शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

जिल्ह्याभरातील ३ हजार ७८९ शिक्षकांची हाेणार काेराेना टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:15 IST

उस्मानाबाद : नववी ते बारावी दरम्यानच्या शाळा सुरळीत झाल्यानंतर आता पाचवी ते आठवी दरम्यानच्या शाळा २७ जानेवारीपासून भरणार ...

उस्मानाबाद : नववी ते बारावी दरम्यानच्या शाळा सुरळीत झाल्यानंतर आता पाचवी ते आठवी दरम्यानच्या शाळा २७ जानेवारीपासून भरणार आहेत. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर संबंधित वर्गांना ज्ञानदान करणाऱ्या तब्बल ३ हजार ७८९ शिक्षकांची काेराेना चाचणी करण्यात येणार आहे. शनिवारअखेर सुमारे ४२४ जणांची चाचणी झाली आहे.

राज्यभरात काेराेनाचा संसर्ग वाढल्यानंतर खबरदारीचा भाग म्हणून शाळा बंद ठेवण्यात आल्या हाेत्या. परंतु, मागील काही महिन्यांपासून काेराेनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शासनाने नववी ते बारावी दरम्यानचे वर्ग सुरू केले. या वर्गांतील उपस्थिती दिवसागणिक वाढू लागली आहे. हे वर्ग सुरळीत हाेताच आता २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबात आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून आवश्यक त्या उपाययाेजना सुरू केल्या आहेत. पहिल्या टप्प्यात पाचवी ते आठवीच्या वर्गांना ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांची काेराेना चाचणी करण्यात येणार आहे. सध्या या चाचण्या सुरूही झाल्या आहेत. शनिवारअखेर ३ हजार ७८९ पैकी ४२४ जणांची चाचणी झाली आहे. उर्वरित शिक्षकांच्या चाचण्याही सुरू आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयासह तालुकास्तरावरील सेंटरमध्ये या चाचण्या करण्यात येत आहेत. साेबतच त्या-त्या शाळांतील वर्गखाेल्या सॅनिटाइज करण्यासाेबतच पालकांकडून लेखी संमतीपत्रही घेतले जात आहे. यासाेबतच अन्य उपायाेजनाही करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डाॅ. अरविंद माेहरे यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.

चाैकट...

जिल्हास्तरावर कार्यशाळा...

राज्य सरकारने पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून आवश्यक ती तयारी सुरू करण्यात आली आहे. तीन-चार दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील सर्व गटशिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख तसेच विस्तार अधिकारी यांची एकत्रित कार्यशाळा घेण्यात आली. ज्ञानदान करणाऱ्या गुरुजींची काेराेना टेस्ट करून घेणे, वर्गखाेल्या सॅनिटाइज करणे, विद्यार्थ्यांतील तापमान तपासणी आदी बाबींची माहिती देण्यात आली. या कार्यशाळेस जि. प. अध्यक्ष अस्मिता कांबळे, सीईओ डाॅ. विजयकुमार फड आदींची उपस्थिती हाेती.

काेट...

पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाचे आदेश येताच उपायाेजना सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या संबंधित वर्गांना ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांची काेराेना चाचणी करण्यात येत आहे.

-डाॅ. अरविंद माेहरे,

शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद