शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

अद्यापही १३६ विद्यार्थ्यांना स्वाधारची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:16 IST

उस्मानाबाद : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ज्या विद्यार्थ्यांचा शासकीय वसतिगृहात अर्ज करून प्रवेश मिळाला नाही. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात ...

उस्मानाबाद : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ज्या विद्यार्थ्यांचा शासकीय वसतिगृहात अर्ज करून प्रवेश मिळाला नाही. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी राज्य शासनाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना कार्यान्वित केली आहे. निधीअभावी ४१० विद्यार्थी दीड वर्षांपासून निर्वाह भत्यापासून वंचित होते. जिल्ह्यास पहिल्या टप्प्यात १ कोटी ११ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने २७४ विद्यार्थ्यांना भत्ता मिळाला आहे. मात्र, अद्यापही १३६ विद्यार्थी भत्त्यापासून वंचित राहिले आहेत. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत दहावीनंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील ज्या विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही. अशा विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाह व इतर खर्च भागविण्यासाठी दरवर्षी ५१ हजार रुपये भत्ता देण्यात येतो. दोन टप्प्यांत विद्यार्थ्यांना भत्त्याचे वितरण करण्यात येत असते. २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता जिल्ह्यात ७१० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यातील ३०० विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांचे अर्ज अपात्र ठरले होते, तर ४१० विद्यार्थी पात्र ठरले हाते. शैक्षणिक वर्ष संपण्याच्या तोंडावर राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. त्यामुळे शासनाने योजनावरील निधी वर्ग करणे तातडीने थांबवून कोरोना उपाययोजनांवर भर दिला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. सामाजिक न्याय विभागाने पहिल्या टप्प्यात १ कोटी ११ लाख ७७ हजार ५१० रुपयांचा निधी २७४ विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. दोन वर्षांनंतर भत्त्याची रक्कम मिळाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे, तर अद्यापही १३६ विद्यार्थी निधीच्या प्रतीक्षेत आहेत.

विद्यार्थ्यांच्या भत्त्यासाठी हवे ६० लाख रुपये

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षात ७१० अर्ज सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालयाकडे दाखल झाले होते. यातील ४१० विद्यार्थी पात्र ठरले होते. पहिल्या टप्प्यात २७४ विद्यार्थ्यांच्या खात्यावर भत्त्याची रक्कम वर्ग झाली आहे. १३६ विद्यार्थी भत्ता रखडला आहे. या विद्यार्थ्यांसाठी ६० लाख रुपयांच्या निधीची मागणी सहायक समाज कल्याण कार्यालयाने राज्याच्या समाजकल्याण विभागाकडे केली आहे.