शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

दोन महिन्यांपूर्वीच त्या मायलेकाने सोडले वरूड; मुलाची हत्त्या करून आईची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 21:24 IST

चांदूरबाजार येथील प्रकरण

यवतमाळ: अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथे सोमवारी सायंकाळी मायलेकांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळले होते. त्या मायलेकांनी दोन महिन्यांपूर्वीच आर्णी तालुक्यातील वरूड (भक्त) हे गाव सोडले होेते, असे त्या विवाहितेच्या पतीने सांगितले. 

वरूड (भक्त) येथील माधुरी गजानन शिंगणजुडे (३५) व तिचा दिव्यांग मुलगा ऋषीकेश (१०) या दोघांचे मृतदेह चांदूरबाजार येथे रक्ताच्या थारोळ्यात आढळले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. माधुरीचा विवाह वरूड (भक्त) येथील गजानन शिंगणजुडे यांच्याशी दोन वर्षांपूर्वीच झाला होता. माधुरीला त्यापूर्वीच पहिल्या पतीकडून ऋषीकेश हा दिव्यांग मुलगा होता.

पतीसोबत तिचे नेहमी खटके उडत होते. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी माधुरीने तिची बहीण व इतर नातेवाईकांना वरूड (भक्त) येथे बोलावले होते. तेथे त्यांची बैठक झाली. या बैठकीतच माधुरीने वरूडसोडून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती मुलगा ऋषीकेशसह वरूड येथून निघून गेली. तेव्हापासून तिच्याशी आपला संपर्क नाही, असे तिचा पती गजानन शिंगणजुडे यांनी सांगितले.

तब्बल दोन महिन्यानंतर सोमवारी सायंकाळी माधुरी व ऋषीकेशचा मृतदेहच चांदूरबाजार येथे आढळून आला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. ही हत्त्या की आत्महत्या, असा संभ्रम निर्माण झाला. चांदूरबाजार पोलिसांनी दोन्ही दिशेने तपास सुरू केला. मात्र, माधुरीनेच प्रथम ऋषीकेशची हत्त्या करून नंतर आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या प्रकरणातील गुंता आणखी वाढला आहे.

पतीच्या माहितीला माजी सरपंचाचा दुजोरा

मृतक माधुरी मुलासह पती गजाननला सोडून दोन महिन्यांपूर्वीच वरूड येथून निघून गेली होती, या माहितीला वरूडचे माजी सरपंच सुरेश काळे यांनीही दुजोरा दिला. गजानन सायकलवर स्टेशनरीचा फिरता व्यवसाय करून कुटुंब चालवितो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ