शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

जिल्ह्यासाठी १९० सौरऊर्जा पंप मंजूर

By admin | Updated: August 9, 2015 00:27 IST

उस्मानाबाद : कोरडवाहू असलेल्या जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण वाढावे याकरिता शासनाच्या वतीने सौर ऊर्जावर चालणारे कृषीपंप देण्याची योजना अंमलात आणली आहे.

उस्मानाबाद : कोरडवाहू असलेल्या जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण वाढावे याकरिता शासनाच्या वतीने सौर ऊर्जावर चालणारे कृषीपंप देण्याची योजना अंमलात आणली आहे. यात शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के रक्कमेत पंप मिळणार आहेत. जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप मिळणार असल्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता पापडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सौर पंप वाटप करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.निसर्गाच्या अनियमितपणामुळे उत्पन्नावर परिणाम होत असल्याने आत्महत्या होत असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या सिंचन धडक विहिरींचा लाभ घेणारे शेतकरीही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. योजनेकरिता शेतकऱ्याकडे पाच एकरापेक्षा अधिक शेती नसावी. शिवाय सिंचनाकरिता विहीर आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना परवडणारी आहे. यामुळे योजना यशस्वी होणार आहे. या योजनेत केंद्र शासन ३0 टक्के, राज्य शासन पाच टक्के व शेतकरी पाच टक्के यातून गोळा झालेल्या रकमेतून कृषिपंप मिळणार आहे. यामुळे ही योजना शेतकऱ्यांकरिता लाभाची ठरणारी आहे. उस्मानाबादसाठी पहिल्या टप्प्यात १९० शेतकऱ्यांना सौरपंपाचे उदिष्ट आहे. लाभार्थी निवडीसाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातूनच लाभार्थी निश्चित केले जातील. (प्रतिनिधी) लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हा पातळीवर समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, सदस्य सचिव अधीक्षक अभियंता महावितरण, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा व महाऊर्जाचे अधिकारी या समितीचे सदस्य राहणार आहे. मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत ५८० सौरपंप शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. यात बीडसाठी दोनशे तर उस्मानाबाद व जालन्यासाठी प्रत्येकी १९० असे पंप मंजूर झाले आहेत.