शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

नवी मुंबईची सागरी सुरक्षा लागली धक्क्याला; सातही बोटी नादुरुस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 15:07 IST

भाड्याच्या ट्रॉलरने १४४ किमी किनाऱ्याची गस्त. सप्टेंबर २०१६ मध्ये उरणमध्ये समुद्री मार्गे दहशतवादी घुसल्याच्या संशयातून संपूर्ण देशाचे लक्ष नवी मुंबईकडे लागले होते. मात्र काहीच हाती न लागल्यानंतर अनेक दिवसांनी त्याठिकाणचे सैन्य हटवण्यात आले होते. 

- सूर्यकांत वाघमारे,

नवी मुंबई : स्मार्ट सिटीची सागरी सुरक्षा उघड्यावर पडल्याचे दिसून येत आहे. सागरी गस्तीसाठी पोलिसांना देण्यात आलेल्या सातही बोट सद्यस्थितीला नादुरुस्त अवस्थेत पडून आहेत. त्यापैकी चार बोट मागील तीन वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत पडून आहेत. त्यामुळे नवी मुंबईचा १४४ किमी क्षेत्रफळाचा सागरी किनारा उघड्यावर पडला असून, त्याचा फायदा समुद्री मार्गे गैर हालचाली करणाऱ्यांकडून घेतला जात आहे.

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईसह लगतच्या शहरांच्या सागरी सुरक्षेवर अधिक भर देण्यात आला होता. त्यात नवी मुंबईचा प्राधान्याने समावेश होता. समुद्री मार्गे मुंबईत घुसू पाहणाऱ्या दहशतवाद्यांकडून नवी मुंबईच्या सागरी किनाऱ्यांचा वापर होऊ शकतो. अशी संभाव्य हालचाल टाळण्यासाठी नवी मुंबईच्या सागरी सुरक्षेसाठी पोलिसांच्या ताफ्यात ७ स्पीड बोट देण्यात आल्या होत्या. मात्र सातत्याने बोटींमध्ये होणारे बिघाड यामुळे स्मार्ट सिटीची सागरी सुरक्षा सतत उघड्यावर पडत आहे. अशातच मागील अनेक दिवसांपासून सातही बोटी नादुरुस्त अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले आहे. 

चार बोट २०१८ पासून दुरुस्ती अभावी वापराविना सीबीडी येथील जेट्टीवर उभ्या करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी एक बोट पूर्णपणे खराब झालेली असून तिची दुरुस्ती देखील शक्य नाही. उर्वरित चार बोटींवर नवी मुंबईच्या सुमारे १४४ किमी सागरी क्षेत्रफळाच्या सुरक्षेची मदार सांभाळली जात होती. त्यातही डिझेल अभावी अनेकदा या बोट बंदच असायच्या. अशातच मागील दोन वर्षांपासून उर्वरित चारपैकी तीन बोट मध्ये बिघाड झाल्याने, एकाच बोटीच्या आधारे सागरी सुरक्षेचा दिखावा केला जात होता. कालांतराने तिच्यात देखील बिघाड झाल्याने मागील काही दिवसांपासून नवी मुंबईची सागरी सुरक्षा उघड्यावर पडली आहे.

यामुळे गस्तीसाठी पर्याय म्हणून वेळप्रसंगी भाड्याची ट्रॉलर वापरली जात आहे. परंतु १४४ किमी लांब पर्यंत पसरलेला किनारा व ५ किमी समुद्रात आतपर्यंत भाड्याच्या ट्रॉलरने गस्त घालण्यात मर्यादा येत आहेत. अशावेळी एखादी संशयित बोट दिसल्यास तिचा पाठलाग देखील पोलीस करू शकणार नाहीत. दरम्यान नादुरुस्त अवस्थेत असलेल्या बोटींच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे पाठपुरावा झाला असून, लवकरच त्यांची दुरुस्ती केली जाईल असे आश्वासन सागरी पोलिसांना मिळत आहे. प्रत्यक्षात मात्र दुरुस्ती नंतरही त्या किती काळ साथ देतील याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

सप्टेंबर २०१६ मध्ये उरणमध्ये समुद्री मार्गे दहशतवादी घुसल्याच्या संशयातून संपूर्ण देशाचे लक्ष नवी मुंबईकडे लागले होते. तर या दशतवाद्याच्या शोधात उरण व लगतच्या परिसराला लष्करी छावणीचे स्वरूप आले होते. प्रत्यक्षात मात्र काहीच हाती न लागल्यानंतर अनेक दिवसांनी त्याठिकाणचे सैन्य हटवण्यात आले होते. 

नवी मुंबईच्या सागरी किनाऱ्याला लागूनच जे.एन.पी.टी बंदर, ओ.एन.जी.सी. प्रकल्प, तसेच एलिफंटा बेटालगतचा तेल साठा अशी महत्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे मुंबई इतकेच नवी मुंबईच्या सागरी सुरक्षेला महत्व दिले जाते. त्यानंतरही स्पीड बोटी अभावी सागरी वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. याच संधीचा फायदा दहशतवाद्यांकडून घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

दोन बोट दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच सर्व बोटींची दुरुस्ती केली जाणार आहे.

- बिपीनकुमार सिंह, 

पोलीस आयुक्त- नवी मुंबई.