शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

निराधार योजनेचे ४४१ प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:34 IST

भूम : संजय गांधी निराधार योजनेसाठी तालुक्यातून प्राप्त झालेल्या ५८३ प्रस्तावांपैकी ४४१ प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याने निराधारांना अधार मिळाला आहे. ...

भूम : संजय गांधी निराधार योजनेसाठी तालुक्यातून प्राप्त झालेल्या ५८३ प्रस्तावांपैकी ४४१ प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याने निराधारांना अधार मिळाला आहे.

तालुक्यात १० डिसेंबर २०२० पासून प्रस्ताव मंजुरीसाठी प्रशासकीय बैठक झाली नव्हती. त्यामुळे प्रस्ताव दाखल केलेले लाभार्थी कार्यालयात हेलपाटे मारत होते. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दाखल झालेल्या ५८३ प्रस्तावांपैकी ४४१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये श्रावणबाळ योजनेसाठी ३७९ प्रस्ताव दाखल झाले होते. यापैकी ३०० प्रस्तावांना मंजुरी मिळाली. इंदिरा गांधी योजनेसाठी प्राप्त ८८ प्रस्तावांपैकी ४३ प्रस्ताव, तर संजय गांधी निराधार योजनेच्या ११६ प्रस्तावांपैकी ९८ प्रस्तावांना या बैठकीत मंजुरी मिळाली. १४२ प्रस्तावांत काही प्रस्तावांत त्रुटी आढळून आल्या आहेत.

दरम्यान, दर तीन महिन्यांनी आलेल्या प्रस्तावांची छाननी करून मंजुरी देण्यासाठी बैठक होणे अपेक्षित आहे. परंतु, प्रशासकीय यंत्रणेस इतर कामांचा भार असल्याने तब्बल चार महिन्यांनंतर ही बैठक ठेवण्यात आली. या निराधारांना महिन्याला औषधोपचार तसेच घरखर्चही अनुदानातून भागवावा लागतो. त्यामुळे किमान कोरोना महामारीत निराधारांचे प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर व्हावेत, अशी अपेक्षा लाभार्थ्यांमधून व्यक्त केली जात आहे.

चौकट

दोन वर्षांपासून समितीच नाही

संजय गांधी योजनेसाठी राजकीय समिती गठीत केलेली असते. यांच्या निवडी जिल्ह्याचे पालकमंत्री करतात. आलेले प्रस्ताव मंजूर करणे, बैठक घेण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करून निराधारांना न्याय देणे, हे काम समिती करते. परंतु, भूम तालुक्याची समिती गेल्या दोन वर्षांपासून अस्तित्वात नाही. त्यामुळे निराधारांना वेळेत न्याय मिळत नसल्याचा आरोप निराधारांकडून होतो.

गेल्या दोन वर्षांपासून निराधार योजनेवर असलेली राजकीय कमिटी कार्यरत नाही. त्यामुळे याबाबत सरकारच उदासीन असल्याचे दिसते. निराधारांना न्याय मिळण्यासाठी सरकारने तत्काळ समिती गठीत करावी, अन्यथा भाजपच्या वतीने अंदोलन छेडण्यात येईल.

- महादेव वडेकर, तालुकाध्यक्ष, भाजपा

३० मार्च रोजी निराधारांचे आलेले प्रस्ताव मंजूर करण्यासाठी बैठक घेऊन ४४१ प्रस्ताव मंजूर केले आहेत. यानंतर, १४ एप्रिल रोजी पुन्हा बैठक घेऊन नव्याने आलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार आहे.

- उषाकिरण शृंगारे, तहसीलदार