शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

गरिबीचं नाटक करुन ती बांधायची लग्नगाठ, नवऱ्याला फसवून दाखवायची स्वत:चा थाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 20:02 IST

Fraud Women : शांतीनगर पोलिसांनी भामट्या तारुणीसह तिच्या आईला व त्यांची आणखी एक महिला साथीदार अशा तीन महिलांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. 

ठळक मुद्देरिना देवरे वय २३ वर्ष असे गरिबीच्या नावाने लग्न करून तारूंना लुटणाऱ्या तरुणीचे नाव आहे

नितिन पंडीतभिवंडी - फसवणुकीचा अनेक घटना आपल्या आजूबाजूला नेहमीच घडत असतात मात्र वेगवेगळ्या तरुणांशी गरिबीच्या नावाने लग्न करून त्यांच्याकडून पैसे व दागिने घेऊन नव विवाहित वराची फसवणूक झाल्याचा प्रकार भिवंडीत समोर आला आहे. गरिबीच्या नावाने लग्न करून तरुणांना लुटल्या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी भामट्या तारुणीसह तिच्या आईला व त्यांची आणखी एक महिला साथीदार अशा तीन महिलांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे.              

रिना देवरे वय २३ वर्ष असे गरिबीच्या नावाने लग्न करून तारूंना लुटणाऱ्या तरुणीचे नाव आहे. ती आपली आई मंगला देवरे व मावशी सुनीता संजय माहिरे यांच्या मदतीने रीना हिचे आई वडील नाही ती खूप गरीब आहे अशी खोटी माहिती सांगून रिना हिचे लग्न लावत असत. मात्र लग्न झाल्यानंतर रीना आपल्या पतीला वेगवेगळी खोटी कारणे सांगून पळून जायची , जातांना लग्नात नवरदेवाने दिलेले पैसे व दागिने घेऊन पळून जायची. वेगवेगळ्या ठिकाणचा खोटा पत्ता त्या प्रत्येकवेळी नवनवीन नावऱ्यांनर देत असल्याने तिचा पत्ता देखील कोणाला सापडत नव्हता. ३० मार्च रोजी भादवड येथील हरेश उत्तम पाटील याच्याशी तिचा चौथा विवाह झाला होता. या याआधी रिना हिने सुरत , मालेगाव , पुणे येथील तरुणांना लग्न करून फसवले होते, तर तिचा पाचवा विवाह धुळे येथील एका तरुणाशी ठरला होता. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी रीना लग्न करतांना गरिबीचे कारण पुढे करून नवऱ्या मुलाच्या घरी जाऊन लग्न करत असे, ३० मार्च रोजी ती भादवड येथील हरेश याच्या घरी आली तिथे हरेश सोबत तिचा विवाह देखील झाला , सुरुवातीला तिने हरेशकडून ५ हजार रुपये घेतले त्यानंतर लग्नाच्या खरेदीसाठी ४० हजार रुपये घेतले व त्यांनतर २९ मार्च रोजी हळदीच्या दिवशी आईला कोरोना झाला असे सांगून ५०हजार रुपये ब्यांक खात्यात ट्रान्सफर करून घेतले आपली होणारी पत्नी गरीब असल्याने मदतीच्या नावाने हरेशने रिना हिला ९५ हजार रुपये दिले व लग्नात तिला सोन्याचे दागिने देखील केले होते.          

मात्र, त्यांनतर रिना व तिच्या आईने तिचा पाचवा विवाह धुळे येथील एका तारुणासोबत जमविला होता या तरुणाकडून रिनाने ६० हजार रुपये घेतले होते, त्याच्याशी विवाह करायचा असल्याने रीना हिने माहेरी जाण्याचा हट्ट धरला होता त्यासाठी पतीला आईची तब्बेत बरी नसल्याचा कारण सांगितला , मात्र पतीने मी देखील सोबत येतो असे सांगितल्या नंतर रीना हिने त्यास नकार दिला व विनाकारण भांडण करण्यास सुरुवात केली अखेर पत्नीच्या वागण्याचा पती हरेश यांस संशय आल्याने त्याने मंगळवारी थेट शांतीनगर पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली असता शांतीनगर पोलिसांनी रिना , तिची आई मंगला देवरे व मावशी सुनीता माहिरे यांना ताब्यात घेतले असता फसवणुकीचा सर्व प्रकार समोर आला. या फसवणूक प्रकरणी या तिघी महिलांविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिघींना देखील अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता १६ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या महिलांनी आणखी किती जणांनी अशा प्रकारे फसवणूक केली आहे का यादृष्टीने पोलीस पुढील तपास करत आहेत. 

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिसbhiwandiभिवंडीArrestअटक