शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जिल्ह्यातील आठ गुन्हेगारांवर तडीपारची कुऱ्हाड; ‘एसपी’बच्चन सिंह यांनी उपसले कारवाइचे हत्यार

By आशीष गावंडे | Updated: February 22, 2024 20:48 IST

टाेळीला एक वर्षांसाठी हद्दपार, गावगुंडांच्या बैठका;आपसात समझाैता

आशिष गावंडे, अकाेला: शहरासह जिल्ह्यातील सराइत व अट्टल गुन्हेगारांचा बिमाेड करण्यासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘एमपीडीए’अंतर्गत व तडीपारीचे हत्यार उपसले आहे. गुरुवारी जिल्ह्यातील सराइत आठ गुन्हेगारांना दणका देत त्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश ‘एसपी’सिंह यांनी जारी केला आहे.

सुपारी घेऊन धाकदपट करुन मुळ मालकाकडून कमी पैशात जमिन, प्लाॅट, दुकाने खाली करुन घेणे, टाेळीने संघटित गुन्हेगारी करुन समाजात भिती पसरवणे,शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना धाकदपट,मारहाण करुन त्यांच्याकडून पैसे उकळणे व पूर्ववैमनस्यातून एकमेकांवर प्राणघातक हल्ला करुन सामाजिक स्वास्थ बिघडविणाऱ्या गावगुंडांनी शहरासह जिल्ह्यात अक्षरश: उच्छाद मांडला आहे. अशा गावगुंडांचा व टाेळीने संघटित गुन्हे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी बाह्यावर खाेचल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी शहरातील विशाल भगवान पाखरे रा. शिवणी, करण रामचंद्र तायडे रा. क्रांतीनगर शिवणी, सागर शांताराम अवचार रा. आंबेडकर नगर, धनंजय दिलीप पवार रा. गजानन नगर, डाबकी रोड तसेच जयराज सतिश पांडे रा. रतनलाल प्लॉट, अकोला यांना कलम ५६ महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

टाेळीला एक वर्षांसाठी हद्दपार

पातूर तालुक्यातील चान्नी पाेलिस स्टेशनच्या हद्दीत टोळीने गुन्हे करणाऱ्या विजय रामदास चंचरे (३९),रामसिंग रामदास चंचरे (३०), गजानन रामदास चंचरे (३४) सर्व रा. उमरा यांच्यावरील गंभीर स्वरुपाचे गुन्हे लक्षात घेता या तीन जणांच्या टाेळीला कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये जिल्ह्यातून एक वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेश पोलिस अधिक्षकांनी जारी केला आहे.

गावगुंडांच्या बैठका;आपसात समझाैता

पाेलिस यंत्रणेने कायद्याचा बडगा उगारताच अनेक गावगुंडांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे बाेलल्या जात आहे. आपसातील वाद शमविण्यासाठी स्वयंघाेषित दादा,भाऊ,भाइ,सेठकडून मध्यस्थांमार्फत गुप्त बैठका घेतल्या जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, पाेलिस यंत्रणेकडून कारवाइ हाेण्यापूर्वीच काही ठराविक गावगुंडांना संभाव्य कारवाइची पूर्वसूचना काेण देते, अशा झारीतील शुक्राचार्यांचा बंदाेबस्त हाेणार का, असा सवाल उपस्थित हाेत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला