शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
2
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
3
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
4
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
5
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
8
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
9
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
10
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
11
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
12
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
13
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
14
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
15
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
16
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
17
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
18
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
19
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
20
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!

अद्यापही १३६ विद्यार्थ्यांना स्वाधारची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:16 IST

उस्मानाबाद : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील ज्या विद्यार्थ्यांचा शासकीय वसतिगृहात अर्ज करून प्रवेश मिळाला नाही. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात ...

उस्मानाबाद : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील ज्या विद्यार्थ्यांचा शासकीय वसतिगृहात अर्ज करून प्रवेश मिळाला नाही. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना कार्यान्वित केली आहे. निधीअभावी ४१० विद्यार्थी दीड वर्षापासून निर्वाह भत्यापासून वंचित होते. जिल्ह्यास पहिल्या टप्प्यात १ कोटी ११ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने २७४ विद्यार्थ्यांना भत्ता मिळाला आहे. मात्र, अद्यापही १३६ विद्यार्थी भत्त्यापासून वंचित राहिले आहेत. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत दहावीनंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील ज्या विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही. अशा विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाह व इतर खर्च भागविण्यासाठी दरवर्षी ५१ हजार रुपये भत्ता देण्यात येतो. दोन टप्प्यात विद्यार्थ्यांना भत्त्याचे वितरण करण्यात येत असते. २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता जिल्ह्यात ७१० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यातील ३०० विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांचे अर्ज अपात्र ठरले होते. तर ४१० विद्यार्थी पात्र ठरले हाते. शैक्षणिक वर्ष संपण्याच्या तोंडावर राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. त्यामुळे शासनाने योजनावरील निधी वर्ग करणे तातडीने थांबवून कोरोना उपाययोजनांवर भर दिला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. सामाजिक न्याय विभागाने पहिल्या टप्प्यात १ कोटी ११ लाख ७७ हजार ५१० रुपयांचा निधी २७४ विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. दोन वर्षानंतर भत्त्याची रक्कम मिळाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तर अद्यापही १३६ विद्यार्थी निधीच्या प्रतीक्षेत आहेत.

विद्यार्थ्यांच्या भत्तासाठी हवे ६० लाख रुपये

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षात ७१० अर्ज सहाय्यक समाजकल्याण आयुक्त कार्यालयाकडे दाखल झाले होते. यातील ४१० विद्यार्थी पात्र ठरले होते. पहिल्या टप्प्यात २७४ विद्यार्थ्यांच्या खात्यावर भत्त्याची रक्कम वर्ग झाली आहे. १३६ विद्यार्थी भत्ता रखडला आहे. या विद्यार्थ्यांसाठी ६० लाख रुपयांच्या निधीची मागणी सहाय्यक समाज कल्याण कार्यालयाने राज्याच्या समाजकल्याण विभागाकडे केली आहे.