शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीची हत्या : ओढणीने गळा आवळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 20:33 IST

लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीची तिच्याच ओढणीने गळा आवळून प्रियकराने हत्या केली आणि पळून गेला. सोमवारी सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर सदर पोलिसांनी धावपळ करून आरोपी प्रियकराला अटक केली.

ठळक मुद्देनागपुरातील मंगळवारी कॉम्प्लेक्स परिसरातील घटना : आरोपी गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्नासाठी तगादा लावणाऱ्या प्रेयसीची तिच्याच ओढणीने गळा आवळून प्रियकराने हत्या केली आणि पळून गेला. सोमवारी सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर सदर पोलिसांनी धावपळ करून आरोपी प्रियकराला अटक केली. आसिफ कासीम शेख (वय २६) असे आरोपीचे नाव आहे. तो गिट्टीखदानमधील पिटेसूरचा रहिवासी आहे. हुस्ना जाबीन शेख (वय २१) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती पाचपावलीच्या महेंद्रनगरातील रहिवासी होती.सीताबर्डीतील एका मोबाईल शॉपीत हुस्ना काम करायची. आरोपी आसिफ वाहनावर क्लीनर म्हणून काम करतो. तीन वर्षांपूर्वी हुस्ना आणि आसिफचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर ते कामाला बुट्टी मारून एकमेकांसोबतच राहू लागले. वर्षभरापूर्वी त्यांच्यात वितुष्ट आले. दोघांच्याही डोक्यात संशयाचा किडा शिरल्याने तो तिच्यावर आणि ती त्याच्यावर संशय घेऊ लागली. गेल्या दोन महिन्यांपासून हुस्ना लग्नासाठी खूपच आक्रमक झाली होती. ती कासीमला लवकर लग्न करावे म्हणून धारेवर धरत होती. तिने लावलेल्या तगाद्यामुळे कासीम तिला टाळायचा. परिणामी त्यांच्यात पुन्हा वाद होऊ लागले. या पार्श्वभूमीवर, रविवारी रात्री ७.३० वाजता हे दोघे सदरमधील मंगळवारी कॉम्प्लेक्स चौकात भेटले. हुस्नाने त्याला चौकातच लग्नाचा विषय काढून फटकारणे सुरू केले. त्यांच्यातील हे भांडण तब्बल साडेचार तास सुरू होते. तेथे गर्दी जमल्यामुळे ते कडबी चौकात गेले. तेथून परत भांडण करीतच ते मंगळवारी कॉम्प्लेक्सजवळ आले. तेथे रात्री १ वाजेपर्यंत ते भांडतच होते.लग्न केल्याशिवाय तुला सोडणार नाही, असा हट्ट तिने मांडला होता. आसिफ नकार देत असल्याने तिने त्याच्या पुुरुषार्थावर संशय घेऊन त्याला नको त्या भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे संतापलेल्या आसिफने तिला मारहाण करीत खाली पाडले. तिच्या गळ्यातील ओढणी दोन्हीकडून घट्ट ओढत तिचा गळा आवळला आणि पळून गेला.ओळखपत्रावरून काम सोपी झालेसोमवारी सकाळी परिसरातील मंडळी तेथून जात असताना त्यांना तरुणीचा मृतदेह पडून दिसला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. एकाने पोलिसांना कळविले. त्यानुसार, सदरचे ठाणेदार महेश बनसोडे आपल्या ताफ्यासह तेथे पोहचले. पोलीस उपायुक्त विनीता साहू यांनीही भेट देऊन घटनाक्रम जाणून घेतला. तरुणीजवळ ओळखपत्र आढळले. त्यावरून पोलिसांचे काम सोपी झाले. तिचे नाव आणि पत्ता कळल्याने पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर तो मृतदेह हुस्नाचा असल्याचे स्पष्ट झाले. तिच्या मोबाईलवरून ती आसिफच्या संपर्कात होती, तेदेखील पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या घरी धाव घेतली. तो रात्रीपासून घरीच आला नसल्याचे कुुटुंबीयांनी सांगितल्यामुळे त्याच्यावरील संशय घट्ट झाला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या संपर्कातील व्यक्तींकडे विचारणा केली. अखेर दुपारी ४ च्या सुमारास गिट्टीखदान परिसरात आरोपी आसिफ पोलिसांच्या हाती लागला. त्याने हुस्नाच्या हत्येची कबुली देतानाच तिने लग्नासाठी तगादा लावला होता. ती नको त्या भाषेत बोलून मानसिक त्रास देत होती, त्यामुळे हत्या केल्याचे सांगितले.‘छपाक’ची चर्चा, पोलिसांचा इन्कार!हुस्नाचा मृतदेह घाणीत बरेच तास पडून होता. त्यामुळे तिच्या चेहºयावर चिखल घट्ट चिपकला होता. ते पाहून तिच्या चेहºयावर आरोपीने अ‍ॅसिड टाकले असावे, असा संशय निर्माण झाला होता. तशी चर्चाही पसरली होती. मात्र, पोलिसांनी अ‍ॅसिडचा स्पष्ट इन्कार केला.विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी नेहमीच्या कटकटीनंतर त्यांच्यात ब्रेकअप झाले. मात्र, काही दिवस दूर राहिल्यानंतर ‘तुझे माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना’अशी स्थिती झाल्याने ते पुन्हा एकमेकांच्या भेटीगाठी घेऊ लागले. परंतु त्यांच्यातील कटकट सुरूच होती. त्याचा दुष्परिणाम असा झाला की हुस्ना कायमची संपली अन् तिचा प्रियकर आसिफ आता हत्येचा आरोपी म्हणून कोठडीत पोहचला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट