शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 06:34 IST

बांगलादेशातील बिष्णूपूरचा रहिवासी असलेला शेख मजुरीचे काम करत होता. २००४ मध्ये सीमेवर जवानांची नजर चुकवून एजंटच्या मदतीने तो मुंबईत आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नदी, डोंगर पार करत मुंबई गाठलेल्या एका बांगलादेशीने नवी मुंबईतील एका महिलेशी ओळख वाढवली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी संसार थाटला, अशी माहिती कफपरेड पोलिसांच्या कारवाईतून समोर आली. लग्नाच्या काही वर्षांनंतर पती बांगलादेशी असल्याचे समजताच तिला धक्का बसला. मात्र, मुलांच्या भविष्याचा विचार करता तिने ही माहिती लपविल्याचे  निष्पन्न झाले. सबूर ऊर्फ इब्राहिम रोकाला शेख (४०) असे त्या बांगलादेशीचे नाव आहे. कफपरेड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

बांगलादेशातील बिष्णूपूरचा रहिवासी असलेला शेख मजुरीचे काम करत होता. २००४ मध्ये सीमेवर जवानांची नजर चुकवून एजंटच्या मदतीने तो मुंबईत आला. नवी मुंबईत काम करताना एका महिलेशी त्याची ओळख झाली. त्याने बांगलादेशी असल्याची ओळख लपवत तिच्याशी लग्न केले. त्यांना मुले झाली. वडिलांचे निधन झाले म्हणून तो बांगलादेशला परतला. २००७ मध्ये त्याने पुन्हा मुंबई गाठली. बऱ्याच वर्षांनी तो घरी परतल्याने पत्नीला संशय आला. तिने चौकशी केली असता तो बांगलादेशी असल्याचे समजले. त्याने आधार,  मतदार कार्डही बनवले.

पोलिसांच्या चौकशीत आढळली बनावट कागदपत्रे३ मे रोजी तो कफपरेड पोलिस ठाण्याच्या आरसी चर्च परिसरात आल्याची माहिती एटीसी सेलला मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप विश्वासराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत भोसले, अंमलदार भामरे, गायकवाड यांनी सापळा रचत शेखला ताब्यात घेतले. चौकशीत कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट होताच त्याला अटक केली. 

सात बांगलादेशींवर कारवाई ट्रॉम्बे पोलिसांनी सात बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली. यामध्ये दोन कुटुंबीयांचा समावेश आहे. यातील सातही वाशीला राहण्यास होते. पियार अली (७१), फरीद अली (३०), सुहाना शेख (२५), मोहम्मद शेख (४०), अहमद शेख (३), अस्लम शेख (१९), मोहम्मद शेख (१९) अशी त्यांची नावे आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी