शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

हॅलो, मी कैदी बोलतोय...; महिन्यातून तीनदा साधणार बाह्यजगाशी संपर्क

By मनीषा म्हात्रे | Updated: February 20, 2023 07:39 IST

अनेकदा परराज्यात तसेच, दूर राहण्यास असल्यामुळे कैद्यांचे नातेवाईक अथवा वकील हे प्रत्यक्ष भेटीसाठी कारागृहात येत नाहीत.

मनीषा म्हात्रेमुंबई : राज्यातील कारागृहांतील कैद्यांचा मानसिक ताण दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कैद्यांना आता महिन्यातून तीनवेळा फोनद्वारे कुटुंब, वकील यांच्याशी संपर्क करता येणार आहे. ज्या कैद्यांचे नातेवाईक अथवा वकील हे प्रत्यक्ष भेटीसाठी कारागृहात येत नाहीत अशा कैद्यांसाठी कारागृह प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 

राज्यात एकूण ६० कारागृहे असून यात ९ मध्यवर्ती, ३० जिल्हा, २० खुली कारागृहे व १ किशोर सुधारालय आहे. यामध्ये एकूण ४१ हजार ९८० कैदी आहेत. अनेकदा परराज्यात तसेच, दूर राहण्यास असल्यामुळे कैद्यांचे नातेवाईक अथवा वकील हे प्रत्यक्ष भेटीसाठी कारागृहात येत नाहीत. अशावेळी कैद्यांमध्ये नैराश्य वाढू शकते. यासाठी २०१४ पासून कैद्यांसाठी दूरध्वनी सुविधेची उपाययोजना करण्यात आली आहे.

ज्या कैद्यांचे नातेवाईक भेटीस येत नाहीत, अशाच कैद्यांना किंवा क्वचितच भेट होते, अशाच कैद्यांना महिन्यातून ३ वेळा दूरध्वनी सुविधा प्रत्येकी १० मिनिटे उपलब्ध करून देण्यात यावी, असे आदेश कारागृह विभागाचे प्रमुख अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत. याकरिता सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, तसेच स्थानिक परिस्थितीनुसार वकील भेटीबाबत कारागृह अधीक्षक हे याबाबत अंतिम निर्णय घेतील असेही कारागृह विभागाने नमूद केले आहे.

याच कैद्यांना फायदाज्या बंद्यांचे नातेवाईक भेटीस येत नाहीत, अशाच बंद्यांना किंवा क्वचितच मुलाखत होते, अशाच बंद्यांना महिन्यातून ३ वेळा दूरध्वनी सुविधा प्रत्येकी १० मिनिटे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आधी करू शकत होते दोनदा कॉल ज्या कैद्यांचे वकील सकाळी ९ ते १०.३० या कालावधीत भेटू शकतात त्यांना वगळून ज्यांचे वकील समक्ष भेटीस येत नाहीत, त्यांनाच महिन्यातून दोनदा दूरध्वनीची सुविधा दिली होती.

दूरध्वनी सुविधा आणखीन सुलभ करत, त्यात वाढ करण्यात येणार आहे. ज्या कैद्यांचे नातेवाईक दूर आहेत. भेटी शक्य होत नाहीत. त्या कैद्यांचे नैराश्य कमी होण्यास मदत होईल. - अमिताभ गुप्ता, अप्पर पोलिस महासंचालक, कारागृह विभाग

टॅग्स :Prisonतुरुंग