शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नवी मुंबईची सागरी सुरक्षा लागली धक्क्याला; सातही बोटी नादुरुस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 15:07 IST

भाड्याच्या ट्रॉलरने १४४ किमी किनाऱ्याची गस्त. सप्टेंबर २०१६ मध्ये उरणमध्ये समुद्री मार्गे दहशतवादी घुसल्याच्या संशयातून संपूर्ण देशाचे लक्ष नवी मुंबईकडे लागले होते. मात्र काहीच हाती न लागल्यानंतर अनेक दिवसांनी त्याठिकाणचे सैन्य हटवण्यात आले होते. 

- सूर्यकांत वाघमारे,

नवी मुंबई : स्मार्ट सिटीची सागरी सुरक्षा उघड्यावर पडल्याचे दिसून येत आहे. सागरी गस्तीसाठी पोलिसांना देण्यात आलेल्या सातही बोट सद्यस्थितीला नादुरुस्त अवस्थेत पडून आहेत. त्यापैकी चार बोट मागील तीन वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत पडून आहेत. त्यामुळे नवी मुंबईचा १४४ किमी क्षेत्रफळाचा सागरी किनारा उघड्यावर पडला असून, त्याचा फायदा समुद्री मार्गे गैर हालचाली करणाऱ्यांकडून घेतला जात आहे.

मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईसह लगतच्या शहरांच्या सागरी सुरक्षेवर अधिक भर देण्यात आला होता. त्यात नवी मुंबईचा प्राधान्याने समावेश होता. समुद्री मार्गे मुंबईत घुसू पाहणाऱ्या दहशतवाद्यांकडून नवी मुंबईच्या सागरी किनाऱ्यांचा वापर होऊ शकतो. अशी संभाव्य हालचाल टाळण्यासाठी नवी मुंबईच्या सागरी सुरक्षेसाठी पोलिसांच्या ताफ्यात ७ स्पीड बोट देण्यात आल्या होत्या. मात्र सातत्याने बोटींमध्ये होणारे बिघाड यामुळे स्मार्ट सिटीची सागरी सुरक्षा सतत उघड्यावर पडत आहे. अशातच मागील अनेक दिवसांपासून सातही बोटी नादुरुस्त अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले आहे. 

चार बोट २०१८ पासून दुरुस्ती अभावी वापराविना सीबीडी येथील जेट्टीवर उभ्या करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी एक बोट पूर्णपणे खराब झालेली असून तिची दुरुस्ती देखील शक्य नाही. उर्वरित चार बोटींवर नवी मुंबईच्या सुमारे १४४ किमी सागरी क्षेत्रफळाच्या सुरक्षेची मदार सांभाळली जात होती. त्यातही डिझेल अभावी अनेकदा या बोट बंदच असायच्या. अशातच मागील दोन वर्षांपासून उर्वरित चारपैकी तीन बोट मध्ये बिघाड झाल्याने, एकाच बोटीच्या आधारे सागरी सुरक्षेचा दिखावा केला जात होता. कालांतराने तिच्यात देखील बिघाड झाल्याने मागील काही दिवसांपासून नवी मुंबईची सागरी सुरक्षा उघड्यावर पडली आहे.

यामुळे गस्तीसाठी पर्याय म्हणून वेळप्रसंगी भाड्याची ट्रॉलर वापरली जात आहे. परंतु १४४ किमी लांब पर्यंत पसरलेला किनारा व ५ किमी समुद्रात आतपर्यंत भाड्याच्या ट्रॉलरने गस्त घालण्यात मर्यादा येत आहेत. अशावेळी एखादी संशयित बोट दिसल्यास तिचा पाठलाग देखील पोलीस करू शकणार नाहीत. दरम्यान नादुरुस्त अवस्थेत असलेल्या बोटींच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे पाठपुरावा झाला असून, लवकरच त्यांची दुरुस्ती केली जाईल असे आश्वासन सागरी पोलिसांना मिळत आहे. प्रत्यक्षात मात्र दुरुस्ती नंतरही त्या किती काळ साथ देतील याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

सप्टेंबर २०१६ मध्ये उरणमध्ये समुद्री मार्गे दहशतवादी घुसल्याच्या संशयातून संपूर्ण देशाचे लक्ष नवी मुंबईकडे लागले होते. तर या दशतवाद्याच्या शोधात उरण व लगतच्या परिसराला लष्करी छावणीचे स्वरूप आले होते. प्रत्यक्षात मात्र काहीच हाती न लागल्यानंतर अनेक दिवसांनी त्याठिकाणचे सैन्य हटवण्यात आले होते. 

नवी मुंबईच्या सागरी किनाऱ्याला लागूनच जे.एन.पी.टी बंदर, ओ.एन.जी.सी. प्रकल्प, तसेच एलिफंटा बेटालगतचा तेल साठा अशी महत्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे मुंबई इतकेच नवी मुंबईच्या सागरी सुरक्षेला महत्व दिले जाते. त्यानंतरही स्पीड बोटी अभावी सागरी वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. याच संधीचा फायदा दहशतवाद्यांकडून घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

दोन बोट दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच सर्व बोटींची दुरुस्ती केली जाणार आहे.

- बिपीनकुमार सिंह, 

पोलीस आयुक्त- नवी मुंबई.