शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

डब्बा-सट्ट्याचा व्यवहार : इतवारीतील व्यापारी बंधूंनी बुडविले ५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:28 IST

डब्बा आणि सट्ट्याच्या गोरखधंद्याशी संबंधित इतवारीतील दोन बंधूंनी सुमारे ५० कोटी रुपये हडपल्याने संबंधित वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देसंबंधित वर्तुळात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डब्बा आणि सट्ट्याच्या गोरखधंद्याशी संबंधित इतवारीतील दोन बंधूंनी सुमारे ५० कोटी रुपये हडपल्याने संबंधित वर्तुळात खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाच वर्षांपूर्वी हे दोघे बंधू सराफा बाजारात छोटे दुकानदार म्हणून ओळखले जायचे. ते दागिनेही गहाण ठेवत होते; नंतर मात्र त्यांनी डब्बा आणि सट्ट्याचा गोरखधंदा सुरू केला. त्यात बड्यांची साथ मिळाल्याने ते रोज कोट्यवधींची हार-जित करू लागले. दरम्यान, त्यांनी इतवारीत सहा कोटींची तर अन्य काही ठिकाणी कोट्यवधींची मालमत्ता घेतली. ते जग्वार, ऑडीसारख्या आलिशान कारचा काफीला घेऊन फिरत होते. ५० लाख ते एक कोटीची बीसी चालवू लागले. फायनान्सच्या नावाखाली मोठी रक्कम उधार घेऊ लागले. ५० लाखांची रक्कम उधारित घेतल्यानंतर ११० दिवसांत ते ५५ लाख रुपये द्यायचे, असा सौदा होता. वेळेवर व्याज आणि मुद्दल परत मिळत असल्याने त्यांना मोठ्यात मोठी रक्कम सहजपणे कर्जाच्या रूपात मिळत होती. कथित आर्थिक प्रगतीमुळे डब्बा आणि सट्ट्याच्या गोरखधंद्यातील मोठमोठे खेळाडू त्यांच्यासोबतच व्यवहार करू लागले.दोन ते तीन महिन्यांपूर्वी अचानक या व्यापारी बंधूंनी देणेदारांना त्यांची रक्कम परत करण्यासाठी टाळणे सुरू केले. इकडे-तिकडे रक्कम अडकली आहे, असे कारण सांगून ते प्रारंभी देणेदारांना मुदत मागू लागले. अनेकांना एकसारखेच उत्तर मिळत असल्याने आणि या गोरखधंद्यातील मंडळी एकमेकांच्या ओळखीची असल्याने संशय निर्माण झाला. त्यामुळे त्यांच्यावर घेणेकरांनी दडपण वाढवले. त्यांच्या दुकान आणि घरी चकरा वाढल्या. त्यानंतर संबंधित बंधूंचा बंगला आणि आलिशान वाहनेही बँकेत गहाण असल्याचे माहीत पडले. या पार्श्वभूमीवर व्यापारी बंधूंनी एक आठवड्यापूर्वी देणेदारांना तात्काळ रक्कम परत करण्यास इन्कार केला. त्यामुळे आपली रक्कम बुडल्याचे कर्जदारांना माहिती पडले.सूत्रानुसार, या व्यापारी बंधूंवर डब्बा, सट्टा, अवैध सावकार आणि बीसीची ५० कोटींपेक्षा जास्त रक्कम थकीत आहे. केवळ पाच वर्षांत त्यांची प्रगती आणि अधोगती झाली आहे. त्यामुळे अनेक लोक रस्त्यावर आले आहेत. हत्याकांडात वॉन्टेड असलेल्या एका सटोड्याने पाच कोटीपेक्षा जास्त रक्कम गमावली आहे. ५० कोटीतील बहुतांश रक्कम रोखीतील आहे. त्यामुळे तक्रार केल्यास स्वत:लाच तपासाला सामोरे जावे लागणार अशी भीती असल्याने रक्कम देणारे तक्रारही करू शकत नाही. त्याची कल्पना असणारे बिनधास्त आहेत. वाद टाळण्यासाठी ते अनेकांना आपली मालमत्ता विकून रक्कम परत करण्याचे आश्वासन देत आहे.दररोज दोन लाखांची किस्तनमूद व्यापारी बंधूंनी सेंट्रल एव्हेन्यूवरील एका सावकाराकडून दोन कोटींचे कर्ज घेतले. सावकाराला रोज दोन लाख रुपयांची किस्त ते देत होते. ११० दिवसांत ही रक्कम परत करायची होती. यासोबतच आणखी काही सावकारांकडून त्यांनी रोज किस्तीने रक्कम परत करण्याच्या अटीवर कर्ज घेतले होते. ते किस्त परत करीत नसल्यामुळे सर्वप्रथम सावकारांनाच या व्यापारी बंधूंनी हात उभे केल्याचे माहीत पडले होते. या प्रकरणाची आर्थिक एजन्सीकडून चौकशी करण्याची मागणी संबंधित वर्तुळातून होत आहे. कसून चौकशी झाल्यास रोखीने व्यवहार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा खुलासा होऊ शकतो.

 

टॅग्स :businessव्यवसायfraudधोकेबाजी