शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

खून करून मृतदेह पेट्रोल टाकून जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 23:07 IST

Murder, crime news दारू प्यायल्यानंतर तिघांनी त्यांच्या मित्राच्या मित्रास बेदम मारहाण करीत राेडच्या कडेला फेकून दिले व घराकडे परत आले. त्यानंतर तिघेही परत घटनास्थळी गेले. त्यांनी ताे जिवंत असल्याचे दिसताच त्याचा आधी गळा चिरून खून केला आणि नंतर अंगावर पेट्राेल व टायर टाकून पेटवून दिले.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील सावळी शिवारातील घटना : तीन आराेपी अटकेत

लाेकमत न्यूज नेटवर्ककाटाेल : दारू प्यायल्यानंतर तिघांनी त्यांच्या मित्राच्या मित्रास बेदम मारहाण करीत राेडच्या कडेला फेकून दिले व घराकडे परत आले. त्यानंतर तिघेही परत घटनास्थळी गेले. त्यांनी ताे जिवंत असल्याचे दिसताच त्याचा आधी गळा चिरून खून केला आणि नंतर अंगावर पेट्राेल व टायर टाकून पेटवून दिले. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सावळी (पर्बत) शिवारात गुरुवारी रात्री घडली असून, या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

अंगद ऊर्फ बिट्टू अशोक कडूकर (२८, रिधाेरा, ता. काटाेल) असे मृताचे तर अक्षय रामदास घिचेरिया (३१, रा़ रेस्ट हाऊसजवळ काटोल), मंगेश एकनाथ जिचकार (३२, रा़ धवड लेआऊट, काटाेल) व गणेश चिरकुट नैताम (५२, रा़ धर्मशाळामागे, तारबाजार काटोल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत़ अंगद हा अमाेल नागपुरे व वैभव हिवसे दाेघेही रा. रिधाेरा यांच्यासाेबत गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास एमएच-०४/एडब्ल्यू-५१२३ क्रमांकाच्या क्वाॅलीसने जेवण करण्यासाठी काटाेल येथील झुनका भाकर केंद्रात आले हाेते. ती क्वाॅलीस अंगदच्या मालकीची आहे. तिथे तिघेही दारू पीत बसले. जवळच वैभवचा मित्र आराेपी मंगेश व त्याचे मित्र अक्षय व गणेश दारू पीत हाेते.दरम्यान, वैभवला दारू जास्त चढली असून, त्याला गावाला साेडून देण्याची बतावणी करीत मंगेश, अक्षय व गणेश क्वाॅलीसमध्ये बसले. अमाेल मात्र झुनका भाकर केंद्रातच हाेता. हे पाचही जण रिधाेऱ्याच्या दिशेने निघाले आणि परत काटाेल आले. त्यांनी वैभवला काटाेल येथील बसस्थानकाजवळ साेडले व तिघेही अंगदला घेऊन डाेंगरगावकडे निघून गेले. त्या तिघांनीही अंगदला क्वाॅलीसमध्ये बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी त्याला परत सावळी (पर्बत) शिवारात आणले व तिथे राेडलगत फेकून तिघांनीही घर गाठले.

आराेपींपैकी एकाने या कृत्याबाबत एकाला सांगितले. त्यामुळे कुणाला मारले हे बघण्यासाठी तिन्ही आराेपी व अन्य दाेघे माेटरसायकलने सावळी (पर्बत) शिवारात पाेहाेचले. त्यांनी अंगदचा शाेध घेताला. ताे जिवंत असल्याचे दिसून येताच अक्षयने त्याचा चाकून गळा चिरला. त्यानंतर काटाेलला परत येऊन त्यांनी साेबत पेट्राेल व टायर घेऊन घटनास्थळ गाठले. तिघांनीही अंगदच्या अंगावर पेट्राेल ओतून व टायर ठेवून त्याचा जाळले, अशी माहिती ठाणेदार महादेव आचरेकर यांनी दिली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी भादंवि ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपींना अटक केली. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक राहुल बाेंद्रे करीत आहेत.खुनाचे कारण अस्पष्टअंगद रात्री घरी परत न असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शाेध घेतला. ताे आराेपींसाेबत असल्याची माहिती मिळताच त्यांनी आराेपींना अंगदबाबत विचारपूस केली. मात्र, ताे यापूर्वीच गेल्याची माहिती आराेपींनी अंगदच्या कुटुंबीयांना दिली. त्यांनी क्वाॅलीसची बारकाईने पाहणी केली असता, त्यांना तुटफूट झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे अंगदसाेबत अनुचित प्रकार झाल्याचा त्यांना संशय आला. त्यातच अंगदचा खून करण्यात आल्याची माहिती देवेंद्र खरपुरियाने पाेलिसांना दिली. तिन्ही आराेपी अट्टल व्यसनी असून, त्यांनी अंगदचा खून नेमका कशासाठी केला, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.