शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तीन सबस्टेशनअंतर्गत ३२ तास वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:34 IST

येडशी -विद्युत महावितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळे येडशी, उपळा व खेड सबस्टेशनअंतर्गतच्या २० ते २५ गावांतील वीजपुरवठा तब्बल ३२ तास ...

येडशी -विद्युत महावितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळे येडशी, उपळा व खेड सबस्टेशनअंतर्गतच्या २० ते २५ गावांतील वीजपुरवठा तब्बल ३२ तास बंद हाेता. त्यामुळे संबंधित गावांतील ग्रामस्थांसाेबतच व्यापाऱ्यांनाही गैरसाेयीला ताेंड द्यावे लागले. पशुधनाचेही प्रचंड हाल झाले.

उस्मानाबादहून येडशीकडे जाणारी ३३ केव्हीए लाईन औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना अंडरग्राऊंड केबल टाकून जोडण्यात आली होती. परंतु, या ठिकाणी सतत केबल व किट जळत आहे. त्यामुळे किट वा केबल जळाले की दिवस-दिवस वीजपुरवठा खंडित राहताे. उस्मानाबादहून वीजपुरवठा खंडित झाल्यास येरमाळा येथून वीजपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, हाही वीजपुरवठा सतत खंडित होतो. दरम्यान, उस्मानाबाद येथून येडशीसाठी नवीन वीजपुरवठा लाईन टाकण्याचे काम मागील पाच ते सात वर्षांपासून सुरू आहे. हे काम गडपाटीपर्यंत पूर्ण झाले आहे. यापुढे मात्र ते सरकत नाही. काही शेतकऱ्यांनी हे काम अडविल्याने संबंधित कंत्राटदाराने काम केले नाही. त्यामुळे आजवर पर्यायी लाईन सुरू हाेऊ शकली नाही. येडशी ते इढोकी ही पर्यायी लाईन टाकण्यात आलेली आहे. परंतु, आजघडीला ती बंद आहे.

परिणामी ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांना सातत्याने खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. ३० ऑगस्टला सकाळी साडेनऊ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तर ३१ राेजी दुपारी १ ते सायंकाळी ७.५० तर १ सप्टेंबरला सकाळी ११.२० वाजता वीजपुरवठा खंडित झाला हाेता. ताे सायंकाळपर्यंत सुरू झालेला नाही. म्हणजेच जवळपास ३२ तासांपेक्षा जास्त वीजपुरवठा खंडित राहिला. परिणामी पिण्याच्या पाण्यासह सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला. अनेकाना अंघोळीला पाणी मिळाले नाही. बँका, डाक कार्यालय, एटीएम सेवाही विजेअभावी बंद राहिली. माेबाईलही चार्ज झाले नाहीत. त्यामुळे ऑनलाईन अभ्यासावरही परिणाम झाला.

चाैकट...

मेणबत्ती लावून केली डिलिव्हरी

येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी रात्री प्रसूतीसाठी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते परंतु, वीज नसल्याने उजेडाचे करायचे काय? असा सवाल डाॅक्टर, कर्मचाऱ्यांसमाेर हाेता. दुसरा काेणताही पर्याय नसल्याने मेणबत्तीच्या प्रकाशात प्रसूती करण्यात आली.

व्यापाऱ्यांचेही नुकसान

वीजपुरवठा खंडित राहिल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. येथील हाॅटेल व्यवसाय माेठा आहे. अशा हाॅटेलमधील दूध, आईस्क्रिम, पनीर, केक आदी पदार्थ वाया गेले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित हाेण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष राजाभाऊ धावणे यांनी केली.