शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 06:34 IST

बांगलादेशातील बिष्णूपूरचा रहिवासी असलेला शेख मजुरीचे काम करत होता. २००४ मध्ये सीमेवर जवानांची नजर चुकवून एजंटच्या मदतीने तो मुंबईत आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नदी, डोंगर पार करत मुंबई गाठलेल्या एका बांगलादेशीने नवी मुंबईतील एका महिलेशी ओळख वाढवली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी संसार थाटला, अशी माहिती कफपरेड पोलिसांच्या कारवाईतून समोर आली. लग्नाच्या काही वर्षांनंतर पती बांगलादेशी असल्याचे समजताच तिला धक्का बसला. मात्र, मुलांच्या भविष्याचा विचार करता तिने ही माहिती लपविल्याचे  निष्पन्न झाले. सबूर ऊर्फ इब्राहिम रोकाला शेख (४०) असे त्या बांगलादेशीचे नाव आहे. कफपरेड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

बांगलादेशातील बिष्णूपूरचा रहिवासी असलेला शेख मजुरीचे काम करत होता. २००४ मध्ये सीमेवर जवानांची नजर चुकवून एजंटच्या मदतीने तो मुंबईत आला. नवी मुंबईत काम करताना एका महिलेशी त्याची ओळख झाली. त्याने बांगलादेशी असल्याची ओळख लपवत तिच्याशी लग्न केले. त्यांना मुले झाली. वडिलांचे निधन झाले म्हणून तो बांगलादेशला परतला. २००७ मध्ये त्याने पुन्हा मुंबई गाठली. बऱ्याच वर्षांनी तो घरी परतल्याने पत्नीला संशय आला. तिने चौकशी केली असता तो बांगलादेशी असल्याचे समजले. त्याने आधार,  मतदार कार्डही बनवले.

पोलिसांच्या चौकशीत आढळली बनावट कागदपत्रे३ मे रोजी तो कफपरेड पोलिस ठाण्याच्या आरसी चर्च परिसरात आल्याची माहिती एटीसी सेलला मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप विश्वासराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अभिजीत भोसले, अंमलदार भामरे, गायकवाड यांनी सापळा रचत शेखला ताब्यात घेतले. चौकशीत कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट होताच त्याला अटक केली. 

सात बांगलादेशींवर कारवाई ट्रॉम्बे पोलिसांनी सात बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली. यामध्ये दोन कुटुंबीयांचा समावेश आहे. यातील सातही वाशीला राहण्यास होते. पियार अली (७१), फरीद अली (३०), सुहाना शेख (२५), मोहम्मद शेख (४०), अहमद शेख (३), अस्लम शेख (१९), मोहम्मद शेख (१९) अशी त्यांची नावे आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी