शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलींची पोलिसांकडून सुटका!

By राजकुमार जोंधळे | Updated: July 11, 2024 20:14 IST

पुणे, संभाजीनगर, लातूरमधून आरोपी घेतले ताब्यात

लातूर : अपहरण करण्यात आलेल्या तीन मुलींचा शोध घेत त्यांची पुणे, छत्रपती संभाजीनगर येथून सुटका करण्यात आली आहे. याबाबत लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

पोलिसांनी सांगितले, अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका १५ वर्षीय मुलीला अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळवून नेले होते. याबाबत ७ फेब्रुवारी २०२३ रोजी किनगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर एका १७ वर्षीय मुलीला पळवून नेले होते. याबाबत ६ मार्च २०२४ रोजी किल्लारी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचबरोबर एका १५ वर्षीय मुलीस कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याची घटना लातुरात घडली हाेती. याबाबत २५ एप्रिल २०२४ रोजी विवेकानंद चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या मुलींचा आणि अपहरण करणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. यासाठी स्थानिक पोलिस ठाणे आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून समांतर तपास केला जात होता. अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलींबाबत तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलिस पथकाने पुणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर ग्रामीण परिसरातून या तीन अल्पवयीन मुलींना आरोपींसह ताब्यात घेण्यात आले. 

आरोपींसह मुलींना त्या-त्या पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. दयानंद पाटील, पोउपनि. एस. एस. सूर्यवंशी, अंमलदार सदानंद योगी, प्रकाश जाधव, महिला अंमलदार यादव, गिरी, चालक मणियार यांच्या पथकाने केली.

टॅग्स :laturलातूर