शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये २६ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:26 IST

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील लहान, मोठे व मध्यम स्वरूपाच्या प्रकल्पांत पाणीसाठा वाढला होता. जिल्ह्यात मोठा ...

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील लहान, मोठे व मध्यम स्वरूपाच्या प्रकल्पांत पाणीसाठा वाढला होता.

जिल्ह्यात मोठा १, मध्यम १८, लघु २०८ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांतील पाण्यावरच सिंचन तसेच पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असतो. मागील दोन-तीन वर्षे जिल्ह्यात अल्प पर्जन्यमान झाल्यामुळे प्रकल्प पूर्णक्षमतेने भरले नव्हते. ज्या प्रकल्पात पाणी उपलब्ध होते, तेही प्रकल्प फेब्रुवारी महिन्यापासूनच कोरडे पडत असत. त्यामुळे पशूंच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर होत असे. शिवाय पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना भटकंती करावी लागत असे. गतवर्षीही मार्च महिन्यात अनेक प्रकल्प कोरडे पडले होते. त्यामुळे काही भागात अधिग्रहणे तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. मात्र, यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला. त्यानंतर अधून-मधून सतत पाऊस पडत राहिला. काही भागात अतिवृष्टीही झाली. सततच्या पावसामुळे प्रकल्पांत पाण्याची आवक होत राहिल्याने मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा १४५ प्रकल्प ओव्हर फ्लो झाले. २४ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा उपलब्ध होता. मुबलक पाणीसाठ्यामुळे रब्बी हंगामात उत्पादनातही वाढ झाली आहे. पशूंच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे. सध्या २२८ प्रकल्पांपैकी २ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. १३ प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्क्यांदरम्यान पाणीसाठा आहे. ७९ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्के पाणीसाठा आहे. ९४ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. या एकूण प्रकल्पांत १९५.२७ दलघमी पाणीसाठा असून, त्याची टक्केवारी २६.८६ टक्के इतकी आहे. सध्या पाण्याची मागणी व बाष्पीभवानाचा प्रकार पाहता उपलब्ध २६ टक्के जलसाठा अजून दोन महिने वापरावयाचा आहे.

चौकट...

जिल्ह्यातील धरणाची साठवण क्षमता ७२७.०५२ दलघमी इतकी असून, त्यात आता फक्त १९५.२७ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणजेच धरणातील २६ टक्के पाणी शिल्लक आहे. २ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. १३ प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के पाणी आहे. ७९ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांदरम्यान, तर ९४ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. मार्च महिन्यापासून जिल्ह्यात उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. धरणातील पाण्याचे बाष्पीभवन झपाट्याने वाढले आहे.

टँकर, अधिग्रहण नाही

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून बहुतांश गावांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असे. त्यामुळे प्रशासनाकडून या गावांतील नागरिकांना अधिग्रहणे तसेच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. गतवर्षी मार्च, एप्रिल, मे महिन्यांत अधिग्रहणे तसेच टँकर सुरू होते. यंदा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टँकर व अधिग्रहण करण्यात आलेले नाही.