उस्मानाबाद : एकीकडे कोरोना बांधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्या व्यक्तीची संख्या वाढत आहे. वर्षभरात जिल्ह्यातील २६ हजार ५३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ही जिल्ह्यावासियांसाठी दिलासादायक बाब आहे.
गतवर्षी एप्रिल महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले होते. उपचाराअंती ते ठणठणीत झाले पुन्हा एक महिनाभर रुग्ण आढळून आले नाहीत. मात्र, मे महिन्यापासून पुन्हा रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. जून ते सप्टेंबर महिन्यात बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडू लागली. कोरोना संसर्गास आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून उपाययोजन करण्यात आल्या. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात काही अंशी यश आले. मात्र, पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांपासून दिवसाकाठी ६०० ते ८०० रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, वेळेवर औषधोपचार केल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने चाचणी करण्यावर भर दिला आहे. मागील वर्षभरात २ लाख ३ हजार ४०७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ३३ हजार ७७६ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. ८३६ जणांचा मृत्यू झाला तर २६ हजार ५३६ जणांनी वेळेवर औषधोपचार, सकस आहार, सकारात्मक विचाराने कोरोना हरविले आहे. कोरोनाचे लक्षणे आढळून आल्यास त्वरीत चाचणी करुन उपचार घेतल्यास कोरोना बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी दुखणे अंगावर न काढता लक्षणे आढळताच नजीकच्या दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
घाबरु नका, आम्हीही हरवले आहे
सर्दी, ताप असे लक्षणे जाणवू लागल्याने २९ मार्च रोजी शासकीय रुग्णालयात जाऊन कोरोना टेस्ट केली. सौम्य लक्षणे असल्याने डॉक्टरांनी गृहविलगीकरण राहण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी दिलेली औषधे व नियमांचे पालन करीत १४ दिवस घरीच राहून औषधी घेतली. त्यातून बरा झालो आहे. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे गरजचे आहे.
सुभाष नगदे,
खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने जिल्हा रुग्णालयात तपासणी केली. ॲँटीजेन टेस्टमध्ये रिपाेर्ट निगेटीव्ह आला. आरटीपीसीआर रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. रुग्णालयात ८ दिवस उपचार घेऊन कोरोनातून बरा झालाे. नागरिकांनी भिती न बाळगता सकारत्मक विचार ठेवणे. त्याचबरोबर तीन वेळेस आहार घेणे गरजेचे आहे.
राज बनसोडे,
कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर डॉक्टराच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल झालो. डॉक्टरांनी दिलेले औषधे वेळेवर घेतल्याने आठ दिवसात ठणठणीत झालो आहे. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नसल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, शिवाय, कोरोनाची लक्षणे आढळताच लवकर उपचार घ्यावेत.
राजेश गायकवाड,
कोट...
इतर कोणत्याही आजाराच्या रुग्णांजवळ नातेवाईक उपस्थित असल्याने रुग्णांना मानसिक आधार मिळत असतो. मात्र, कोरोना संसर्गजन्य आजारा असल्याने या रुग्णांना आयसोलेट करण्यात येते. त्यामुळे रुग्ण एकाकी पडतो. शिवाय, आजारामुळे तोंडाला चव नसल्याने रुग्णाचे आहाराकडे दुर्लक्ष होते. अशक्तपणामुळे चिडचिड होते. रुग्णांनी अकारण भिती न बाळगता सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे आहे. शांत मनाने उपचारास प्रतिसाद दिल्यास रुग्ण बरे होत आहेत.
डॉ. महेश कानडे,
मानसोपचार तज्ज्ञ,
पॉझिटीव्हीटी रेट २५.६८ टक्के
मागील दोन महिन्यापासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्याने सध्या जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट २५.६८ टक्के इतका आहे.
सात दिवसांत कोरोनामुक्तांचा आढावा
रविवार ६३०
सोमवार ५०८
मंगळवार ६५३
बुधवार ७१७
गुरुवार ६८०
शुक्रवार ८८१
शनिवार ५९१
पॉईंटर
स्वॅब तपासणाऱ्यांची संख्या २०३४०७
कोरोना निगेटिव्ह आलेली संख्या १७६८७१
वर्षभरात कोरोनाची लागण झालेली संख्या ३३७७६
कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ३३७३६
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण ६४०४