शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

डब्बा-सट्ट्याचा व्यवहार : इतवारीतील व्यापारी बंधूंनी बुडविले ५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:28 IST

डब्बा आणि सट्ट्याच्या गोरखधंद्याशी संबंधित इतवारीतील दोन बंधूंनी सुमारे ५० कोटी रुपये हडपल्याने संबंधित वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देसंबंधित वर्तुळात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डब्बा आणि सट्ट्याच्या गोरखधंद्याशी संबंधित इतवारीतील दोन बंधूंनी सुमारे ५० कोटी रुपये हडपल्याने संबंधित वर्तुळात खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाच वर्षांपूर्वी हे दोघे बंधू सराफा बाजारात छोटे दुकानदार म्हणून ओळखले जायचे. ते दागिनेही गहाण ठेवत होते; नंतर मात्र त्यांनी डब्बा आणि सट्ट्याचा गोरखधंदा सुरू केला. त्यात बड्यांची साथ मिळाल्याने ते रोज कोट्यवधींची हार-जित करू लागले. दरम्यान, त्यांनी इतवारीत सहा कोटींची तर अन्य काही ठिकाणी कोट्यवधींची मालमत्ता घेतली. ते जग्वार, ऑडीसारख्या आलिशान कारचा काफीला घेऊन फिरत होते. ५० लाख ते एक कोटीची बीसी चालवू लागले. फायनान्सच्या नावाखाली मोठी रक्कम उधार घेऊ लागले. ५० लाखांची रक्कम उधारित घेतल्यानंतर ११० दिवसांत ते ५५ लाख रुपये द्यायचे, असा सौदा होता. वेळेवर व्याज आणि मुद्दल परत मिळत असल्याने त्यांना मोठ्यात मोठी रक्कम सहजपणे कर्जाच्या रूपात मिळत होती. कथित आर्थिक प्रगतीमुळे डब्बा आणि सट्ट्याच्या गोरखधंद्यातील मोठमोठे खेळाडू त्यांच्यासोबतच व्यवहार करू लागले.दोन ते तीन महिन्यांपूर्वी अचानक या व्यापारी बंधूंनी देणेदारांना त्यांची रक्कम परत करण्यासाठी टाळणे सुरू केले. इकडे-तिकडे रक्कम अडकली आहे, असे कारण सांगून ते प्रारंभी देणेदारांना मुदत मागू लागले. अनेकांना एकसारखेच उत्तर मिळत असल्याने आणि या गोरखधंद्यातील मंडळी एकमेकांच्या ओळखीची असल्याने संशय निर्माण झाला. त्यामुळे त्यांच्यावर घेणेकरांनी दडपण वाढवले. त्यांच्या दुकान आणि घरी चकरा वाढल्या. त्यानंतर संबंधित बंधूंचा बंगला आणि आलिशान वाहनेही बँकेत गहाण असल्याचे माहीत पडले. या पार्श्वभूमीवर व्यापारी बंधूंनी एक आठवड्यापूर्वी देणेदारांना तात्काळ रक्कम परत करण्यास इन्कार केला. त्यामुळे आपली रक्कम बुडल्याचे कर्जदारांना माहिती पडले.सूत्रानुसार, या व्यापारी बंधूंवर डब्बा, सट्टा, अवैध सावकार आणि बीसीची ५० कोटींपेक्षा जास्त रक्कम थकीत आहे. केवळ पाच वर्षांत त्यांची प्रगती आणि अधोगती झाली आहे. त्यामुळे अनेक लोक रस्त्यावर आले आहेत. हत्याकांडात वॉन्टेड असलेल्या एका सटोड्याने पाच कोटीपेक्षा जास्त रक्कम गमावली आहे. ५० कोटीतील बहुतांश रक्कम रोखीतील आहे. त्यामुळे तक्रार केल्यास स्वत:लाच तपासाला सामोरे जावे लागणार अशी भीती असल्याने रक्कम देणारे तक्रारही करू शकत नाही. त्याची कल्पना असणारे बिनधास्त आहेत. वाद टाळण्यासाठी ते अनेकांना आपली मालमत्ता विकून रक्कम परत करण्याचे आश्वासन देत आहे.दररोज दोन लाखांची किस्तनमूद व्यापारी बंधूंनी सेंट्रल एव्हेन्यूवरील एका सावकाराकडून दोन कोटींचे कर्ज घेतले. सावकाराला रोज दोन लाख रुपयांची किस्त ते देत होते. ११० दिवसांत ही रक्कम परत करायची होती. यासोबतच आणखी काही सावकारांकडून त्यांनी रोज किस्तीने रक्कम परत करण्याच्या अटीवर कर्ज घेतले होते. ते किस्त परत करीत नसल्यामुळे सर्वप्रथम सावकारांनाच या व्यापारी बंधूंनी हात उभे केल्याचे माहीत पडले होते. या प्रकरणाची आर्थिक एजन्सीकडून चौकशी करण्याची मागणी संबंधित वर्तुळातून होत आहे. कसून चौकशी झाल्यास रोखीने व्यवहार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा खुलासा होऊ शकतो.

 

टॅग्स :businessव्यवसायfraudधोकेबाजी