शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जिल्ह्याभरातील ३ हजार ७८९ शिक्षकांची हाेणार काेराेना टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:15 IST

उस्मानाबाद : नववी ते बारावी दरम्यानच्या शाळा सुरळीत झाल्यानंतर आता पाचवी ते आठवी दरम्यानच्या शाळा २७ जानेवारीपासून भरणार ...

उस्मानाबाद : नववी ते बारावी दरम्यानच्या शाळा सुरळीत झाल्यानंतर आता पाचवी ते आठवी दरम्यानच्या शाळा २७ जानेवारीपासून भरणार आहेत. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित वर्गांना ज्ञानदान करणाऱ्या तब्बल ३ हजार ७८९ शिक्षकांची काेराेना चाचणी करण्यात येणार आहे. शनिवारअखेर सुमारे ४२४ जणांची चाचणी झाली आहे.

राज्यभरात काेराेनाचा संसर्ग वाढल्यानंतर खबरदारीचा भाग म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या हाेत्या. परंतु, मागील काही महिन्यांपासून काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शासनाने नववी ते बारावी दरम्यानचे वर्ग सुरू केले. या वर्गांतील उपस्थिती दिवसागणिक वाढू लागली आहे. हे वर्ग सुरळीत हाेताच आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबात आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून आवश्यक त्या उपाययाेजना सुरू केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात पाचवी ते आठवीच्या वर्गांना ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांची काेराेना चाचणी करण्यात येणार आहे. सध्या या चाचण्या सुरूही झाल्या आहेत. शनिवारअखेर ३ हजार ७८९ पैकी ४२४ जणांची चाचणी झाली आहे. उर्वरित शिक्षकांच्या चाचण्याही सुरू आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुकास्तरावरील सेंटरमध्ये या चाचण्या करण्यात येत आहेत. साेबतच त्या-त्या शाळांतील वर्गखाेल्या सॅनिटाइज करण्यासाेबतच पालकांकडून लेखी संमतीपत्रही घेतले जात आहे. यासाेबतच अन्य उपायाेजनाही करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डाॅ. अरविंद माेहरे यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.

चाैकट...

जिल्हास्तरावर कार्यशाळा...

राज्य सरकारने पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून आवश्यक ती तयारी सुरू करण्यात आली आहे. तीन-चार दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील सर्व गटशिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख तसेच विस्तार अधिकारी यांची एकत्रित कार्यशाळा घेण्यात आली. ज्ञानदान करणाऱ्या गुरुजींची काेराेना टेस्ट करून घेणे, वर्गखाेल्या सॅनिटाइज करणे, विद्यार्थ्यांतील तापमान तपासणी आदी बाबींची माहिती देण्यात आली. या कार्यशाळेस जि. प. अध्यक्ष अस्मिता कांबळे, सीईओ डाॅ. विजयकुमार फड आदींची उपस्थिती हाेती.

काेट...

पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाचे आदेश येताच उपायाेजना सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या संबंधित वर्गांना ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांची काेराेना चाचणी करण्यात येत आहे.

-डाॅ. अरविंद माेहरे,

शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद