शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

बारावीचा पेपर फुटीप्रकरणी ५ जण अटकेत; सायबर सेलेचे पथक मदतीसाठी धावले

By निलेश जोशी | Updated: March 5, 2023 11:59 IST

साखरखेर्डा पोलिसांनी अटक केलेल्यामध्ये दोन खासगी शाळांवरील शिक्षक असून यात प्रसंगी आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.

बुलढाणा - सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा परिसरात बारावीचा गणिताच विषय फुटल्याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसानी पाच जणांना अटक केली आहे. सायबर सेलचे एक पथकही या तपासात साखरखेर्डा पोलिसांना मदत करत असून कथितस्तरावर बनविण्यात आलेल्या एका व्हॉट्सअप ग्रुपवरील डिलीट झालेला डाटाही त्यांच्याकडून रिकव्हर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

साखरखेर्डा पोलिसांनी अटक केलेल्यामध्ये दोन खासगी शाळांवरील शिक्षक असून यात प्रसंगी आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गणेश शिवानंद नागरे, पवन सुधाकर नागरे, गणेश बद्रीनाथ पालवे (रा. भंडारी), गोपाल दामोधर शिंगणे (रा. शेंदुर्जन), गजानन शेषराव आढे ( किनगाव जट्टू) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रात्री दरम्यानच त्यांना अटक करण्यात आल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना साखरखेर्डा पोलिस ताब्यात घेण्याची शक्यता आहे. तीन मार्च रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात बारावीचा गणिताचा पेपर समाजमाध्यमावर व्हायरल झाल होता. त्यानंतर शिक्षण विभागाची धावपळ झाली होती. विधीमंडळातही हे प्रकरण गाजले होते. प्रकरणी साखरखेर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणात शनिवारी पाच परीक्षा केंद्रप्रमख, पेपर रनर बदलण्यात आले होते. सोबतच बुलढाणा येथील केंद्र प्रमुखाला नोटीसही बजावण्यात आली होती.

सायबरचे पथक मदतीलाया प्रकरणात सायबर सेलच्या पथकाची साखरखेर्डा पोलिस मदत घेत असून कथितस्तरावर समाजमाध्यमावर व्हायरल झालेल्या पेपर संदर्भाने एखादा व्हॉट्अप ग्रुप बनवला गेला होता का? त्यात कोणकोण सहभागी होते, या दिशेनेही तपास करण्यात येत आहे. असा एक ग्रुप बनविल्या गेल्याची चर्चा असून संबंधितांनी त्यातील डाटा डिटील केला गेला असल्याची शक्यता गृहीत धरून तो रिकव्हर करण्यासाठी सायबर सेलचे पथक मदत करत असल्याची माहिती आहे. दोन दिवसात त्यादृष्टीने ठोस माहिती समोर येईल असे सायबर सेलच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले.

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षा