शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

मुंबईतून बेपत्ता झालेल्या 126 मुलींचे गूढ कायम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:29 IST

७०८ जणींचे अपहरण : ५२८ मुलींचा लागला शेाध 

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईतून गेल्या ११ महिन्यात ७०८ मुलींच्या अपहरणाची नोंद करण्यात आली. यापैकी ५८२ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. यात १२६ मुलींच्या बेपत्ता होण्यामागचे गूढ कायम आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

एनसीआरबीच्या २०१९च्या अहवालानुसार, राज्यभरातून ५६ हजार ७५० पुरुष आणि ६७ हजार ७४६ महिला आणि १९ तृतीय पंथी असे एकूण १ लाख २४ हजार ५१५ जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी झाली. त्यापैकी ६७ हजार १८ जणांचा शोध घेण्यास यश आले. यात अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक होते.

अशात मुंबईतही अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढत आहेत. यात, लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत याचे प्रमाण घटले आहे. मुंबई पोलिसांच्या आकडेवाऱीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेबर अखेरपर्यंत ७०८ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. अल्पवयीन असल्याने याप्रकरणी अपहरणाची नोंद करत अधिक तपास सुरू करण्यात आला. यापैकी ५०८ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहेत. 

२०१९ मध्ये १२४० मुलींच्या अपहरणाची नोंद झाली होती. त्यापैकी १०७६ मुलींचा शोध घेण्यास यश आले. याचबरोबर तरुणी आणि ज्येष्ठ नागरिक बेपत्ता होण्याच्या घटनाही डोके वर काढत आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात मिसिंग पथक कार्यरत आहेत. हे मिसिंग व्यक्तीसाठी कार्यरत आहेत.

पालक ओरडले म्हणून सोडले घर बऱ्याच प्रकरणात मोबाइलचा अतिवापर, गेम, अभ्यास न करणे, शिवाय क्षुल्लक कारणातून पालक ओरडले म्हणून घर सोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.  तर काही प्रकरणात प्रेम प्रकरण, फूस लावून पळवून नेण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशा घटनांमुळे पोलिसांवरील ताण वाढला आहे. पालकांच्याही चिंतेत भर पडली आहे.