून किलाेभरही बियाणे मिळालेले नाही. मात्र, खासगी कंपन्यांकडून ३०० क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. येत्या महिनाभरात खत तसेच बियाणेही मागणीनुसार उपलब्ध हाेईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

चाैकट...

यंदा दर वाढण्याची शक्यता?

खत उत्पादक कंपन्यांनी यंदा खतांच्या दरामध्ये माेठी वाढ केली आहे. असे असतानाच आता काही बियाणे उत्पादक कंपन्यांकडूनही खताच्या दामध्ये वाढ केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. काेणत्या कंपन्यांनी नेमकी किती वाढ केली हे येत्या काही दिवसांत स्पष्ट हाेणार आहे. त्यामुळे यंदा खरीप हंगामाची पेरणी शेतकऱ्यांसाठी खर्चिक ठरणार आहे.

काेट...

मागील पाच वर्षांतील खत तसेच बियाण्यांचा सरासरी वापर लक्षात घेऊन शासनाकडे मागणी नाेंदविली हाेती. त्यानुसार आजघडीला आपणाला मागणीच्या ५० टक्के खत उपलब्ध झाले आहे. उर्वरित आवंठणही लवकरच मिळेल. बियाणेही चार-आठ दिवसांत मिळण्यास सुरुवात हाेईल. कुठल्याही परिस्थितीत यंदा खत, बियाण्यांचा तुटवडा निर्माण हाेणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेण्यात येत आहे.

डाॅ. टी. जी. चिमनशेट्टे, जिल्हा कृषी विकास अधिकारी.