शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

‘खरिपा’साठी लागणार ३५ हजार क्विंटल साेयाबीन बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:33 IST

कळंब - तालुक्यात आगामी खरीप हंगामासाठी जवळपास ३५ हजार क्विंटलच्या आसपास सोयाबीन बियाणाची गरज लागणार आहे. यास्थितीत गतवर्षीच्या बोगस ...

कळंब - तालुक्यात आगामी खरीप हंगामासाठी जवळपास ३५ हजार क्विंटलच्या आसपास सोयाबीन बियाणाची गरज लागणार आहे. यास्थितीत गतवर्षीच्या बोगस बियाणे बाजाराचा कटू अनुभव पाठीशी असल्याने शेतकऱ्यांची फसगत होवू नये यासाठी कृषी विभागाने यंदा अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

कळंब तालुक्याचे लोकजीवन शेतीक्षेत्रावर अवलंबून आहे. एकूण लागवडीखालील लाखभर हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचा पेरा होतो. यात सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग आदी प्रमुख पिके घेतली जातात.

एकूणच तालुक्यातील खरीप हा प्रमुख शेतीहंगाम असून तो पूर्णपणे मोसमी पावसावर अवलंबून आहे. या हंगामाची पूर्वतयारी म्हणून एप्रिल, मे महिन्यात मशागतीची कामे करत जमीन पेरणीयोग्य केली जाते.

यानंतर समाधानकारक पाऊस झाला की, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणीस सुरुवात होते. एकूणच मे महिना उजाडला की, शेतकरी आणि कृषी विभागाच्या स्तरावर पेरणीपूर्व नियोजनाची तयारी सुरू होत असते.

यानुसार प्रस्तावित क्षेत्र, लागणारे बियाणे, खते व औषधी यांचा काळा बाजार होणार नाही, टंचाई होणार यासाठी पूर्वनियोजन गरजेचे असते. यंदा मात्र चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त झाला असला तरी पेरणीपूर्व नियोजनाच्या संदर्भात सामसूम दिसून येत आहे.

चौकट...

गतवर्षीच्या कटू अनुभवातून 'धडा' घ्यावा...

गतवर्षी अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाणाला अंकुर फुटला नव्हता. वांझोट्या बियाणांचा असंख्य शेतकऱ्यांना ‘प्रसाद’ भेटला होता. यात ७१ बियाणे उत्पादक कंपन्यासंदर्भात एक हजार ४२२ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यात एका सरकारी कंपनीच्या तक्रारीची संख्या पाचशेच्या आसपास होती. एकूणच गतवर्षी भरलेल्या बोगस बियाणांच्या बाजाराचा अनुभव पदरी असतानाही कृषी विभाग यंदा हवा तसा अ‍ॅक्टिव्ह मोडवर नसल्याचे दिसून येत आहे.

सोयाबीनचे कोठार...

तालुक्यात गतवर्षी पेरणी झालेल्या ७९ हजार हेक्टर क्षेत्रांपैकी तब्बल ६४ हजार ९९३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. एकूण क्षेत्राच्या ८२ टक्के क्षेत्रावर सोयाबीन पेरले गेले. यामुळेच तालुक्याला सोयाबीनचे कोठार अशी ओळख मिळाली आहे. यंदा उसाचे क्षेत्र वाढल्याने साधारणतः ६५ हजार हेक्टर पेरणी गृहीत धरले तर सोयाबीन ५० ते ५५ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी होण्याचा अंदाज आहे. यासाठी किमान ३५ हजार क्विंटल बियाण्यांची गरज लागणार आहे.

खते, बियाणे किती हवे,खुद्द साहेबांनाच नाही ठावं....

खरीप हंगाम तोंडावर आला आहे.पुढच्या पंधरवड्यात शेतकरी बियाणे, खताची जुळवाजुळव सुरू करतील. असे असले तरी तालुकास्तरावरील कृषी खात्यात मात्र याविषयी सामसूमच असल्याचे दिसून येत आहे. तालुका कृषी अधिकारी बी. बी. जाधव यांनी उसामुळे प्रस्तावित क्षेत्र कमी होणार असे सांगितले खरे. मात्र, बियाणाची गरज व मागणीसंदर्भात ते मागील पाच दिवसांत माहिती देवू शकले नाहीत. अशीच स्थिती पं.स.च्या कृषी अधिकारी विरे‌श अंधारी यांच्याशी संपर्क साधला असता दिसून आली. त्यांना खताची मागणी, उपलब्धता याची माहिती पाच दिवसांपासून देता आली नाही, हे विशेष.