शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यासाठी १९० सौरऊर्जा पंप मंजूर

By admin | Updated: August 9, 2015 00:27 IST

उस्मानाबाद : कोरडवाहू असलेल्या जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण वाढावे याकरिता शासनाच्या वतीने सौर ऊर्जावर चालणारे कृषीपंप देण्याची योजना अंमलात आणली आहे.

उस्मानाबाद : कोरडवाहू असलेल्या जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण वाढावे याकरिता शासनाच्या वतीने सौर ऊर्जावर चालणारे कृषीपंप देण्याची योजना अंमलात आणली आहे. यात शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के रक्कमेत पंप मिळणार आहेत. जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप मिळणार असल्याचे महावितरणचे अधीक्षक अभियंता पापडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सौर पंप वाटप करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे.निसर्गाच्या अनियमितपणामुळे उत्पन्नावर परिणाम होत असल्याने आत्महत्या होत असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या सिंचन धडक विहिरींचा लाभ घेणारे शेतकरीही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. योजनेकरिता शेतकऱ्याकडे पाच एकरापेक्षा अधिक शेती नसावी. शिवाय सिंचनाकरिता विहीर आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना परवडणारी आहे. यामुळे योजना यशस्वी होणार आहे. या योजनेत केंद्र शासन ३0 टक्के, राज्य शासन पाच टक्के व शेतकरी पाच टक्के यातून गोळा झालेल्या रकमेतून कृषिपंप मिळणार आहे. यामुळे ही योजना शेतकऱ्यांकरिता लाभाची ठरणारी आहे. उस्मानाबादसाठी पहिल्या टप्प्यात १९० शेतकऱ्यांना सौरपंपाचे उदिष्ट आहे. लाभार्थी निवडीसाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातूनच लाभार्थी निश्चित केले जातील. (प्रतिनिधी) लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी जिल्हा पातळीवर समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, सदस्य सचिव अधीक्षक अभियंता महावितरण, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा व महाऊर्जाचे अधिकारी या समितीचे सदस्य राहणार आहे. मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत ५८० सौरपंप शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत. यात बीडसाठी दोनशे तर उस्मानाबाद व जालन्यासाठी प्रत्येकी १९० असे पंप मंजूर झाले आहेत.