शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

नवीन पोलीस निरीक्षक येताच उत्तन-पाली भागात वाळू माफिया पुन्हा सक्रिय 

By धीरज परब | Updated: February 14, 2023 20:31 IST

लांगी यांची बदली झाल्यावर नवीन पोलीस निरीक्षक दादाराम कारंडे हजर झाले आहेत. नव्या पोलीस निरीक्षक यांना काही माहिती मिळायच्या आधीच पाली समुद्र किनारी वाळू माफियांनी पुन्हा वाळू उपसा करून त्याची तस्करी सुरू केली.

मीरारोड - भाईंदरच्या उत्तन - पाली येथील समुद्र किनारी वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाले असून पाली येथील स्थानिक मच्छीमार ह्या वाळू माफियां विरुद्ध पुन्हा आक्रमक झाले आहेत. तर उत्तन पोलिस निरीक्षक यांची बदली होताच वाळू माफिया सक्रिय होतात असा अनुभव नेहमीच झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  

भाईंदरच्या उत्तन येथील वेलंकनी समुद्र किनारी सोनेरी वाळू असते . तर पालीच्या शांती नगर पर्यंतच्या समुद्र किनारी सर्वसाधारण वाळू असते. ह्या भागात वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला आहे. शासनाचा करोडोंचा महसूल बुडवत बेकायदा वाळू तस्करी हा बक्कळ कमाई चा मार्ग झाल्याने ह्यात काही बड्या लोकांचा समावेश असल्याची चर्चा आहे . तर उत्तन सागरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक बदली होऊन गेले कि हे वाळू माफिया सक्रिय होत असल्याचा आता पर्यंतचा अनुभव चर्चेचा विषय आहे . 

ह्या वाळू माफियांनी पूर्वी एका पोलिसाच्या अंगावर गाडी घातली होती . तर एका स्थानिक मच्छीमाराला वाळू माफियांनी गाडीने उडवल्याने गंभीर झालेल्या त्या इसमाचा काही काळाने मृत्यू झाला होता . हे वाळू माफिया मस्तवाल असतानाच पोलिसां कडून कठोर कारवाईची मागणी सातत्याने स्थानिकांनी चालवली आहे . किनाऱ्यावरील वाळू गोण्यां मध्ये भरून दिवस रात्र टेम्पोतून वा दुचाकी वरून वाळू तस्करी केली जाते. सतीश निकम हे उत्तन पोलीस ठाण्याचे प्रभारी असताना मच्छीमारांच्या तक्रारीवरून वाळू माफियांना बऱ्यापैकी लगाम घातला होता. तर प्रशांत लांगी पोलीस निरीक्षक म्हणून हजर झाल्यावर सुरवातीला हे वाळू माफिया सक्रिय झाले होते . तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या कडे तक्रारी गेल्यावर त्यांनी वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते . त्या नंतर वाळू माफियांचा उच्छाद दिसत नव्हता. 

मात्र लांगी यांची बदली झाल्यावर नवीन पोलीस निरीक्षक दादाराम कारंडे हजर झाले आहेत. नव्या पोलीस निरीक्षक यांना काही माहिती मिळायच्या आधीच पाली समुद्र किनारी वाळू माफियांनी पुन्हा वाळू उपसा करून त्याची तस्करी चालविल्याने या प्रकरणी पालीच्या जागरूक मच्छीमारांनी वाळू माफियांना विरोध सुरु केला आहे. वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात वाळू भरण्यासाठी व त्या गाड्यां मध्ये भरण्यासाठी मजूर ठेवले आहेत . सातत्याने गाड्यां मध्ये वाळूच्या गोण्या भरून तस्करी केली जात आहे . सदर प्रकार उत्तन पोलिसांच्या निदर्शनास आणून देत त्यांना निवेदन देणार असल्याचे मच्छीमार म्हणाले