शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

३०७ जणांनी केले नामनिर्देशन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:42 IST

उस्मानाबाद : दिनांक १५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल ...

उस्मानाबाद : दिनांक १५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी नामनिर्देशन दाखल करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सोमवारी दिवसभरात ३०७ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत.

जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दिनांक २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. दरम्यान, २३ डिसेंबर रोजी एकही अर्ज दाखल झालेला नव्हता. त्यानंतर २४ डिसेंबर रोजी २५ जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली होती. तर २५, २६, २७ डिसेंबर अशी तीन दिवस सुटी आल्याने सोमवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची सकाळपासून लगबग सुरु होती. उस्मानाबाद तालुक्यातून ७६, तुळजापूरमधून ७०, उमरगातून ३०, लोहारातून २२, कळंबमधून ५१, वाशीतून २२, भूममधून ६, परंडा तालुक्यातून ३० असे एकूण ३०७ नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.