शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जिल्ह्याभरातील ३ हजार ७८९ शिक्षकांची हाेणार काेराेना टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:15 IST

उस्मानाबाद : नववी ते बारावी दरम्यानच्या शाळा सुरळीत झाल्यानंतर आता पाचवी ते आठवी दरम्यानच्या शाळा २७ जानेवारीपासून भरणार ...

उस्मानाबाद : नववी ते बारावी दरम्यानच्या शाळा सुरळीत झाल्यानंतर आता पाचवी ते आठवी दरम्यानच्या शाळा २७ जानेवारीपासून भरणार आहेत. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित वर्गांना ज्ञानदान करणाऱ्या तब्बल ३ हजार ७८९ शिक्षकांची काेराेना चाचणी करण्यात येणार आहे. शनिवारअखेर सुमारे ४२४ जणांची चाचणी झाली आहे.

राज्यभरात काेराेनाचा संसर्ग वाढल्यानंतर खबरदारीचा भाग म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या हाेत्या. परंतु, मागील काही महिन्यांपासून काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शासनाने नववी ते बारावी दरम्यानचे वर्ग सुरू केले. या वर्गांतील उपस्थिती दिवसागणिक वाढू लागली आहे. हे वर्ग सुरळीत हाेताच आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबात आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून आवश्यक त्या उपाययाेजना सुरू केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात पाचवी ते आठवीच्या वर्गांना ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांची काेराेना चाचणी करण्यात येणार आहे. सध्या या चाचण्या सुरूही झाल्या आहेत. शनिवारअखेर ३ हजार ७८९ पैकी ४२४ जणांची चाचणी झाली आहे. उर्वरित शिक्षकांच्या चाचण्याही सुरू आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुकास्तरावरील सेंटरमध्ये या चाचण्या करण्यात येत आहेत. साेबतच त्या-त्या शाळांतील वर्गखाेल्या सॅनिटाइज करण्यासाेबतच पालकांकडून लेखी संमतीपत्रही घेतले जात आहे. यासाेबतच अन्य उपायाेजनाही करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डाॅ. अरविंद माेहरे यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.

चाैकट...

जिल्हास्तरावर कार्यशाळा...

राज्य सरकारने पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून आवश्यक ती तयारी सुरू करण्यात आली आहे. तीन-चार दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील सर्व गटशिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख तसेच विस्तार अधिकारी यांची एकत्रित कार्यशाळा घेण्यात आली. ज्ञानदान करणाऱ्या गुरुजींची काेराेना टेस्ट करून घेणे, वर्गखाेल्या सॅनिटाइज करणे, विद्यार्थ्यांतील तापमान तपासणी आदी बाबींची माहिती देण्यात आली. या कार्यशाळेस जि. प. अध्यक्ष अस्मिता कांबळे, सीईओ डाॅ. विजयकुमार फड आदींची उपस्थिती हाेती.

काेट...

पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाचे आदेश येताच उपायाेजना सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या संबंधित वर्गांना ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांची काेराेना चाचणी करण्यात येत आहे.

-डाॅ. अरविंद माेहरे,

शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद