शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

१८९ अंगणवाड्या झाल्या थेट नळयोजनेशी कनेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:37 IST

कळंब : बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या अंगणवाड्यातील ‘निर्जळी’ आता दूर होणार असून, जलजीवन मिशनच्या माध्यमातून या अंगणवाड्यांना नळजोडणी ...

कळंब : बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या अंगणवाड्यातील ‘निर्जळी’ आता दूर होणार असून, जलजीवन मिशनच्या माध्यमातून या अंगणवाड्यांना नळजोडणी देण्यासाठी ‘मिशनमोड’ कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याद्वारे तालुक्यातील १८९ अंगणवाड्या थेट नळयोजनेशी ‘कनेक्ट’ झाल्या आहेत.

महिला व बालकल्याण विकास विभागाच्यावतीने शून्य ते सहा वयोगटातील बालकं, स्तनदा माता, गरोदर माता, किशोरवयीन मुली यांच्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. यात शिक्षण ते आरोग्यवर्धन, मार्गदर्शन ते सुपोषण यावर भर दिला जातो. यासाठी अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यान्वित असून, त्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. बालक, माता, मुली यांच्यासाठी महत्वाच्या असलेल्या या अंगणवाड्या गावातील मोकळ्या जागेत, विरळ वस्ती भागासह वाडी अन् वस्तीवर आहेत. यामुळेच तेथे बहुधा पिण्याच्या किंवा सांडपाण्याची सोय उपलब्ध नसते.

यामुळे याठिकाणी पोषण आहार घेतला तर पाणी प्यायचे कुठले, असा प्रश्न पडत असे. यास्थितीत केंद्राच्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक अंगणवाडीत पाण्याची सोय करण्याचा महत्वाचा असा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी राहुल गुप्ता याच्या प्रगतीवर दररोज विशेष लक्ष ठेवून आहेत.

चौकट...

निर्जळी झाली दूर

तालुक्यात एकूण १८९ अंगणवाड्या आहेत. यापैकी बहुतांश अंगणवाडीमध्ये पाण्याची सोय नव्हती. नळयोजनेशी जोडले न गेल्याने पाण्याची कायम ‘निर्जळी’ असे. यामुळे एकात्मिक बालविकास विभागाने जल जीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक अंगणवाडीमध्ये पाण्याची सोय होईल, यावर विशेष भर दिला. यासंबंधी ग्रामपंचायत व सर्व शिक्षा अभियान यांच्याकडे आपली गरज नोंदवली. आजच्या स्थितीत यापैकी १८९ अंगणवाड्या नळयोजनेशी कनेक्ट झाल्या आहेत, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली सांगळे यांनी सांगितले.

हजारो बालकांना होणार फायदा...

तालुक्यातील २४९ पैकी १८९ अंगणवाड्यात पाण्याची सोय करण्यासाठी उपक्रम राबवण्यात आला आहे. तालुक्यात शून्य ते सहा वयोगटातील एकूण १५ हजार बालके अंगणवाडीच्या पटावर आहेत. यातील बहुतांश बालकांना आता पाणी उपलब्ध होणार आहे. नाईकनगर, महादेवनगर, गायरानवस्ती, काळदाते वस्ती अशा अनेक वस्तींना नळ जोडणी दिली आहे. यासाठी काहींना पोषण अभियानातून तर काहींना पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून आधार मिळाला आहे.