शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

तीन सबस्टेशनअंतर्गत ३२ तास वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:34 IST

येडशी -विद्युत महावितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळे येडशी, उपळा व खेड सबस्टेशनअंतर्गतच्या २० ते २५ गावांतील वीजपुरवठा तब्बल ३२ तास ...

येडशी -विद्युत महावितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळे येडशी, उपळा व खेड सबस्टेशनअंतर्गतच्या २० ते २५ गावांतील वीजपुरवठा तब्बल ३२ तास बंद हाेता. त्यामुळे संबंधित गावांतील ग्रामस्थांसाेबतच व्यापाऱ्यांनाही गैरसाेयीला ताेंड द्यावे लागले. पशुधनाचेही प्रचंड हाल झाले.

उस्मानाबादहून येडशीकडे जाणारी ३३ केव्हीए लाईन औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना अंडरग्राऊंड केबल टाकून जोडण्यात आली होती. परंतु, या ठिकाणी सतत केबल व किट जळत आहे. त्यामुळे किट वा केबल जळाले की दिवस-दिवस वीजपुरवठा खंडित राहताे. उस्मानाबादहून वीजपुरवठा खंडित झाल्यास येरमाळा येथून वीजपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, हाही वीजपुरवठा सतत खंडित होतो. दरम्यान, उस्मानाबाद येथून येडशीसाठी नवीन वीजपुरवठा लाईन टाकण्याचे काम मागील पाच ते सात वर्षांपासून सुरू आहे. हे काम गडपाटीपर्यंत पूर्ण झाले आहे. यापुढे मात्र ते सरकत नाही. काही शेतकऱ्यांनी हे काम अडविल्याने संबंधित कंत्राटदाराने काम केले नाही. त्यामुळे आजवर पर्यायी लाईन सुरू हाेऊ शकली नाही. येडशी ते इढोकी ही पर्यायी लाईन टाकण्यात आलेली आहे. परंतु, आजघडीला ती बंद आहे.

परिणामी ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांना सातत्याने खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. ३० ऑगस्टला सकाळी साडेनऊ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तर ३१ राेजी दुपारी १ ते सायंकाळी ७.५० तर १ सप्टेंबरला सकाळी ११.२० वाजता वीजपुरवठा खंडित झाला हाेता. ताे सायंकाळपर्यंत सुरू झालेला नाही. म्हणजेच जवळपास ३२ तासांपेक्षा जास्त वीजपुरवठा खंडित राहिला. परिणामी पिण्याच्या पाण्यासह सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला. अनेकाना अंघोळीला पाणी मिळाले नाही. बँका, डाक कार्यालय, एटीएम सेवाही विजेअभावी बंद राहिली. माेबाईलही चार्ज झाले नाहीत. त्यामुळे ऑनलाईन अभ्यासावरही परिणाम झाला.

चाैकट...

मेणबत्ती लावून केली डिलिव्हरी

येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी रात्री प्रसूतीसाठी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते परंतु, वीज नसल्याने उजेडाचे करायचे काय? असा सवाल डाॅक्टर, कर्मचाऱ्यांसमाेर हाेता. दुसरा काेणताही पर्याय नसल्याने मेणबत्तीच्या प्रकाशात प्रसूती करण्यात आली.

व्यापाऱ्यांचेही नुकसान

वीजपुरवठा खंडित राहिल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. येथील हाॅटेल व्यवसाय माेठा आहे. अशा हाॅटेलमधील दूध, आईस्क्रिम, पनीर, केक आदी पदार्थ वाया गेले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित हाेण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष राजाभाऊ धावणे यांनी केली.