शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये २६ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:26 IST

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील लहान, मोठे व मध्यम स्वरूपाच्या प्रकल्पांत पाणीसाठा वाढला होता. जिल्ह्यात मोठा ...

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील लहान, मोठे व मध्यम स्वरूपाच्या प्रकल्पांत पाणीसाठा वाढला होता.

जिल्ह्यात मोठा १, मध्यम १८, लघु २०८ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांतील पाण्यावरच सिंचन तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असतो. मागील दोन-तीन वर्षे जिल्ह्यात अल्प पर्जन्यमान झाल्यामुळे प्रकल्प पूर्णक्षमतेने भरले नव्हते. ज्या प्रकल्पात पाणी उपलब्ध होते, तेही प्रकल्प फेब्रुवारी महिन्यापासूनच कोरडे पडत असत. त्यामुळे पशूंच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर होत असे. शिवाय पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना भटकंती करावी लागत असे. गतवर्षीही मार्च महिन्यात अनेक प्रकल्प कोरडे पडले होते. त्यामुळे काही भागात अधिग्रहणे तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. मात्र, यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला. त्यानंतर अधून-मधून सतत पाऊस पडत राहिला. काही भागात अतिवृष्टीही झाली. सततच्या पावसामुळे प्रकल्पांत पाण्याची आवक होत राहिल्याने मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा १४५ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले. २४ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध होता. मुबलक पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगामात उत्पादनातही वाढ झाली आहे. पशूंच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. सध्या २२८ प्रकल्पांपैकी २ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. १३ प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्क्यांदरम्यान पाणीसाठा आहे. ७९ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्के पाणीसाठा आहे. ९४ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. या एकूण प्रकल्पांत १९५.२७ दलघमी पाणीसाठा असून, त्याची टक्केवारी २६.८६ टक्के इतकी आहे. सध्या पाण्याची मागणी व बाष्पीभवानाचा प्रकार पाहता उपलब्ध २६ टक्के जलसाठा अजून दोन महिने वापरावयाचा आहे.

चौकट...

जिल्ह्यातील धरणाची साठवण क्षमता ७२७.०५२ दलघमी इतकी असून, त्यात आता फक्त १९५.२७ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच धरणातील २६ टक्के पाणी शिल्लक आहे. २ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. १३ प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के पाणी आहे. ७९ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांदरम्यान, तर ९४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. मार्च महिन्यापासून जिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. धरणातील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने वाढले आहे.

टँकर, अधिग्रहण नाही

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून बहुतांश गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असे. त्यामुळे प्रशासनाकडून या गावांतील नागरिकांना अधिग्रहणे तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. गतवर्षी मार्च, एप्रिल, मे महिन्यांत अधिग्रहणे तसेच टँकर सुरू होते. यंदा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टँकर व अधिग्रहण करण्यात आलेले नाही.