शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
5
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
6
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
7
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
8
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
9
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
10
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
11
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
12
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
13
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
14
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
15
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
16
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
17
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
18
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
19
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
20
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’

तीन सबस्टेशनअंतर्गत ३२ तास वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:34 IST

येडशी -विद्युत महावितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळे येडशी, उपळा व खेड सबस्टेशनअंतर्गतच्या २० ते २५ गावांतील वीजपुरवठा तब्बल ३२ तास ...

येडशी -विद्युत महावितरण कंपनीच्या दुर्लक्षित कारभारामुळे येडशी, उपळा व खेड सबस्टेशनअंतर्गतच्या २० ते २५ गावांतील वीजपुरवठा तब्बल ३२ तास बंद हाेता. त्यामुळे संबंधित गावांतील ग्रामस्थांसाेबतच व्यापाऱ्यांनाही गैरसाेयीला ताेंड द्यावे लागले. पशुधनाचेही प्रचंड हाल झाले.

उस्मानाबादहून येडशीकडे जाणारी ३३ केव्हीए लाईन औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना अंडरग्राऊंड केबल टाकून जोडण्यात आली होती. परंतु, या ठिकाणी सतत केबल व किट जळत आहे. त्यामुळे किट वा केबल जळाले की दिवस-दिवस वीजपुरवठा खंडित राहताे. उस्मानाबादहून वीजपुरवठा खंडित झाल्यास येरमाळा येथून वीजपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, हाही वीजपुरवठा सतत खंडित होतो. दरम्यान, उस्मानाबाद येथून येडशीसाठी नवीन वीजपुरवठा लाईन टाकण्याचे काम मागील पाच ते सात वर्षांपासून सुरू आहे. हे काम गडपाटीपर्यंत पूर्ण झाले आहे. यापुढे मात्र ते सरकत नाही. काही शेतकऱ्यांनी हे काम अडविल्याने संबंधित कंत्राटदाराने काम केले नाही. त्यामुळे आजवर पर्यायी लाईन सुरू हाेऊ शकली नाही. येडशी ते इढोकी ही पर्यायी लाईन टाकण्यात आलेली आहे. परंतु, आजघडीला ती बंद आहे.

परिणामी ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांना सातत्याने खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. ३० ऑगस्टला सकाळी साडेनऊ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तर ३१ राेजी दुपारी १ ते सायंकाळी ७.५० तर १ सप्टेंबरला सकाळी ११.२० वाजता वीजपुरवठा खंडित झाला हाेता. ताे सायंकाळपर्यंत सुरू झालेला नाही. म्हणजेच जवळपास ३२ तासांपेक्षा जास्त वीजपुरवठा खंडित राहिला. परिणामी पिण्याच्या पाण्यासह सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला. अनेकाना अंघोळीला पाणी मिळाले नाही. बँका, डाक कार्यालय, एटीएम सेवाही विजेअभावी बंद राहिली. माेबाईलही चार्ज झाले नाहीत. त्यामुळे ऑनलाईन अभ्यासावरही परिणाम झाला.

चाैकट...

मेणबत्ती लावून केली डिलिव्हरी

येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी रात्री प्रसूतीसाठी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते परंतु, वीज नसल्याने उजेडाचे करायचे काय? असा सवाल डाॅक्टर, कर्मचाऱ्यांसमाेर हाेता. दुसरा काेणताही पर्याय नसल्याने मेणबत्तीच्या प्रकाशात प्रसूती करण्यात आली.

व्यापाऱ्यांचेही नुकसान

वीजपुरवठा खंडित राहिल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. येथील हाॅटेल व्यवसाय माेठा आहे. अशा हाॅटेलमधील दूध, आईस्क्रिम, पनीर, केक आदी पदार्थ वाया गेले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित हाेण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष राजाभाऊ धावणे यांनी केली.