शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 23:07 IST

Murder, crime news दारू प्यायल्यानंतर तिघांनी त्यांच्या मित्राच्या मित्रास बेदम मारहाण करीत राेडच्या कडेला फेकून दिले व घराकडे परत आले. त्यानंतर तिघेही परत घटनास्थळी गेले. त्यांनी ताे जिवंत असल्याचे दिसताच त्याचा आधी गळा चिरून खून केला आणि नंतर अंगावर पेट्राेल व टायर टाकून पेटवून दिले.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील सावळी शिवारातील घटना : तीन आराेपी अटकेत

लाेकमत न्यूज नेटवर्ककाटाेल : दारू प्यायल्यानंतर तिघांनी त्यांच्या मित्राच्या मित्रास बेदम मारहाण करीत राेडच्या कडेला फेकून दिले व घराकडे परत आले. त्यानंतर तिघेही परत घटनास्थळी गेले. त्यांनी ताे जिवंत असल्याचे दिसताच त्याचा आधी गळा चिरून खून केला आणि नंतर अंगावर पेट्राेल व टायर टाकून पेटवून दिले. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सावळी (पर्बत) शिवारात गुरुवारी रात्री घडली असून, या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

अंगद ऊर्फ बिट्टू अशोक कडूकर (२८, रिधाेरा, ता. काटाेल) असे मृताचे तर अक्षय रामदास घिचेरिया (३१, रा़ रेस्ट हाऊसजवळ काटोल), मंगेश एकनाथ जिचकार (३२, रा़ धवड लेआऊट, काटाेल) व गणेश चिरकुट नैताम (५२, रा़ धर्मशाळामागे, तारबाजार काटोल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत़ अंगद हा अमाेल नागपुरे व वैभव हिवसे दाेघेही रा. रिधाेरा यांच्यासाेबत गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास एमएच-०४/एडब्ल्यू-५१२३ क्रमांकाच्या क्वाॅलीसने जेवण करण्यासाठी काटाेल येथील झुनका भाकर केंद्रात आले हाेते. ती क्वाॅलीस अंगदच्या मालकीची आहे. तिथे तिघेही दारू पीत बसले. जवळच वैभवचा मित्र आराेपी मंगेश व त्याचे मित्र अक्षय व गणेश दारू पीत हाेते.दरम्यान, वैभवला दारू जास्त चढली असून, त्याला गावाला साेडून देण्याची बतावणी करीत मंगेश, अक्षय व गणेश क्वाॅलीसमध्ये बसले. अमाेल मात्र झुनका भाकर केंद्रातच हाेता. हे पाचही जण रिधाेऱ्याच्या दिशेने निघाले आणि परत काटाेल आले. त्यांनी वैभवला काटाेल येथील बसस्थानकाजवळ साेडले व तिघेही अंगदला घेऊन डाेंगरगावकडे निघून गेले. त्या तिघांनीही अंगदला क्वाॅलीसमध्ये बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी त्याला परत सावळी (पर्बत) शिवारात आणले व तिथे राेडलगत फेकून तिघांनीही घर गाठले.

आराेपींपैकी एकाने या कृत्याबाबत एकाला सांगितले. त्यामुळे कुणाला मारले हे बघण्यासाठी तिन्ही आराेपी व अन्य दाेघे माेटरसायकलने सावळी (पर्बत) शिवारात पाेहाेचले. त्यांनी अंगदचा शाेध घेताला. ताे जिवंत असल्याचे दिसून येताच अक्षयने त्याचा चाकून गळा चिरला. त्यानंतर काटाेलला परत येऊन त्यांनी साेबत पेट्राेल व टायर घेऊन घटनास्थळ गाठले. तिघांनीही अंगदच्या अंगावर पेट्राेल ओतून व टायर ठेवून त्याचा जाळले, अशी माहिती ठाणेदार महादेव आचरेकर यांनी दिली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी भादंवि ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपींना अटक केली. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक राहुल बाेंद्रे करीत आहेत.खुनाचे कारण अस्पष्टअंगद रात्री घरी परत न असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शाेध घेतला. ताे आराेपींसाेबत असल्याची माहिती मिळताच त्यांनी आराेपींना अंगदबाबत विचारपूस केली. मात्र, ताे यापूर्वीच गेल्याची माहिती आराेपींनी अंगदच्या कुटुंबीयांना दिली. त्यांनी क्वाॅलीसची बारकाईने पाहणी केली असता, त्यांना तुटफूट झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे अंगदसाेबत अनुचित प्रकार झाल्याचा त्यांना संशय आला. त्यातच अंगदचा खून करण्यात आल्याची माहिती देवेंद्र खरपुरियाने पाेलिसांना दिली. तिन्ही आराेपी अट्टल व्यसनी असून, त्यांनी अंगदचा खून नेमका कशासाठी केला, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.